शेतकऱ्यांसाठी जमिनीच्या बदल्यात जमीन देण्याचा ऐतिहासिक निर्णय दि.बा. पाटील यांच्या माध्यमातून राज्यसरकारने घेतला होता. तर राज्यात स्त्री भ्रूण हत्या आणि कुळ कायदा बनविण्यात महत्वाची भूमिका बजावणारे दि. बा. पाटील यांचे योगदान नवीन मुंबई शहराच्या उभारणीत आहे. त्यामुळे नवी मुंबई येथे तयार झालेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ यास देण्यात यावे ,अशी मागणी गेली दहा वर्षे केली जात आहे.या मागणीच्या निमित्ताने राज्य सरकारने आपला ठराव केंद्र सरकारला दिला आहे.
मात्र केंद्र सरकारकडून कोणताही निर्णय घेतला जात नाही. त्यामुळे अनेक आंदोलनं उभी राहिली मात्र सरकारकडून कोणताही निर्णय घेतला जात नाही. त्यात या विमानतळावरून या महिन्यात उड्डाण सुरू होणार असल्याने भूमिपुत्र अधिक आक्रमक झाले आहेत. या भूमिपुत्रांकडून आंदोलने वेळोवेळी करण्यात आली असून आता हे आंदोलन खासदार सुरेश म्हात्रे तथा बाळ्यामामा यांनी हातात घेतले आहे. त्यानुसार कार रॅलीनंतर आता आरपारची लढाई लढली जात असून खासदार सुरेश म्हात्रे यांच्या नेतृत्त्वाखाली दिबा पायी दिंडी आयोजित करण्यात आली आहे.भिवंडी येथील मानकोली नाक्यापासुन निघणारी ही पायी दिंडी ठाणे अशी ऐरोली वरून ठाणे पनवेल राष्ट्रीय महामार्ग रस्त्याने विमानतळ येथे धडक देणार आहे.
रॅलीचं स्वरुप कसं असेल ?
या रॅलीचे मार्गाबाबत आक्रोश रॅलीचे समन्वयक आणि नवी मुंबई आगरी कोळी युथ फाउंडेशनचे अध्यक्ष निलेश पाटील यांनी डोंबिवली येथील सभेत माहिती दिली.भिवंडीचे मानकोली नाका येथून 22 डिसेंबर रोजी सकाळी पायी दिंडी विमानतळ कडे मार्गस्थ होईल.त्यात सुरुवातीला किमान 25 हजार भूमिपुत्र सहभागी झालेले असतील आणि भिवंडी येथून निघालेली पायी दिंडी दुपारच्या भोजनासाठी खारेगाव ठाणे येथे विसावा घेईल.नंतर ठाणे शहरातून ही पायी दिंडी सायंकाळी 15 किलोमीटर अंतर पार करून ऐरोली येथे मुक्कामासाठी थांबणार आहे.
दिंडीत चालणाऱ्या महिलांना सायंकाळी आपल्या घरी पोहचता यावे यासाठी बसेसची व्यवस्था असणार आहे. ऐरोली येथून ही पायी दिंडी 23 डिसेंबर रोजी सकाळी सुरू होईल आणि पुढे दुपारी 15 किलोमीटर अंतर पार करून सीबीडी येथे मुक्काम करेल.तर 24 डिसेंबर रोजी अंतिम पडाव पार करण्यासाठी रायगड,ठाणे,पालघर,मुंबई जिल्ह्यातील भूमिपुत्र हे हजारांचे संख्येने तयार असतील.नवी मुंबई मधील दोन दिवसांचा मुक्काम यांची सर्व व्यवस्था नवी मुंबई भूमिपुत्र यांनी घेतली आहे.तर जागोजागी पाण्याची व्यवस्था केली जात असून पायी दिंडीत दररोज 15 किलोमीटर अंतर पार करण्याचे नियोजन असून खासदार सुरेश म्हात्रे आणि समाजातील आजी माजी पदाधिकारी हे पायी दिंडीत चालणार आहेत.
राज्य सरकारने नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ यास लोकनेते दि बा पाटील यांचे नाव देण्याचा ठराव घेतला आहे.मात्र केंद्र सरकार कडून मागील दोन वर्षापासून कोणत्याही हालचाली होत नाहीत.त्यामुळे भूमिपुत्र लोकनेते दि बा पाटील यांच्या नावासाठी आक्रमक झाला आहे.ही परिस्थिती लक्षात घेऊन आणि आगामी काळात महापालिका आणि जिल्हा परिषद पंचायत समित्या यांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत.त्या निवडणुकीच्या मतांवर परिणाम होऊ नये यासाठी केंद्र सरकार कडून निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Ans: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि.बा. पाटील यांचे नाव द्यावे, अशी भूमिपुत्र व स्थानिक समाजाची गेली दहा वर्षांपासून मागणी आहे. राज्य सरकारने या मागणीला मान्यता देत ठराव केंद्राकडे पाठवला असला तरी केंद्र सरकारकडून निर्णय होत नसल्याने वाद चिघळत आहे.
Ans: दि. बा. पाटील हे कोकण, रायगड आणि नवी मुंबई परिसरातील भूमिपुत्रांचे लोकप्रिय नेते होते. त्यांचे प्रमुख योगदान: शेतकऱ्यांना जमिनीच्या बदल्यात जमीन मिळवून देण्यासाठी त्यांनी निर्णायक भूमिका बजावली. स्त्री भ्रूण हत्या प्रतिबंध, कुळकायदा यांसारख्या संवेदनशील मुद्द्यांवर ते आघाडीवर होते. नवी मुंबई शहर उभारणीदरम्यान स्थानिकांच्या हक्कांसाठी त्यांनी सातत्याने लढा दिला. या सर्व कारणांनी स्थानिक नागरिक विमानतळाला त्यांचे नाव द्यावे यावर ठाम आहेत.
Ans: सुरुवातीला किमान 25 हजार भूमिपुत्र पायी दिंडीत सहभागी होतील अशी अपेक्षा आहे. पुढील टप्प्यात संख्येत मोठी वाढ होणार आहे.






