Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

महाराष्ट्रात हरयाणाची पुनरावृत्ती कधीच शक्य नाही…; संजय राऊतांनी फडणवीसांना सुनावले

हरयाणाचा पराभव हा दुर्दैवी आहे. हरयाणात इंडिया आघाडी झाली असती, समाजवादी पार्टी, आप, शिवसेना, एनसीपीला जागा मिळाली असती, तर याचा सगळ्याचा परिणाम आपल्या आघाडीला झाला असता. पण काँग्रेसला असं वाटलं आम्ही एकतर्फी जिंकू असं वाटलं. 

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Oct 09, 2024 | 12:21 PM
महाराष्ट्रात हरयाणाची पुनरावृत्ती कधीच शक्य नाही…; संजय राऊतांनी फडणवीसांना सुनावले
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई: हरयाणा विधानसभा निवडणुकीत  भाजपने दणदणीत विजय मिळवला. या विजयानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्रातही हरयाणाची पुनरावृत्ती होईल, असे संकेत देत विरोधकांवर निशाणा साधला. या टीकेला ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी. हे कधीच शक्य होणार नाही, असे सांगत फडणवीसांना सुनावलं आहे.आज सकाळी माध्यमांशी संवाद साधताना संजय राऊत यांनी महाराष्ट्र आणि हरयाणातील राजकीय  परिस्थितीकडे लक्ष वेधलं आहे.

हरयाणाची पुनरावृत्ती महाराष्ट्रात होईल, देवेंद्र फडणवीस म्हणत आहेत. असा प्रश्न विचारला असता संजय राऊत म्हणाले, ‘हे कधीही शक्य नाही. हरयाणातला विजय हा काही दैदीप्यमान विजय नाही. हरयाणातला पराभव हा दुर्दैवी आहे. पण यातून आम्हाला बऱ्याच गोष्टी शिकता येतील. देशातल्या  निवडणुका आम्हाला एकत्रच लढाव्या लागणार आहेत.  लोकसभेतलं यश हे इंडिया आघाडीचं यश आहे. आता महाराष्ट्रात काय असं तुम्हाला वाटत असेल तर, हरयाणाच्या निकालाचा कोणताही परिणाम महाराष्ट्रात होणार नाही.  महाराष्ट्रात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी आहे आणि इथे काँग्रेस एकटी नाही, इथे काँग्रेससोबत  उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्यासारखे जागरूक नेतृत्त्वही आहे.” अशा शब्दांत संजय राऊतांनी फडणवीसांना सुनावले आहे.

हेही वाचा: इस्त्रायलने हिजबुल्लाहच्या भूमिगत केंद्रांना केले लक्ष्य; लेबनॉनमध्ये जोरदार क्षेपणास्त्रांचे हल्ले

तसेच,  ठिकठिकाणी अपक्ष उमेदवार उभे केल्यामुळे हरयाणात काँग्रेसची मते विभाजित झाली. आमच्या मतांमध्ये विभाजन झाले. हिंदीत, ‘जो जिता वही सिकंदर’ अशी म्हण आहे.  त्यासाठी तुमचं नक्कीच अभिनंदन करतो. पण काँग्रेसने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे काही तक्रारी केल्या आहेत. त्याचाही विचार व्हायला हवा. हरयाणा हे 90 जागांच्या विधानसभेचं राज्य आहे. तिथे जाती-पातीचीही काही गणिते आहेत. तरीही काँग्रेसला 36 जागा मिळाल्या. फक्त 9 जागा कमी पडल्या. पण यातून आम्ही निराश झालेलो नाही. पण यातून काँग्रेलाही धडा घ्यावा लागेल. काँग्रेसला स्वबळावर लढायचे असेल तर त्यांनी तशी भूमिका घेतली पाहिजे, असंही त्यांनी यावेळी सूचित केलं.

संजय राऊत म्हणाले, ” भाजपने हरयाणाची निवडणूक अत्यंत प्रभावीपणे लढली हे मी  मान्य करतो. काँग्रेस जिंकत होती पण भाजपने हारलेली बाजी जिंकली. जम्मू-कश्मीर हे अत्यंत महत्त्वाचं राज्य होंतं. 370 कलम हटवल्यावर क्रांती होईल.  370 कलम हटवलं हा त्यांच्या प्रचाराचा भाग होता. राममंदीर उभारणे  आणि 370 कलम हटवून, आणि त्याचा प्रचार करून सुद्धा जम्मू-कश्मीरमध्ये मोदीं आणि त्यांचा  पराभव झाला. हरयाणा आणि जम्मू-कश्मीरम या दोन्ही राज्यांत 90 जागांचीच विधानसभा आहे. त्यामुळे आम्ही 50-50 जे म्हणतो, ते हरयाणा तुमच्याकडे आणि जम्मू-कश्मीर आमच्याकडे आली.

हेही वाचा:  इसरोमध्ये भरतीच्या प्रक्रियेला सुरुवात; ‘या’ पदांसाठी करता येईल अर्ज

हरयाणाचा पराभव हा दुर्दैवी आहे. हरयाणात इंडिया आघाडी झाली असती, समाजवादी पार्टी, आप, शिवसेना, एनसीपीला जागा मिळाली असती, तर याचा सगळ्याचा परिणाम आपल्या आघाडीला झाला असता. पण काँग्रेसला असं वाटलं आम्ही एकतर्फी जिंकू असं वाटलं.  पण जिथे काँग्रेस कमजोर असते तिथे ती प्रादेशिक पक्षांची मदत घेते.  पण काही ठिकाणी ती स्थानिक पक्षांना महत्त्व देत नाही. या सगळ्याचा परिणाम हरयाणाच्या निकालावर झाला. नाहीतर हरयाणात भाजपचा विजय होईल, असे सांगणारा मला एकही व्यक्ती किंवा पत्रकारही भेटला नाही.असंही संजय राऊत यांनी यावेळी स्पष्ट केलं.

 

Web Title: Sanjay rauts sharp reply to devendra fadnavis criticism nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 09, 2024 | 12:21 PM

Topics:  

  • devendra fadanvis
  • Maharashtra Assembly election 2024
  • sanjay raut

संबंधित बातम्या

“ठाकरे ब्रँड कधीच फेल होणार नाही…; बेस्टच्या निवडणुकीत राज-उद्धव बंधूंना आलेल्या अपयशावर संजय राऊत स्पष्टच बोलले
1

“ठाकरे ब्रँड कधीच फेल होणार नाही…; बेस्टच्या निवडणुकीत राज-उद्धव बंधूंना आलेल्या अपयशावर संजय राऊत स्पष्टच बोलले

महाराष्ट्राच्या राज्यपालांना उपराष्ट्रपतीपदाची उमेदवारी; महाविकास आघाडीचा पाठिंबा की विरोध? संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं
2

महाराष्ट्राच्या राज्यपालांना उपराष्ट्रपतीपदाची उमेदवारी; महाविकास आघाडीचा पाठिंबा की विरोध? संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं

Sanjay Raut News: मुंबई कुणी लुटली हे सगळ्यांना माहिती…; फडणवीसांच्या ‘त्या’ टिकेला राऊतांचा पलटवार
3

Sanjay Raut News: मुंबई कुणी लुटली हे सगळ्यांना माहिती…; फडणवीसांच्या ‘त्या’ टिकेला राऊतांचा पलटवार

Thackeray Brothers Alliance: ठरलं तर, ठाकरे बंधु एकत्र येणार…! संजय राऊतांची मोठी घोषणा
4

Thackeray Brothers Alliance: ठरलं तर, ठाकरे बंधु एकत्र येणार…! संजय राऊतांची मोठी घोषणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.