• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • अन्य
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Mumbai »
  • Shah Scratched The Old Scabs Again Without Any Reason Shiv Senas Criticism Nrkk

‘मस्त आणि महामस्त… शहांनी कारण नसताना जुन्या खपल्या पुन्हा खाजवल्या’ शिवसेनेची टीका

भारतीय जनता पक्षाचे बोट धरायला कोणी तयार नव्हते तेव्हा त्या एकटेपणातून त्यांना बाहेर काढून खांद्यावर गावभर मिरविणारी शिवसेनाच आहे. पुन्हा शहा यांना अलीकडच्या घडामोडींचाच विसर पडलेला दिसतोय. २०१४ साली ते स्वतः अध्यक्ष असतानाच त्यांनी हिंदुत्ववादी शिवसेनेशी नाते तोडले होते. तेव्हा शिवसेना एकट्य़ानेच लढली होती. शिवसेनेला एकट्य़ाने लढण्याची, अंगावर येणाऱ्यांना शिंगावर घेऊन लोळविण्याची सवय आहे व लढण्यासाठी शिवसेनेला तपास यंत्रणांची ‘चिलखते’ वापरावी लागत नाहीत.

  • By Navarashtra News Network
Updated On: Dec 22, 2021 | 10:11 AM
‘मस्त आणि महामस्त… शहांनी कारण नसताना जुन्या खपल्या पुन्हा खाजवल्या’ शिवसेनेची टीका
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

गृहमंत्री अमित शहांची पाठ वळताच चंद्रकांतदादा पाटील वगैरे महामस्त नेत्यांचे बोबडे बालीश बोल सुरू झाले. ‘मोदी हे फारच संयमी नेते आहेत. नाहीतर महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावायला वेळ लागणार नाही!’ असे पाटील म्हणतात ते कशाच्या आधारावर? अमित शहा यांनी “पुण्यात येऊन राज्य सरकारवर काही प्रश्न उपस्थित केले व शिवसेनेलाही इशारे, आव्हाने वगैरे देऊन ते गेले. शिवसेनेला एकटे लढून वगैरे दाखवण्याची पोकळ आव्हाने देण्यापेक्षा लडाखमध्ये घुसलेल्या चिन्यांशी लढून दाखवा व त्यांना बाहेर ढकलण्याचे आव्हान स्वीकारा. तेच देशहिताचे आहे. असं प्रत्युत्तर शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून देण्यात आलं आहे.

काय म्हटलंय सामनात?

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे एक मस्त गृहस्थ आहेत. शहा मस्त असले तरी त्यांचे महाराष्ट्रातील चेले हे महामस्त आहेत. मदमस्त असा उल्लेख करणे त्या मंडळींना असंसदीय वाटू शकेल. त्यामुळे महामस्तच बरे. शहा यांनी पुण्यात येऊन त्यांच्या कार्यकर्त्यांना बुस्टर डोस दिला. त्यावर लगेच महाराष्ट्रातील महामस्त पुढाऱ्यांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची भाषा सुरू करून हास्यजत्रेची रंगीत तालीमच सुरू केली.

काही झाले की राष्ट्रपती राजवट लावण्याची धमकी द्यायची. देशाचे घटनात्मक प्रमुख जणू त्यांच्या घरीच रबर स्टॅम्प घेऊन बसले आहेत. तर अमित शहा यांनी पुण्यात येऊन राज्य सरकारवर काही प्रश्न उपस्थित केले व शिवसेनेलाही इशारे, आव्हाने वगैरे देऊन ते गेले. देशाची एकंदरीत स्थिती आज बरी नाही. अनेक राज्यांत कायद्याची घडी विस्कटलेली आहे. ईशान्येकडील राज्यांत, जम्मू-कश्मीरात गृहमंत्र्यांनी विशेष लक्ष देण्याची आवश्यकता आहे. पण त्यांचे लक्ष्य महाराष्ट्रावरच दिसते. महाराष्ट्रात एकंदरीत बरे चालले असल्याचे हे लक्षण मानायला हवे. म्हणूनच फक्त शिवसेनेला आव्हान देण्याचे वक्तव्य त्यांनी केले आहे.

अशीच आव्हानाची भाषा त्यांनी प. बंगालात केली होती. तेथे काय झाले? भाजपास दारुण पराभव पत्करावा लागला. कालच्या कोलकाता महानगरपालिका निवडणुकीत तर भाजपास दहा जागाही जिंकता आल्या नाहीत. आता तेथेही राष्ट्रपती राजवट लावणार काय? खरे तर लखीमपूर खेरीत केंद्रीय मंत्रीपुत्राने 13 शेतकऱ्यांना चिरडून मारल्यावर गृहमंत्र्यांनी तेथे कारवाईचा बडगा उगारायला हवा होता. पण शहा यांनी त्या मंत्र्यास अभय दिले व पुण्यात येऊन शिवसेनेस आव्हान दिले.

शहा गृहमंत्री नसते व त्यांच्या हाताशी सी.बी.आय., ई.डी., इन्कम टॅक्स, एन.सी.बी.सारखी हत्यारे नसती तर ते आजच्याप्रमाणे आव्हानाची भाषा कधीच करू शकले नसते. शहा यांना महाराष्ट्रात येऊन मन मोकळे करण्याचा पूर्ण अधिकार आहे. देशभरात भाजपविरोधकांचे बोलण्याचे स्वातंत्र्य दडपले असले तरी महाराष्ट्रात सगळ्यांचेच स्वातंत्र्य अबाधित आहे. त्यामुळेच शहा यांनी कारण नसताना जुन्या खपल्या पुन्हा खाजवल्या आहेत. शिवसेनेने सत्तेसाठी दगाबाजी केली व आता हिंमत असेल तर एकटे लढून दाखवावे असे आव्हान त्यांनी दिले. शहांचे नेमके वय किती ते माहीत नाही. पण आव्हानांच्या अंगाखांद्यावर खेळत आणि आव्हानांना लोळवत शिवसेना मोठी झाली.

भारतीय जनता पक्षाचे बोट धरायला कोणी तयार नव्हते तेव्हा त्या एकटेपणातून त्यांना बाहेर काढून खांद्यावर गावभर मिरविणारी शिवसेनाच आहे. पुन्हा शहा यांना अलीकडच्या घडामोडींचाच विसर पडलेला दिसतोय. २०१४ साली ते स्वतः अध्यक्ष असतानाच त्यांनी हिंदुत्ववादी शिवसेनेशी नाते तोडले होते. तेव्हा शिवसेना एकट्य़ानेच लढली होती. शिवसेनेला एकट्य़ाने लढण्याची, अंगावर येणाऱ्यांना शिंगावर घेऊन लोळविण्याची सवय आहे व लढण्यासाठी शिवसेनेला तपास यंत्रणांची ‘चिलखते’ वापरावी लागत नाहीत.

शिवसेनेच्या हाती सत्याची वाघनखे आहेत. याचा अनुभव देशातील अनेकांनी वेळोवेळी घेतला आहे. अमित शहा यांचा संताप समजण्यासारखा आहे. प्रयत्नांची शर्थ करूनही ते महाराष्ट्रातील ‘तीन चाकी’ सरकारचे टायर पंक्चर करू शकलेले नाहीत. केंद्रीय गृहमंत्र्यांचे म्हणणे आहे, ‘राज्यातील सरकार तीन चाकी रिक्षा आहे. रिक्षा आता बंद पडली आहे.’ हे विधान हास्यास्पद आणि गोरगरीबांचा अपमान करणारे आहे.

मोदींच्या सरकारने पेट्रोल-डिझेलचे भाव शंभरावर नेऊन ठेवल्यामुळे सामान्यांना फक्त रिक्षाच परवडू शकते. महाराष्ट्राच्या सरकारला निदान तीन चाके तरी आहेत. केंद्रातले सरकार म्हणजे उताराला लागलेली गाडी आहे. २०२४ साली या गाडीचे ब्रेक निकामी झाल्याशिवाय राहणार नाहीत असे देशाचे वातावरण बदलताना दिसत आहे. शिवसेना महाराष्ट्राच्या सत्तेची सूत्रधार आहे या पोटदुखीतून फालतूच्या टिकाटिपण्या सुरू आहेत.

महाराष्ट्रातील भाजप नेत्यांचे वैफल्य समजण्यासारखे आहे, पण देशाचे गृहमंत्रीही त्याच वैफल्यातून बोलू लागतात तेव्हा आश्चर्य वाटते. महाराष्ट्र सरकारला अडचणीत आणण्याची, असहकार पुकारण्याची एकही संधी केंद्रीय गृहमंत्रालय सोडत नाही. शिवसेनेला सत्तेची हाव आहे व भाजप मात्र त्याबाबत सोवळ्यात आहे, सत्ता दिसली की, भाजप रोज एकादशीचे क्रत पाळतो, असे त्यांना म्हणायचे आहे. ते खरे असेल तर पहाटेच्या शपथविधीचा राजभवनातील ‘सत्ता नारायण’ कोणी बांधला होता? त्यामुळे सत्य नारायण कोणाचा व सत्ता नारायणवादी कोण याचे बिंग तेव्हाच फुटले होते.

Web Title: Shah scratched the old scabs again without any reason shiv senas criticism nrkk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Dec 22, 2021 | 10:11 AM

Topics:  

  • Saamana Editorial

ताज्या बातम्या

पुढे वाचा
आनंद हरतालिकेचा, मनी हा दाटला….! लाडक्या प्रियजनांना पाठवा हरतालिकेच्या मंगलमय शुभेच्छा, वाचून होईल आनंद

आनंद हरतालिकेचा, मनी हा दाटला….! लाडक्या प्रियजनांना पाठवा हरतालिकेच्या मंगलमय शुभेच्छा, वाचून होईल आनंद

Devendra Fadnavis: “… या सेवा आता व्हॉट्सॲपच्या माध्यमातून द्याव्यात”; मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश

Devendra Fadnavis: “… या सेवा आता व्हॉट्सॲपच्या माध्यमातून द्याव्यात”; मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश

अनेक घरं अन् संसार केले उद्ध्वस्त; ऑनलाईन गेमिंग विरोधात केंद्र सरकार झाले ‘सक्त’

अनेक घरं अन् संसार केले उद्ध्वस्त; ऑनलाईन गेमिंग विरोधात केंद्र सरकार झाले ‘सक्त’

मावळातील गुंड किरण मोहिते टोळीवर मोक्का कारवाई; टोळीबाबत धक्कादायक माहिती समोर

मावळातील गुंड किरण मोहिते टोळीवर मोक्का कारवाई; टोळीबाबत धक्कादायक माहिती समोर

झेलेन्स्कींना फसवत आहेत ट्रम्प? रशिया कीववर डागतोय क्षेपणास्त्र, पण युक्रेनला ‘हे’ शस्त्र वारण्याची नाही परवानगी, कारण काय ?

झेलेन्स्कींना फसवत आहेत ट्रम्प? रशिया कीववर डागतोय क्षेपणास्त्र, पण युक्रेनला ‘हे’ शस्त्र वारण्याची नाही परवानगी, कारण काय ?

श्री गणेश मंदिर, मॉरिशस : परदेशातही दरवळणारी भारतीय संस्कृतीची सुवासिक ज्योत

श्री गणेश मंदिर, मॉरिशस : परदेशातही दरवळणारी भारतीय संस्कृतीची सुवासिक ज्योत

Devendra Fadnavis: “… यामुळे उद्योगधंद्यांच्या वृद्धीस पोषक वातावरण तयार होईल”; CM फडणवीसांनी व्यक्त केला विश्वास

Devendra Fadnavis: “… यामुळे उद्योगधंद्यांच्या वृद्धीस पोषक वातावरण तयार होईल”; CM फडणवीसांनी व्यक्त केला विश्वास

व्हिडिओ

पुढे बघा
Bhiwandi : वेतन आयोगाच्या फरकासाठी संघर्ष कृती समिती आक्रमक; काम बंद आंदोलनाचा इशारा

Bhiwandi : वेतन आयोगाच्या फरकासाठी संघर्ष कृती समिती आक्रमक; काम बंद आंदोलनाचा इशारा

Amravati : दहावी-बारावीतील १०० गुणवंत विद्यार्थ्यांचा कोळी समाजात सत्कार

Amravati : दहावी-बारावीतील १०० गुणवंत विद्यार्थ्यांचा कोळी समाजात सत्कार

‘…हा समस्त विठ्ठल भक्तांचा अपमान’ सुप्रिया सुळे यांच्या वक्तव्यावर प्रतापराव जाधव यांचा हल्लाबो

‘…हा समस्त विठ्ठल भक्तांचा अपमान’ सुप्रिया सुळे यांच्या वक्तव्यावर प्रतापराव जाधव यांचा हल्लाबो

Raigad : रायगड पोलीस दलाच्या वतीने फिट इंडिया सायकलिंग स्पर्धेचे आयोजन

Raigad : रायगड पोलीस दलाच्या वतीने फिट इंडिया सायकलिंग स्पर्धेचे आयोजन

Latur News : साखर कारखान्यातील मेटलची गन चोरी ; तीन चोरांना पोलीसांनी केली अटक

Latur News : साखर कारखान्यातील मेटलची गन चोरी ; तीन चोरांना पोलीसांनी केली अटक

Beed News : सरकारला अंतिम इशारा, जरांगे पाटलांच्या निर्णयाकडे राज्याचे लक्ष

Beed News : सरकारला अंतिम इशारा, जरांगे पाटलांच्या निर्णयाकडे राज्याचे लक्ष

Sangli : मुसळधार पावसामुळे साचलेला गाळ, कचरा काढून औषध फवारणी करण्याचे काम

Sangli : मुसळधार पावसामुळे साचलेला गाळ, कचरा काढून औषध फवारणी करण्याचे काम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.