
शहरापेक्षा उपनगरांची हवा जास्त 'खराब'! २७ ठिकाणी 'खराब' ते 'अतिखराब' हवेची नोंद
यात नवी मुंबईतील नेरूळ येथे सर्वाधिक २०३ एक्यूआय नोंदला गेला असून, छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात १७९, तर महापे येथे १७२ एक्यूआय नोंदवण्यात आला आहे. ही आकडेवारी पाहता शहराच्या मध्यवर्ती भागांपेक्षा उपनगरांमध्ये नागरिकांचा श्वास अधिक घुसमटत असल्याचे चित्र दिसून येते.
उपनगरांतील वाढती लोकसंख्या, मोठ्या प्रमाणावरील बांधकामे, मेट्रो व रस्ते प्रकल्प, औद्योगिक पट्टे, तसेच वाहनाची संख्या हे प्रदूषण वाढण्यामागचे प्रमुख कारण ठरत आहेत. शहराच्या मध्यवर्ती भागात काही प्रमाणात नियंत्रणात्मक उपाययोजना राबविल्या जात असल्या, तरी उपनगरांमध्ये त्या तुलनेने कमी प्रभावी ठरत असल्याचे चित्र आहे. आरोग्यावर होणारा परिणाम अधिक गंभीर ठरण्याची भीती व्यक्त होत आहे.
हवेची गुणवत्ता अशीच घसरत राहिल्यास श्वसनाचे आजार, हृदयरोग आणि दमा यांसारख्या समस्यांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शहरासोबतच उपनगरांवरही तितकेच लक्ष केंद्रीत करून प्रदूषण नियंत्रणासाठी ठोस उपाययोजना राबविण्याची गरज तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. पाण्याने धूळ मारणे, ओपन फायस्वर प्रतिबंध आणणे, मात्र या योजनाचा परिणाम दर दुसऱ्या दिवशी ढेपळताना दिसत आहे. उपनगरांचा श्वास मोकळा करण्यासाठी तातडीची कृती झाली नाही, तर मुंबई महानगर प्रदेशातील पर्यावरणीय संकट अधिक गडद होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स- १७०
घाटकोपर – १५४
मालाड पश्चिम – १५०
नेव्ही नगर कुलाबा – १४९
भायखळा – १४७
मझगाव – १३८
कांदिवली पूर्व – १३७
बांद्रा पूर्व – १३५
सायन – १३३
कुर्ला – १३१