Bhiwandi Mayoral Election: भिवंडी महापौरपदावर सस्पेन्स कायम; समाजवादी पक्ष ‘नॉट रिचेबल’
त्याचवेळी निर्णायक ठरणारा समाजवादी पक्षाकडून महापौर पदाची मागणी करण्यात आली असून पक्षाचे सर्व नगरसेवक ‘नॉट रिचेबल’ झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. महाबळेश्वरपासून अज्ञात स्थळांपर्यंत सुरू असलेल्या या सत्तानाट्यात नेमका महापौर कोण होणार, सत्ता कोणाच्या हातात जाणार, आणि महापौरपदाचा तिढा कधी सुटणार, याकडे भिवंडीकरांचे लक्ष लाागले आहे.
BMC Mayoral Election: मुंबई उपमहापौरपदासाठी मोठी फिल्डिंग:शिंदे गटाकडून दोन महिला नेत्या मैदानात
नगरसेवक फुटण्याच्या भीतीने काँग्रेस व राष्ट्रवादी पक्षाने आपले नगरसेवक महाबळेश्वर परिसरात ठेवल्याची चर्चा आहे, तर समाजवादी पक्षाचे सहा नगरसेवक देखील अज्ञात स्थळी असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. भिवंडी महापालिका निवडणुकीत काँग्रेस 30, भाजप 22, शिवसेना (शिंदे गट) 12, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) 12, समाजवादी पक्ष 6, कोणार्क विकास आघाडी 4, भिवंडी विकास आघाडी 3 आणि अपक्ष 1 असे पक्षीय बलाबल असून बहुमताचा आकडा 46 आहे.
समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांनी पक्षविरोधी भूमिका घेत काँग्रेस व राष्ट्रवादी (शरद पवार गट) यांचा खुला प्रचार केला. काँग्रेसचे 30 आणि राष्ट्रवादीचे 12 असे एकूण 42 नगरसेवक निवडून आले. त्यानंतर महापौर पदासाठी काँग्रेस, समाजवादी आणि राष्ट्रवादी यांनी एकत्र येत ‘भिवंडी सेक्युलर फ्रंट’ची स्थापना केली. काँग्रेसचा महापौर बसवण्यासाठी तारीक मोमीन यांच्या नावाची घोषणा करण्यात आली.
सांगलीचं अखेर ठरलं ! धीरज सूर्यवंशी महापौर तर गजानन मगदूम उपमहापौर
मात्र समाजवादी पक्षाचे सहा नगरसेवक अचानक गायब झाले असून, “समाजवादी पक्षाचा महापौर बसवला तर आम्ही सोबत येऊ, अन्यथा आमच्याकडे इतर पर्याय खुले आहेत,” अशी भूमिका समाजवादी नगरसेवकांनी घेतल्याचे समजते. या निवडणुकीत भाजपने 22 जागा मिळवत दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष म्हणून बाजी मारली आहे. महापौर पदासाठी भाजपने जोरदार तयारी दाखवली असून भाजपचे 22 आणि शिवसेनेचे 12 असे एकूण 34 नगरसेवक आहेत. इतर मित्रपक्ष संपर्कात असल्याचा दावा भाजपकडून करण्यात येत आहे.
भाजप बहुमताचा आकडा गाठेल, असा विश्वास भाजपने व्यक्त केला आहे. त्यामुळे भाजपकडून नारायण चौधरी आणि सुमित पाटील यांची नावे महापौर पदासाठी पुढे येत आहेत. भिवंडी शहराच्या विकासासाठी सत्तेत असलेल्या सरकारचाच महापौर असावा, भिवंडी महानगरपालिकेवर भाजपचाच महापौर बसेल, असा विश्वास भाजपचे गटनेते संतोष शेट्टी यांनी व्यक्त केला आहे.
भिवंडी महापालिका निवडणुकीत काँग्रेसने 30 जागा मिळवत सर्वात मोठा पक्ष म्हणून बाजी मारली. मात्र महापौर पदासाठी काँग्रेसचे 30, राष्ट्रवादी (शरद पवार गट) 12 आणि समाजवादी पक्षाचे 6 असे एकत्र करत ‘भिवंडी सेक्युलर फ्रंट’ची स्थापना करण्यात आली. सेक्युलर महापौर व्हावा, यासाठी काँग्रेसने दावा केला असून तारीक मोमीन यांचे नाव चर्चेत आले. मात्र समाजवादी पक्षाचे सहा नगरसेवक गायब झाल्याने काँग्रेसला बहुमतासाठी अजून चार नगरसेवकांची गरज आहे.
भिवंडी शहर काँग्रेस अध्यक्ष आणि भिवंडी सेक्युलर फ्रंटचे अध्यक्ष रशीद ताहीर मोमीन यांनी सांगितले की, “अजून वेळ गेलेली नाही, महापौर पदाची निवडणूक होणे बाकी आहे. आमच्या संपर्कात 48 नगरसेवक आहेत. भाजपला चिंता करण्याची गरज आहे, आम्हाला नाही. महापौर काँग्रेसचाच होणार.”






