• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Mumbai »
  • Wow Democracy Congratulations On The Victory Of Independence In 2014 Nrkk

‘व्वा रे लोकशाही! 2014 च्या स्वातंत्र्याचा विजय असो!’ सामनातून केंद्र सरकारला खडे बोल

सरकारने काँग्रेसचे पाच खासदार निलंबित केले. तृणमूलचे तीन खासदार बाहेर काढले. पण सगळ्यांत जास्त गोंधळ घालणाऱ्यांना सभागृहात ठेवून विरोधकांत गोंधळ निर्माण करण्याचे काम केले. फोडा व झोडा या इंग्रज नीतीचाच हा प्रभाव आहे. चार दिवसांपूर्वीच संसदेतील सेंट्रल हॉलमध्ये ‘संविधान दिवस’ साजरा करण्याचे ढोंग झाले व संसदेच्या पहिल्याच दिवशी संविधानाची हत्या झाली. बारा खासदार निलंबित केलेच, पण कोणत्याही चर्चेशिवाय तीन काळे कृषी कायदे रद्द केले. खासदारांना आपले मतही मांडू दिले नाही. लोकशाही चिरकाल टिकावी अशी आकांक्षा बाळगत ही राज्यघटना तयार करण्यात आली आहे. परंतु ती राबवणाऱ्यांच्या मूर्खपणामुळे किंवा अनाचारामुळे किंवा निष्काळजीपणामुळे ती एका तासात कोसळून पडू शकेल.

  • By Navarashtra News Network
Updated On: Dec 01, 2021 | 08:57 AM
‘व्वा रे लोकशाही! 2014 च्या स्वातंत्र्याचा विजय असो!’ सामनातून केंद्र सरकारला खडे बोल
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

मुंबई : संसदेत विरोधकांना वाढती बेरोजगारी, महागाई, तीन कृषी कायदे यांवरच चर्चा करायची होती. भाजप सरकारने चर्चाच नाकारली. मागच्या अधिवेशनातील गोंधळाची शिक्षा या अधिवेशनात 12 खासदारांना दिली. 12 खासदारांचे निलंबन हा सरळ सरळ लोकशाहीचा खून आहे. काही लोकांना वाटते, देशात स्वातंत्र्य 2014 नंतर मिळाले. ते स्वातंत्र्य म्हणजे काय? तर संसदेत चर्चा नाही. प्रश्न विचारणाऱ्या खासदारांचे निलंबन करायचे. व्वा रे लोकशाही! 2014 च्या स्वातंत्र्याचा विजय असो! असं म्हणत शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनातून केंद्र सरकारला खडे बोल सुनावण्यात आले आहेत.

काय म्हटलंय सामनात?

संसदीय लोकशाहीत चर्चेला महत्त्व आहे. पण सध्या संवाद आणि चर्चेचे महत्त्व संपवण्यात आले आहे. संसद अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सरकारने तीन कृषी कायदे कोणत्याही चर्चेशिवाय रद्द केले. लोकशाहीच्या सर्वोच्च मंदिरात पहिल्याच दिवशी हे घडावे यासारखे दुर्दैव नाही. लोकशाही मृत झाली आहे व मुडद्यावर अंत्यसंस्कार करण्याचे विधी सुरू आहेत, पण त्या कर्मकांडातून निदान संसदेस तरी दूर ठेवायला हवे होते.

मागच्या दोन अधिवेशनांत गोंधळ, हाणामारीत कृषी कायदे मंजूर केले. तेव्हाही धड चर्चा घडू दिली नाही. सभागृहात गोंधळ घालणाऱ्या 12 सदस्यांना राज्यसभेतून महिनाभरासाठी निलंबित केले. खरे तर ज्या अधिवेशन काळात आमदार किंवा खासदारांनी गैरवर्तन केल्याचा ठपका असतो त्याच अधिवेशनात त्यांच्यावर कारवाई केली जाते. ते अधिवेशन संपले की विषयही संपतो. संसद कार्यवाहीचा नियम 256 तेच सांगतो. पण या वेळी सरकार पक्षाची मनमानी अशी की, मागच्या अधिवेशनात घडलेल्या कृत्याची सजा खासदारांना या अधिवेशनात दिली.

गोंधळ घालणाऱ्या 12 राज्यसभा सदस्यांचे निलंबन करण्यात आले. त्यात शिवसेनेचे अनिल देसाई आणि प्रियंका चतुर्वेदी यांचा समावेश आहे. काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे खासदार निलंबित झाले. त्यांचा दोष काय, तर त्यांनी शेतकरीविरोधी, भांडवलदारधार्जिण्या कृषी कायद्यांना विरोध केला, आंदोलनात उतरलेल्या शेतकऱ्यांना पाठिंबा दिला. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा मागितली. ती नाकारण्यात आली व गोंधळ झाला. शेतकऱ्यांच्या संतापाचे पडसाद संसदेच्या दोन्ही सभागृहांत उमटले. त्या गोंधळात सरकार पळून गेले. हे सत्य जगाने पाहिले. आता सरकारने गोंधळात सहभागी झालेल्या खासदारांवर कारवाईचा बडगा उगारून मोठाच तीर मारला आहे.

12 खासदार निलंबित करताना सरकारने दोन प्रमुख गोंधळी खासदारांना वगळले. ‘आप’चे संजय सिंह व काँग्रेसचे प्रताप बाजवा यांनी 10 ऑगस्टच्या गोंधळात सगळय़ात महत्त्वाची भूमिका बजावली, पण त्यांना कारवाईतून वगळून सरकारने विरोधकांत फूट पाडण्याचा डाव टाकला. या दोघांना वगळले हा विषय पंजाब विधानसभा निवडणुकीशी संबंधित आहे.

सरकारने काँग्रेसचे पाच खासदार निलंबित केले. तृणमूलचे तीन खासदार बाहेर काढले. पण सगळ्यांत जास्त गोंधळ घालणाऱ्यांना सभागृहात ठेवून विरोधकांत गोंधळ निर्माण करण्याचे काम केले. फोडा व झोडा या इंग्रज नीतीचाच हा प्रभाव आहे. चार दिवसांपूर्वीच संसदेतील सेंट्रल हॉलमध्ये ‘संविधान दिवस’ साजरा करण्याचे ढोंग झाले व संसदेच्या पहिल्याच दिवशी संविधानाची हत्या झाली.

बारा खासदार निलंबित केलेच, पण कोणत्याही चर्चेशिवाय तीन काळे कृषी कायदे रद्द केले. खासदारांना आपले मतही मांडू दिले नाही. लोकशाही चिरकाल टिकावी अशी आकांक्षा बाळगत ही राज्यघटना तयार करण्यात आली आहे. परंतु ती राबवणाऱ्यांच्या मूर्खपणामुळे किंवा अनाचारामुळे किंवा निष्काळजीपणामुळे ती एका तासात कोसळून पडू शकेल.

घटना समितीचे प्रभारी अध्यक्ष सच्चिदानंद सिन्हा यांनी 9 डिसेंबर 1946 रोजी केलेल्या उद्घाटनपर भाषणात जोसेफ स्टोरी यांच्या या उद्गाराचा उल्लेख केला होता. हे त्या दूरदृष्टीचे प्रात्यक्षिक होते. राज्यघटनेच्या आणि लोकशाहीच्या चिंधडय़ाच उडत आहेत. संसद ही सर्वोच्च आहे असा समज होता. पण संसदेलाच दुर्बळ आणि अपंग करण्याचे डाव रचले जात आहेत.

गेल्या सात वर्षांपासून देशातला संवाद संपलाच होता. त्यावर आता श्रद्धांजलीचे फूल पडले आहे. संवाद आणि चर्चा एकतर्फीच होत आहेत. पंतप्रधानांनीच बोलायचे व इतरांनी डोलायचे. हा संवाद असूच शकत नाही. पंतप्रधानांनी गेल्या सात वर्षांत एकदाही पत्रकार परिषद घेतली नाही. विरोधकांशी चर्चा केली नाही. संसदेत येण्यापासून पत्रकारांवरही निर्बंध घातले गेले आहेत. विरोधकांना बोलू दिले जात नाही आणि विरोधकांच्या बाबतीत चेष्टाच सुरू आहे. मोठेपणामुळे जबाबदारी वाढते हे आजच्या राज्यकर्त्यांना माहीत नसावे. खुलेपणा हा आदर्श लोकशाहीचा अत्यावश्यक घटक असतो.

Web Title: Wow democracy congratulations on the victory of independence in 2014 nrkk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Dec 01, 2021 | 08:57 AM

Topics:  

  • Saamana Editorial

ताज्या बातम्या

पुढे वाचा
‘द राजा साब’ ला दुसऱ्याच दिवशी मोठ झटका! चित्रपटाच्या कमाईत ५०% घट; तर, ‘धुरंधर’ने ओलांडला ८०० कोटींचा टप्पा

‘द राजा साब’ ला दुसऱ्याच दिवशी मोठ झटका! चित्रपटाच्या कमाईत ५०% घट; तर, ‘धुरंधर’ने ओलांडला ८०० कोटींचा टप्पा

Jan 11, 2026 | 01:52 PM
West Bengal ED Raid: कोलकाताहून आय-पीएसीच्या गोवा कार्यालयात २० कोटी रुपये पोहोचले…; EDचे TMCवर गंभीर आरोप

West Bengal ED Raid: कोलकाताहून आय-पीएसीच्या गोवा कार्यालयात २० कोटी रुपये पोहोचले…; EDचे TMCवर गंभीर आरोप

Jan 11, 2026 | 01:48 PM
मुंबईतील लोकसंख्या बदल अन् राजकीय गणिते; राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरुच

मुंबईतील लोकसंख्या बदल अन् राजकीय गणिते; राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरुच

Jan 11, 2026 | 01:45 PM
Rishabh Pant Injury : ही कोणती माणुसकी गिल आणि गंभीर…? ऋषभ पंत जमीनीवर कोसळला पण केलं दुर्लक्ष, Video Viral

Rishabh Pant Injury : ही कोणती माणुसकी गिल आणि गंभीर…? ऋषभ पंत जमीनीवर कोसळला पण केलं दुर्लक्ष, Video Viral

Jan 11, 2026 | 01:38 PM
७ दिवसात चेहऱ्यावर येईल चमकदार ग्लो! बडीशेप आणि वेलचीचे ‘या’ पद्धतीने करा सेवन, पचनाच्या समस्या होतील कायमच्या नष्ट

७ दिवसात चेहऱ्यावर येईल चमकदार ग्लो! बडीशेप आणि वेलचीचे ‘या’ पद्धतीने करा सेवन, पचनाच्या समस्या होतील कायमच्या नष्ट

Jan 11, 2026 | 01:36 PM
ना जागेची चिंता ना भाडे! तरुणाने उघडलं चालतं-फिरतं कॉफी शॉप, भन्नाट बिझनेस आयडीया पाहून कराल कौतुक, Video Viral

ना जागेची चिंता ना भाडे! तरुणाने उघडलं चालतं-फिरतं कॉफी शॉप, भन्नाट बिझनेस आयडीया पाहून कराल कौतुक, Video Viral

Jan 11, 2026 | 01:35 PM
Sangali News : खुलेआमपणे बेदाणा तस्करी; सत्ताधारी मूग गिळून गप्प का? आक्रमक शेतकऱ्यांचा संतप्त सवाल

Sangali News : खुलेआमपणे बेदाणा तस्करी; सत्ताधारी मूग गिळून गप्प का? आक्रमक शेतकऱ्यांचा संतप्त सवाल

Jan 11, 2026 | 01:31 PM

व्हिडिओ

पुढे बघा
AMBIVALI : आंबिवली – अटाळीत ॲड. हर्षाली विजय चौधरी यांचा जोरदार प्रचार दौरा

AMBIVALI : आंबिवली – अटाळीत ॲड. हर्षाली विजय चौधरी यांचा जोरदार प्रचार दौरा

Jan 11, 2026 | 11:38 AM
मीरा-भाईंदर महानगरपालिका निवडणुकीआधी मराठी एकीकरण समितीचा मराठी वचननामा जाहीर

मीरा-भाईंदर महानगरपालिका निवडणुकीआधी मराठी एकीकरण समितीचा मराठी वचननामा जाहीर

Jan 11, 2026 | 11:32 AM
Latur Elections : “अमित देशमुखांकडे सांगण्यासारखे काहीच नसल्याने केवळ आरोप करतायत”- अजित पवार

Latur Elections : “अमित देशमुखांकडे सांगण्यासारखे काहीच नसल्याने केवळ आरोप करतायत”- अजित पवार

Jan 10, 2026 | 08:13 PM
Jalgaon Election : प्रचारादरम्यान महिला शिवीगाळ करत असल्याच्या व्हिडिओवर भंगाळे यांचे स्पष्टीकरण

Jalgaon Election : प्रचारादरम्यान महिला शिवीगाळ करत असल्याच्या व्हिडिओवर भंगाळे यांचे स्पष्टीकरण

Jan 10, 2026 | 08:09 PM
Maharashtra Politics :  मीरा-भाईंदरमध्ये राजकीय भूकंप ; भाजपचे माजी नगरसेवक शिवसेनेत दाखल

Maharashtra Politics : मीरा-भाईंदरमध्ये राजकीय भूकंप ; भाजपचे माजी नगरसेवक शिवसेनेत दाखल

Jan 10, 2026 | 08:05 PM
Thane :  निवडणुकीआधी ठाण्यात राजकीय समीकरणं बदलली

Thane : निवडणुकीआधी ठाण्यात राजकीय समीकरणं बदलली

Jan 10, 2026 | 08:00 PM
Muncipal Corporation Elections : “लातूर शहर दहशत मुक्त करण्यासाठी काँग्रेसला साथ द्या” – अमित देशमुख

Muncipal Corporation Elections : “लातूर शहर दहशत मुक्त करण्यासाठी काँग्रेसला साथ द्या” – अमित देशमुख

Jan 10, 2026 | 07:46 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.