
फोटो सौजन्य सोशल मीडिया
शंकरपूर ग्रामपंचायतीच्या हद्दीत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे जलशुद्धीकरण केंद्र आहे. येथे प्रक्रिया केलेले पाणी दोन जलकुंभांद्वारे नागरिकांच्या घरापर्यंत पोहोचवले जाते. केंद्रात क्लोरीन वायूचे दोन सिलिंडर ठेवले होते. त्यापैकी एक वापरात तर दुसरा राखीव होता. गुरुवारी वापरातील सिलिंडर रिकामा झाल्यानंतर राखीव सिलिंडर जोडला.
Nagpur News : ११५ नागपूरकर नेपाळमध्ये ;मायदेशी निघाले पण बॅक टू काठमांडू
मात्र, काही तासांनंतर सिलिंडरमधून अतिशय बारिक प्रमाणात क्लोरीन वायू गळती सुरू झाली. गोधनी येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत कर्मचारी आधीपासूनच सतर्क होते. घटनेची माहिती तातडीने बेलतरोडी पोलिस आणि अग्निशमन विभागाला दिली. अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले. बेलतरोडीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रितेश अहेर आणि डीबी पथकानेही घटनास्थळी धाव घेतली.
Nagpur News : महिंद्राच्या गेटवर कामगारांचा ठिय्या ; उद्योग मंत्र्यांचा हस्तक्षेप
अग्निशमन जवानांनी खबरदारी घेत गळती होत असलेला सिलिंडर बंद केला. सलग दोन जलशुद्धीकरण केंद्रांमध्ये क्लोरीन गळतीच्या घटना समोर आल्याने संबंधित केंद्रांमधील सिलिंडर, व्हॉल्व्ह, जोडणी व्यवस्था आणि सुरक्षेच्या उपाययोजनांची तपासणी करण्याची गरज निर्माण झाली आहे .