फोटो सौजन्य सोशल मीडिया
नागपुरातील श्रीधर महाराज यांच्या माध्यमातून ११५ जणांचा जत्था २२ तारखेला नेपाळकडे निघाला. २३ तारखेला गोरखपूर येथे पोहोचल्यानंतर दोन ट्रव्हल्सनी २४ तारखेला काठमांडू येथे पोहचले. धार्मिक विधी, महाशिवपूरणानंतर काही पर्यटन स्थळांचा आनंद लुटला. नागपूरकरांच्या नियोजित कार्यक्रमानुसार सर्व प्रवासी गुरुवारी निघणार होते. मात्र, निसर्गाचा प्रकोप नेपाळवर बरसला आणि दोन्ही बसेस मोठ्या असल्याने पुढील प्रवासासाठी थांबवल्या. सर्व प्रवासी पशुपतीनाथच्या पार्किंगमध्ये अडकले.
चार नागपूरकर सागा काउंटित सुरक्षित : मानसरोवर परिक्रमा पूर्ण करून
काठमांडूकडे परतणाऱ्या चार नागपूरकर भाविकांना संकटाचा सामना करावा लागला. हे नागरिक सध्या चीनमधील सागा काउंटी परिसरात सुरक्षित ठिकाणी थांबले आहेत. त्यांच्यासोबत गुजरातमधील वडोदरा येथील त्यांचे काही मित्र एकत्र आहेत.
Nagpur News : महिंद्राच्या गेटवर कामगारांचा ठिय्या ; उद्योग मंत्र्यांचा हस्तक्षेप
यामध्ये स्वावलंबीनगर येथील रहिवासी व शासकीय कंत्राटदार सचिन जिरापुरे, पत्नी डॉ. रश्मी जिरापुरे (त्वचाशास्त्रज्ञ), राम कूलरचे ओनर
राजेश अवचट आणि त्यांच्या काकांचा समावेश आहे. दोन दिवसांपूर्वी राजेश अवचट यांनी कुटुंबियांना सुखरूप असल्याचे सांगितले. दरम्यान राजेश यांचे बजू राकेश अवचट नेपाळला जाणार आहेत.
नागपुरातील प्रवाशांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाशी संपर्क साधला. तातडीने यंत्रणा कामाला लागली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी काठमांडूचे खासदार संदीप राणा यांच्याशी संपर्क साधून नागपुरातील प्रवाशांची माहिती दिली. तसेच आवश्यक मदत करण्याची विनंती केली. खासदार संदीप राणा यांनी गुरुवारी सकाळीच नागपूरकरांची प्रत्यक्ष भेट घेतली. स्थानिक प्रशासनाला कामाला लावले. प्रवाशांची विचारपूस करून पुढील प्रवासाची व्यवस्था केली. चार लहान बसेस उपलब्ध करून दिल्या, या बसेसला जाण्याची परवानगीदेखील मिळवून दिली.
बसेसची व्यवस्था होताच प्रवाशांनी सुटकेचा श्वास सोडला. सायंकाळी ५ वाजता सर्व प्रवासी काठमांडूहून जनकपूरकडे मायदेशी परतण्यासाठी निघाले. रात्रीच्या ८.३० वाजता अचानक हवामान बदलल्याने परत जाण्याचा निर्णय घेतल्या. आता शुक्रवारी पहाटे निघतील. सकाळी निघालेले दहा प्रवासी जनकपूरमध्ये एकत्र येतील.
Nagpur News : मुलींच्या स्वच्छतागृहासाठी विद्यार्थ्यांचा आक्रोश; मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी
काठमांडूमध्ये प्रवासी अडकल्याचे कळताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परराष्ट्र व्यवहार मंत्रालय व अन्य विभागांशी संपर्क साधून परिस्थितीची माहिती दिली. यानंतर सर्व यंत्रणा कामाला लागली.
काठमांडूहून १५-२० किलोमीटर अंतर पार
कैल्यानंतर नागपूरकरांब्या चारही बसेस थांबवल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सातत्याने संपर्क ठेवून प्रवाशांकडून माहिती घेत आहेत. बसेस थांबल्यानंतर थोडचाच वेळात मुख्यमंत्र्यानी प्रवाशांची संपर्क साधला. प्रवाशानी परमिटची अडचण सांगताच मुख्यमंत्र्यांनी परत यंत्रणाला कामाला लावली. मात्र, नंतर वातावरणाने दगा दिला.






