
फोटो सौजन्य सोशल मीडिया
सोमवारी रात्री तीन ते चार तास मुलींना कार्यालयाबाहेर पावसात भिजावे लागले, परिणामी, काल व आज असे दोन दिवस पाच विद्यार्थिनींची प्रकृती बिघडली. त्यांच्यावर मेयोत उपचार केल्यानंतर सुटी दिली. या मुलीही पुन्हा जोमाने आंदोलनात सहभागी झाल्या. सोमवारी वर्धा, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया येथील वसतिगृहातील आदिवासी विद्यार्थी अपर आयुक्तांसोबत चर्चेसाठी आले होते. मात्र, रात्री १२ पर्यंत त्यांना ताटकळत ठेवले.
काही विद्यार्थी आत गेले, काहींना पोलिसांनी बाहेरच रोखून धरले. पाऊस सुरू झाल्यानंतरही त्यांना आत सोडले नाही. त्यामुळे पोलिसांचाही विद्याथ्यांनी निषेध केला. सुमारे तीन तास स्वच्छतागृहासाठी विद्यार्थिनी चाचपडत होत्या. यातच दोन विद्यार्थिनींची प्रकृती खालावली. त्यांना मेयोत उपचारार्थ नेऊन परत आणले गेले. मंगळवारीही तीन विद्यार्थिनींची प्रकृती बिघडली. त्यांनाही मेयोत उपचार करून परत आणले गेले. काही ठिकाणचे आंदोलन स्थगित झाल्याचे सांगून त्यांना परत पाठवण्याचा प्रयत्नही केला. १२,५०० पदांची भरती, बिंदुनामावलीतील त्रुटी तसेच डीबीटी योजनेशी संबंधित अडचणी दूर करण्याच्या मागण्यांसाठी राज्यभर आंदोलन सुरू आहे.
अपर आयुक्त आयुषी सिंह मंगळवारी सायंकाळी कार्यालय परिसरात विद्यार्थ्यांशी चर्चा करण्यास बसल्या. त्यावेळी विद्यार्थ्यांनी त्यांना निरुत्तर केले. सिंह या वारंवार त्यांच्या भूमिका बदलत असल्याचा आरोप विद्यार्थिनी करीत होत्या. ३० वर्षांच्या संदर्भातील निर्णय स्थगित केल्याचे सांगगितले. लेखी द्या, आदेश दाखवा यावर विद्यार्थी अडून होते, चर्चा करा, समजून घ्या, यासाठी पाया पडतो, अशी भूमिकाही विद्यार्थी मांडत होते. मात्र, असंवेदनशील अधिकारी व कर्मचारी ऐकण्याच्या मन स्थितीत नसल्यानेच आतमध्ये ठिय्या करावा लागला.
आंदोलक विद्याश्यर्थ्यांसाठी काही सामाजिक संस्थांकडून जेवण दिले जात आहे. पाण्याचीही व्यवस्था केली जात आहे. बिस्कीट्स, नाश्ता आदीचीही व्यवस्था होती. काही विद्यार्थ्यांनी पोलिसांकडून घरोघरी पाठवून दबाव, भीती व चौकशी केली जात असल्याचा आरोपही केला.
Nagpur News : नागपूरचा फ़ुटबाँल , पुढची वाट कुठे ;नागपुरी फ़ुटबाँल चे भविष्य काय ?
विद्यार्थ्यांनी ‘आम्ही गुंड प्रवृत्तीचे आहोत का, कार्यालय आदिवासी विद्याथ्यांच्या हक्काचे आहे, आम्ही येणारच’ अशी भूमिका मांडत बॅरिकेट्सवर तीव्र नापसंती व्यक्त केली. अखेर अपर आयुक्त आयुषी सिंह यांनी पोलिसांना बॅरिकेट्स हटवण्यास सांगितले.