Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nanded Politics : मुख्यमंत्र्यांची सभा, तरीही पराभव! संतोष बांगर यांचे संघटनकौशल्य निर्णायक

हिंगोलीमध्ये शिवसेना शिंदे गटाची ताकद पुन्हा एकदा दिसून आली आहे. संतोष बांगर यांनी केलेल्या संघटनेमुळे भाजपला या निवडणुकीत अपयश स्वीकारावे लागले.

  • By प्रीति माने
Updated On: Dec 26, 2025 | 07:01 PM
BJP defeated in Hingoli Shiv Sena wins due to Santosh Bangar efforts nanded News

BJP defeated in Hingoli Shiv Sena wins due to Santosh Bangar efforts nanded News

Follow Us
Close
Follow Us:

मकरंद बांगर :  हिंगोली :  हिंगोली नगर परिषदेच्या निवडणुकीचा निकाल हा केवळ एका नगरपालिकेपुरता मर्यादित न राहता, राज्यातील सत्ताधारी पक्षाच्या संघटनात्मक ताकदीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा ठरला आहे. मुख्यमंत्री पातळीवरील सभा, वरिष्ठ नेत्यांची उपस्थिती, मोठ्या प्रमाणावर वापरण्यात आलेली प्रचारयंत्रणा असूनही भाजपला या निवडणुकीत अपयश स्वीकारावे लागले. याउलट शिवसेनेने शिस्तबद्ध संघटन, काटेकोर नियोजन आणि तळागाळातील कामाच्या जोरावर निर्णायक विजय मिळवला.

निकालाची आकडेवारीच भाजपच्या अपयशाचे वास्तव अधोरेखित करते. शिवसेनेच्या उमेदवारांना एकूण २३ हजार ४८५ मते मिळाली, तर भाजपच्या उमेदवारांना केवळ १२ हजार ६६३ मते मिळू शकली. तब्बल १० हजार ४३६ मतांचे अंतर हे सामान्य नसून, हा जनतेचा स्पष्ट कौल मानला जात आहे. १७प्रभागांपैकी १२ प्रभागांत शिवसेनेने आघाडी घेत भाजपला बहुसंख्य प्रभागांत पिछाडीवर टाकले.

भाजपने ही निवडणूक प्रतिष्ठेची करून मुख्यमंत्र्यांची सभा घेतली होती. मात्र सभा होऊनही मतांमध्ये अपेक्षित वाढ झाली नाही. मोठ्या व्यासपीठावरून केलेले भाषण, घोषणाबाजी आणि प्रचाराचा गाजावाजा मतदारांपर्यंत प्रभावीपणे पोहोचू शकला नाही, हे निकालातून स्पष्ट झाले आहे. यामुळे भाजपच्या प्रचारपद्धतीवर आणि स्थानिक यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

हे देखील वाचा : नांदेड मनपा रणधुमाळी: भाजप-शिवसेना, राष्ट्रवादी, महाविकास आघाडी सगळेच अडचणीत

समन्वयाचा अभाव

राजकीय वर्तुळात चर्चा आहे की भाजपच्या अनेक नेत्यांनी कागदावर मांडलेली राजकीय गणिते प्रत्यक्ष मतदानात पूर्णपणे फसली. प्रभागनिहाय वास्तव, स्थानिक नाराजी आणि कार्यकत्यांमधील समन्ययाचा अभाव याकडे दुर्लक्ष केल्याचा फटका भाजपला बसला. केवळ वरिष्ठ नेत्यांच्या सभांवर अवलंबून राहिल्याने तळागाळातील मतदार जोडण्यात अपयश आले. याउलट शिवसेनेचे जिल्हा प्रमुख तथा आमदार संतोष बांगर यानी ही निवडणूक संघटनात्मक ताकदीच्या जोरावर लढवली.

हे देखील वाचा : रेल्वेचा प्रवास महागला! आजपासून दरवाढ लागू, सामान्यांच्या खिशाला कात्री

निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच प्रत्येक प्रभागाचा स्वतंत्र अभ्यास, सामाजिक समीकरणांचा आढावा, इच्छुक उमेदवारांची चाचपणी आणि कार्यक्षम उमेदवारांची निवड करण्यात आली. प्रचारातही केवळ भाषणांवर न थांबता घराघरात पोहोचणारा थेट संवाद, कार्यकर्त्यांची जबाबदारी निश्चिती आणि सातत्यपूर्ण संपर्क यावर भर देण्यात आला. संतोष बांगर यांनी संपूर्ण प्रचारकाळात स्वतः मैदानात उत्तरून प्रत्येक प्रभागावर लक्ष केंद्रित केले. कार्यकत्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणे, नाराज घटकांना समजावून घेणे आणि शेवटच्या क्षणापर्यंत नियंत्रण ठेवणे, हे त्यांचे संघटन कौशल्य ठळकपणे दिसून आले. याचाच परिणाम म्हणजे शहरातील विविध प्रभागांत शिवसेनेला सातत्यपूर्ण मताधिक्य मिळाले.

फेरबांधणीची गरज

राजकीय विश्लेषकाच्या मते, या निकालाने स्पष्ट संदेश दिला आहे की केवळ सत्ता, मोठी नावे किवा सभा ठरत नाहीत. मजबूत विश्वास आणि तळागाळातील काम याशिवाय निवडणूक जिंकता येत नाही. भाजपसाठी हा निकाल आत्मपरीक्षणाचा इशारा असून, संघटनात्मक फेरबांधणीची गरज अधोरेखित करणारा ठरला आहे. एकूणच हिंगोली नगर परिषदेचा निकाल हा भाजपसाठी मोठा धक्का मानला जात असून, शिवसेनेच्या संघटनात्मक ताकदीचा आणि संतोष बांगर यांच्या नेतृत्वाचा ठोस पुरावा म्हणून या निकालाकडे पाहिले जात आहे.

Web Title: Bjp defeated in hingoli shiv sena wins due to santosh bangar efforts nanded news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 26, 2025 | 07:01 PM

Topics:  

  • nanded news
  • political news
  • Santosh Bangar

संबंधित बातम्या

Thane News : राष्ट्रगीत अपमानाच्या आरोपांवरून ठाण्यात राजकारण तापले; शिवसेनेकडून भाजपवर पलटवार
1

Thane News : राष्ट्रगीत अपमानाच्या आरोपांवरून ठाण्यात राजकारण तापले; शिवसेनेकडून भाजपवर पलटवार

विधान परिषदेच्या रिक्त जागांसाठी निवडणूक कार्यक्रम लवकरच होणार जाहीर; अडीच वर्षांपासून जागा रिक्त
2

विधान परिषदेच्या रिक्त जागांसाठी निवडणूक कार्यक्रम लवकरच होणार जाहीर; अडीच वर्षांपासून जागा रिक्त

Aaditya Thackeray: आदित्य ठाकरेंनी साधला सरकारवर निशाणा
3

Aaditya Thackeray: आदित्य ठाकरेंनी साधला सरकारवर निशाणा

पंतप्रधान मोदींच्या ‘त्या’ आवाहनाचा राज ठाकरेंकडून खरपूस समाचार; म्हणाले, ‘मग शेकडो गाड्यांचा ताफा…’
4

पंतप्रधान मोदींच्या ‘त्या’ आवाहनाचा राज ठाकरेंकडून खरपूस समाचार; म्हणाले, ‘मग शेकडो गाड्यांचा ताफा…’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.