भारतीय रेल्वे लांब पलल्याच्या प्रवासी तिकीट दरामध्ये वाढ 26 डिसेंबरपासून लागू केली (फोटो - सोशल मीडिया)
आजपासून म्हणजेच २६ डिसेंबरपासून, २१५ किमी पेक्षा जास्त अंतराच्या प्रवासासाठी, सामान्य वर्गात प्रति किमी १ पैसे आणि मेल/एक्सप्रेसमध्ये प्रति किमी २ पैसे भाडे वाढवण्यात आले आहे. हा निर्णय ५ दिवसांपूर्वी जाहीर करण्यात आला होता आणि आता तो लागू करण्यात आला आहे. हा बदल २६ डिसेंबर रोजी किंवा त्यानंतर बुक केलेल्या तिकिटांवर लागू होईल. आधीच बुक केलेल्या तिकिटांवर कोणताही परिणाम होणार नाही. या वर्षीची ही दुसरी वाढ आहे, मागील भाडेवाढ जुलैमध्ये करण्यात आली होती. यामुळे रेल्वेचा प्रवास देखील महाग झाला आहे.
हे देखील वाचा : एकेकाळी सत्तेवर, आता एकाकी! राष्ट्रीय पक्ष काँग्रेसची अवस्था झाली बिकट; पक्षात उरला एक नगरसेवक
रेल्वेने ही भाडे वाढ जास्त अंतर असलेल्या प्रवासासाठी करण्यात आली आहे. कमी अंतराचा प्रवास करणाऱ्या दैनंदिन वेतनधारक आणि व्यावसायिकांना लक्षात घेऊन, रेल्वेने सामान्य श्रेणीतील २१५ किमी पर्यंतच्या प्रवासाचे भाडे वाढवलेले नाही. रेल्वेने म्हटले आहे की सामान्य श्रेणीतील गाड्यांमध्ये २१५ किमी पर्यंत प्रवास करणाऱ्यांच्या खिशावर कोणताही भार पडलेला नाही. तथापि, २१५ किमी पेक्षा जास्त प्रवासासाठी, सामान्य श्रेणीतील तिकिटांचे भाडे प्रति किलोमीटर एक पैशाने वाढवण्यात आले आहे.
हे देखील वाचा : पुण्यात आघाडीत बिघाडी? वरिष्ठांच्या आदेशाने स्थानिक काॅंग्रेसच्या नेत्यांची कोंडी
रेल्वे मंत्रालयाने काय सांगितले?
तेजस राजधानी, राजधानी, शताब्दी, दुरांतो, वंदे भारत, हमसफर, अमृत भारत, तेजस, महामना, गतिमान, अंत्योदय, गरीब रथ, जन शताब्दी, युवा एक्सप्रेस, नमो भारत रॅपिड रेल आणि सामान्य उपनगरीय नसलेल्या सेवा (लागू असल्यास एसी, मेमू, डेमू वगळता) या प्रमुख रेल्वे सेवांचे सध्याचे मूळ भाडे मंजूर वर्गनिहाय मूलभूत भाड्यांनुसार सुधारित करण्यात आले आहे. रेल्वेने स्पष्टपणे सांगितले आहे की भारतीय रेल्वेच्या या सर्व विशेष सेवा देखील या वाढीव भाड्यासाठी मात्र असणार आहेत. सुधारित दर या सर्व गाड्यांना लागू असतील. मात्र हे वाढलेले शुल्क २६ डिसेंबरपूर्वी रेल्वे तिकिटे बुक करणाऱ्यांना लागू होणार नाही. यानंतर करण्यात आलेल्या बुकिंगसाठी वाढीव शुल्क लागू करण्यात आले आहे.






