७५७ गावांत रंगणार ‘एक गाव, एक गणपती’; सामाजिक एकोप्यासाठी जिल्हा पोलिसांचा विशेष उपक्रम (फोटो सौजन्य-ChatGPT)
ग्रामीण भागात एकीकडे ‘एक गाव, एक गणपती’चे चित्र असताना, दुसरीकडे मोठ्या गावांमध्ये आणि तालुक्यांच्या ठिकाणी उत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आहे. जिल्ह्यातील ४० पोलीस ठाण्यांच्या हद्दीत सुमारे २ हजारांपेक्षा जास्त सार्वजनिक गणेश मंडळांनी परवानग्यांसाठी अर्ज दाखल केले आहेत.
जिल्ह्यात गेल्या पाच-सहा वर्षांपासून ‘एक गाव, एक गणपती’ ही संकल्पना यशस्वीरीत्या राबवली जात आहे. त्यामुळे गावागावांतील लहान-मोठे तंटे, स्पर्धा आणि गटबाजी दूर होऊन सर्व धर्मीय व सर्व धडे एकत्र येऊन गणेशोत्सव साजरा करतात, सन २०१७ मध्ये जिल्ह्यातील तब्बल १,०२६ गावांनी हा उपक्रम राबवला होता, कोरोना काळानंतर काही ठिकाणी बदल झाले. असले तरी, २०२३ मध्ये ७३४ तर २०२५ मध्ये ८०४ गावांत ही परंपरा जपली गेली. यंदा २०२६ मध्ये ७५७ गावांनी या उपक्रमात सहभाग नोंदवला आहे. पोलिस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी, अपर अधीक्षक विमला एम. आणि सूरज गुंजाळ यांनी गावपातळीवर प्रत्यक्ष बैठका घेऊन या उपक्रमाला विशेष प्रोत्साहन दिले आहे.
गणेशोत्सव निर्विघ्नपणे पार पडावा यासाठी ग्रामीण पोलिसांनी कंबर कसली आहे. सर्व ४० पोलीस ठाण्याच्या हद्दीत शांतता समितीच्या बैठका घेण्यात आल्या, मालेगाव, मनमाड, येवला शहर आणि सटाणा या संवेदनशील भागांमध्ये अतिरिक्त पोलीस बल तैनात केले आहे. तसेच बॉम्बशोधक व नाशक पथक, दहशतवादविरोधी पथक आणि जलद प्रतिसाद पथक सतर्क ठेवण्यात आले आहे. गुडमॉर्निंग पथके, गस्ती पथके आणि बीट मार्शलच्या माध्यमातून प्रत्येक हालचालीवर नजर ठेवली जाणार असून, विसर्जन मिरवणुकीच्या वेळी दर दोन तासांनी पोलीस नियंत्रण कक्षात प्रत्येक घडामोडीची नोंद घेतली जाईल. पोलिसांच्या या नियोजनबद्ध प्रयत्नांमुळे यंदाचा गणेशोत्सव ग्रामीण भागात पुन्हा एकदा सौहार्द आणि उत्साहाचे प्रतीक ठरणार आहे.
शिवडीच्या राजाच्या अमृतमहोत्सवी वर्षात अनोखा देखावा; मुंबईत साकारली ‘पाण्याखालची द्वारका’






