
भाजप-राष्ट्रवादीचे 'तळ्यात मळ्यात; स्पष्ट बहुमत असूनही 'रिसॉर्ट पॉलिटिक्स'चा मार्ग; महायुतीला क्रॉस व्होटिंगची धास्ती ? (फोटो सौजन्य-X)
शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक शनिवारीच सहलीसाठी रवाना झाले आहेत. मात्र, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक रविवारी बाहेर पडतील असा दावा केला जात असतानाही प्रत्यक्षात दोन्ही पक्षांचे नगरसेवक जागच्या जागीच राहिले. भाजपकडून आता सोमवारी दुपारी नगरसेवक रवाना होतील, असे सांगण्यात येत आहे, तर राष्ट्रवादीत अद्याप यावर निर्णयच झालेला नसल्याचे नाशिक शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांनी सांगितले.
दुसरीकडे, राष्ट्रवादीच्या काही नगरपालिकेचे नगरसेवक सहलीसाठी निघाल्याची माहिती एका पदाधिकाऱ्याने दिली आहे. त्यामुळे महायुतीतील दोन्ही प्रमुख पक्षांच्या पदाधिकाऱ्यांमध्ये सध्या ‘तळ्यात मळ्यात’ सुरू असल्याचे चित्र आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, सर्व नगरसेवकांना प्रथम ठाण्यात एकत्र आणून त्यानंतर गुप्तस्थळी हलविण्याची तयारी आहे.
महायुतीकडे या निवडणुकीत कागदावर तरी स्पष्ट संख्याबळ आहे. यामध्येः एवढे भक्कम संख्याबळ पाठीशी असूनही नगरसेवकांना सहलीवर पाठविण्याची वेळ का आली, असा प्रश्न राजकीय वर्तुळात उपस्थित होत आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत मतदार संख्या मर्यादित असल्याने प्रत्येक मत निर्णायक ठरते. गुप्त मतदान, पसंतीक्रमाची पद्धत आणि मतपत्रिकेवर कायम असलेली अन्य उमेदवाराची नावे यामुळे एखादे मत जरी चुकीच्या ठिकाणी गेले किवा ‘क्रॉस व्होटिंग’ झाले, तर गणिते बिघडू शकतात. हाच घोका टाळण्यासाठी महायुतीने सावध पवित्रा घेतला आहे.
विधान परिषद निवडणुकीच्या या रिसॉर्ट राजकारणामुळे नाशिकच्या सामान्य नागरिकांमधून मात्र तीव संताप व्यक्त होत आहे.
शहरात पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते, ड्रेनेज आणि वीजपुरवठा यांसारख्या अनेक नागरी समस्या गंभीर बनल्या आहेत. अशा वेळी नागरिकांना आपल्या लोकप्रतिनिधींची गरज असताना लोकप्रतिनिधी मात्र सहलीचा आनंद घेत आहेत. लोकप्रतिनिधी सहलीवर आणि नागरिक प्रश्नांसह प्रतीक्षेत असेच चित्र सध्या नाशिकमध्ये पाहायला मिळत आहे.
नगरसेवकांच्या या राजकीय सहलीबरोबरच त्यांना ‘टोकण’ मिळणार असल्याच्या चर्चानी नाशिकच्या राजकीय वर्तुळात चांगलाच जोर धरला आहे. ही निवडणूक जवळपास एकतर्फी मानली जात असली, तरी मतदान प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आणि मतदारांना सुरक्षित ठेवण्यासाठी मीठा खर्च केला जात असल्याची कुजबुज सुरू आहे, मात्र याला कोणताही अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.
भाजपाचे नगरसेवक एकत्र येऊन मतदान प्रक्रिया व वरिष्ठांचे मार्गदर्शन घेण्याकरिता उद्या जाणार आहे. सर्व उमेदवारांनी जाहीर माधार घेतल्यामुळे निवडणूक औपचारिकता राहिली आहे. माधारीची मुदत संपल्यानंतर दोन उमेदवारांनी माघार घेतली. त्यामुळे त्यांचे नावे मतपत्रिकेवर रहाणार आहे. त्यामुळे मतदारांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार सर्व मतदारांना मार्गदर्शन करणार आहे. त्याकरिता सर्व नगरसेवक जातील, अशी प्रतिक्रिया नाशिक महानगर जिल्हा भाजप न सुनील केदार यांनी दिली.
भाजप – सुमारे 190 नगरसेवक
शिवसेना – 171 नगरसेवक
राष्ट्रवादी काँग्रेस – 107 नगरसेवक