
नाशिकमध्ये जलसंकट टळले! मोठ्या व मध्यम धरणांमध्ये ८८.०७ टक्के उपयुक्त पाणीसाठा
पालखेड धरण समूहात करंजवण ८६.९ टक्के व वाघाड १०० टक्के पूर्ण भरले आहे. तसेच ओझरखेड व तिसगाव धरणेही १०० टक्के भरले आहे. दारणा धरणामध्ये ६ हजार १४३ दलघफू (८५.९३ % ) पाणीसाठा उपलब्द आहे. तर भावली आणि वालदेवी १०० टक्के भरली आहे.
गिरणा खोऱ्यातील प्रकल्पांमध्ये यंदा मोठ्या प्रमाणात पाण्याचा येवा झाला आहे. चणकापूर, हरणबारी, केळझर आणि गिरणाचे धरणे पावसाच्या पाण्याने तुडुंब भरली आहे. गिरणा धरणात १८ हजार १०१ दलघफू (९७.८४ %) पाणीसाठा जमा झाला असून गिरणा खोरे समूहात एकूण ९४.६० टक्के पाणीसाठा नोंदविला गेला आहे.
नाशिक जिल्ह्याला पाणीपुरवठा करणाऱ्या गोदावरी आणि गिरणा खोऱ्यातील प्रकल्पांमध्ये पाण्याची आवक वेगाने सुरु आहे. सात मोठे व १९ मध्यम प्रकल्पांची एकूण उपयुक्त पाणीसाठा क्षमता ७० हजार ६१९ दलघफू एवढी असून, आजमितीस त्यामध्ये ६२ हजार १९१ दलघफू म्हणजेच ८८.०७ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. मागील वर्षी याच दिवशी ७५.२० टक्के पाणीसाठा होता, जो यंदा १२. ८७ टक्यांनी अधिक आहे. मात्र असे असले तरी पाण्याचे नियोजन करताना प्रशासनाला आगामी सिंहस्थ कुंभमेळा व अमृतस्नानाच्या पर्वणीसाठी सोडाव्या लागणाऱ्या पाण्याचा विचार करून नियोजन करावे लागणार आहे.
Nashik Scandal: तांत्रिक खरातने दिला नरबळी: सुनावणीदरम्यान सरकारी वकिलाचा खळबळजनक संशय