
शेतकरी चिंतेत ! पूर्वमान्सूनची साथ नाही; येवला तालुक्यात खरीप हंगामावर संकटाची छाया
गेल्या वर्षी मृग नक्षत्र सुरू होण्यापूर्वीच अनेक भागांत चांगल्या पावसाची नोंद झाली होती. त्यामुळे शेतकऱ्यांनी बाजरी, मका, सोयाबीन, मूग, उडीद आणि कापूस पिकांच्या पेरण्या सुरू केल्या होत्या. अनेक शेतांमध्ये पेरणीची कामे पूर्णही झाली होती. यंदा मात्र पावसाची परिस्थिती निराशाजनक असल्याने शेतकऱ्यांना प्रतीक्षा करावी लागत आहे. तालुक्यात अधूनमधून ढगाळ वातावरण, वादळी वारे आणि विजांचा कडकडाट होत असला तरी पेरणीसाठी आवश्यक असलेला पाऊस झालेला नाही. काही भागांत किरकोळ सरी कोसळल्या असल्या तरी त्यामुळे जमिनीत आवश्यक ओलावा निर्माण झालेला नाही. परिणामी शेतकऱ्यांनी पेरणीचा निर्णय पुढे ढकलला आहे.
हवामान खात्याने पुढील काही दिवसांत मान्सून सक्रिय होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पावसावर टिकून आहेत. दरम्यान, मान्सून उशिरा सक्रिय झाल्यास खरीप हंगामाचे नियोजन आणि पिकांची निवड यावरही परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
खरीप हंगामासाठी लागणारे बियाणे, खते आणि मशागतीची कामे बहुतांश शेतक-यांनी पूर्ण केली आहेत, मात्र पाऊस नसल्याने ही सर्व तयारी सध्या प्रतीक्षेतच आहे. कृषी विभागाकडूनही घाईघाईने पेरणी न करण्याचा सल्ला देण्यात येत आहे. पुरेसा व सातत्यपूर्ण पाऊस झाल्यानंतरच पेरणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. गतवर्षी जून २०२५ पर्यंत तालुक्यात सरासरी १५.५० मिमीच्या तुलनेत ८८७० मिमी पावसाची नोंद झाली होती. अनेक मंडळांमध्ये सरासरीपेक्षा कितीतरी पटीने अधिक पाऊस झाला होता, यंदा मात्र बेमोसमी आणि मोसमी अशा दोन्ही प्रकारच्या पावसाने दडी मारल्याचे वित्र आहे.
हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार पावसाला सुरुवात होणे अपेक्षित आहे. सध्या जमीन तात झालेली आहे. आता पाऊस झाला जमीन पूर्णतः भिजल्यावर व वापसा झाल्यावरच पेरणी तरी शेतक-यांनी लगेच पेरणी करण्याची घाई करू नये. जमीन पूर्णत: भिजल्यावर व वापसा झाल्यावरच पेरमी करावी, अशी माहिती तालुका कृषी अधिकारी, येवला , शुभम बेरड यांनी दिली.
‘ठाण्यातील धोकादायक इमारतींमधील नागरिकांना…’; DCM एकनाथ शिंदेंचे गती देण्याचे निर्देश