
Vasai Mumbai–Ahmedabad Highway
महामार्गावरील मालजीपाडा, ससूनवघर, ससुपाडा यासह अनेक गाव-पाड्यात १०वी आणि १२वीचे विद्यार्थी आहेत. त्यांना वरई, नायगाव याठिकाणी असलेल्या परीक्षा केंद्रांवर ये-जा करताना वाहतूक कोंडीचा फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे संतापलेल्या भूमीपूत्र फाऊंडेशनच्या कार्यकत्यांनी काम बंद पाडले, अशी माहिती अध्यक्ष सुशांत पाटील यांनी दिली. मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील कॉक्रिटीकरणाचे काम गेल्या अनेक महिन्यांपासून रखडले असून त्यामुळे वाहनचालकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. काम अपूर्ण अवस्थेत असताना रस्त्यावर पडलेले खडे, उखडलेले सिमेंट, धुळीचे लोट आणि अपुऱ्या वाहतूक व्यवस्था यामुळे या मार्गावर अपघातांचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढले आहे.
महामार्ग प्राधिकरणाकडून लवकरच काम पूर्ण करण्याचे आश्वासन दिले जात असले तरी प्रत्यक्षात कामाची गती अत्यंत मंद आहे. पावसाळ्यापूर्वी रस्ता पूर्ण न झाल्यास परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नागरिकांनी सुरक्षिततेसाठी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन पोलिस प्रशासनाकडून करण्यात येत असते. दुसरीकडे, रखडलेल्या कामासाठी जबाबदार ठेकेदारांवर कारवाई करावी आणि अपघातग्रस्तांना तातडीची मदत मिळावी, अशी मागणी विविध सामाजिक संघटनांकडून केली जात आहे.
विशेषतः वसई, विरार, मनौर, चारोटी आणि तलासरी परिसरात महामार्गाची अवस्था अत्यंत खराब झाली आहे. अनेक ठिकाणी एकाच वेळी दोन्ही बाजूचे रस्ते खोदण्यात आल्याने वाहतूक कौडी नित्याचीच झाली आहे. अवजड वाहनांमुळे उडणारी धूळ दुचाकीस्वारांसाठी धोकादायक ठरत असून रात्रीच्यावेळी अपुऱ्या प्रकाशव्यवस्थेमुळे अपघातांचा धोका अधिक वाढतो आहे. स्थानिक नागरिक व प्रवासी संघटनांनी महामार्ग प्राधिकरणाच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली आहे. ठरलेल्या मुदतीत काम पूर्ण न झाल्याने प्रवाशाचे हाल होत असून वेळेवर कार्यालय, रुग्णालये किंवा व्यवसायाच्या ठिकाणी पोहोचणे कठीण झाले आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या अपघातांमध्ये अनेक जण जखमी झाल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत.
डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.