
Fishing Ban in Vasai
काळ योग्य नसतानादेखील बंदी
प्रत्यक्षात येथील कोठी महिलांनी आपल्या रोजगारावर याचा विपरीत परिणाम झाला असल्याची माहिती दिली. माजी नगरसेवक मच्छीमार सोसायटीचे माजी अध्यक्ष संजय कोळी यांनी या धोरणावर कडाडून टीका केलेली आहे. बाहेरून मासे आणून विकणाऱ्या महिलांवर सुद्धा सोसायटीने आक्षेप घेतला आहे. हा बंदी काळ योग्य नसताना ही बंदी थोपावली असल्याचा आरोप कोळी यांनी केला आहे.
सोसायटीने बंदी करून मत्स्यबीज वाढणार आहे का ?
वसईत मासेमारी व्यवसायातून कोट्यावधीची उलाढाल सुरू असते. विविध ठिकाणी वसईतील मासळीला मोठ्या प्रमाणात मागणी असते. मागील काही दिवसांपासून मासळी उपलब्ध नसल्यामुळे बाहेरून मासे आणून विक्री केली जाते. परिणामी मासळीचे भाव वाढलेले आहेत. केवळ पाचुबंदर व किल्लाबंदर भागातील मच्छीमार सोसायटीने चंदी करून मलयबीज वाढणार आहे का?, असा संतप्त सवाल कोळी कुटुंबियांनी केला आहे. दुसरीकडे मच्छिमार सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी गावाची सभा घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती वसई मच्छिमार सोसायटीचे सेक्रेटरी अजित – बोंबुल यांनी दिली. मागील २ वर्षांपासून हा बंदी काळ सुरू असून त्याचे सकारात्मक परिणाम असल्याचा दावाही केलेला आहे.
हे देखील वाचा : Vasai : वसईत ज्ञानाचा जागतिक संगम! IC3ET 2026 आंतरराष्ट्रीय परिषद यशस्वी
डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.