नागपुरातील 'त्या' प्रॉपर्टी डिलरच्या आत्महत्येप्रकरणी 16 जणांवर गुन्हा दाखल; सुसाईड नोटमध्ये...(File Photo : Crime)
पालघर/संतोष पाटील : पालघरमध्ये कौटुंबिक वादातून हत्या झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पालघर शिवसेना पदाधिकारी अशोक धोडी गेले 12 दिवस बेपत्ता होते. मात्र अखेर या `12 दिवसांनंतर धोडी यांचा मृतदेह गुजरातमधील भिलाड सरिग्राम येथील बंद दगड खाणीत 40 फूट खोल पाण्यात आढळला. पोलीस तपासात असं लक्षात आलं की, कौटुंबिक वादातून धोडी यांच्या लहान भाऊ अविनाश धोडी यांनीच अशोक धोडी यांची हत्या केली आहे. अविनाश धोडी दारू तस्करीच्या अवैध धंद्यात गुंतलेला होता, आणि अशोक धोडी यांच्या विरोधामुळे ही हत्या घडल्याचं उघड झालं आहे. या प्रकरणात 4आरोपी अटकेत असून, मुख्य आरोपी अविनाशसह 3 जण फरार आहेत. दरम्यान या सगळ्या प्रकरणावर पालघर पोलीसांचा तपास सुरु आहे.
बारा दिवसांपासून बेपत्ता असलेल्या शिवसेना पदाधिकारी अशोक धोडी यांचा शोध घेण्यात अखेर पालघर पोलिसांना यश आलं आहे . गुजरातमधील भिलाड पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या सरिग्राम येथील एका बंद दगड खाणीच्या पाण्यात 40 फूट खोल अशोक धोडी यांचा मृतदेह आणि त्यांची गाडी आढळून आली आहे . कौटुंबिक वाद आणि इतर वादातून त्यांच्या भावानेच आपल्या साथीदारांना सोबत घेऊन अशोक धोडी यांची हत्या केल्याचं यानंतर उघड झालंय.
20 जानेवारीपासून बेपत्या असलेल्या अशोक धोडी यांचा शोध घेण्यात अखेर पालघर पोलिसांना बारा दिवसानंतर यश आल . मुंबईतून घरी परतत असताना अशोक धोडी यांच्या भावानेच त्यांचं अपहरण करून हत्या केल्याचं आता जवळपास निश्चित झालं . मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी आरोपींनी गुजरातच्या सरिग्राम येथील दगड खाणीत अशोक धोडी यांचा मृतदेह आणि गाडी थेट 40 फूट खोल पाण्यात ढकळली . आज बारा दिवसानंतर पालघर पोलिसांना अशोक धोडींसह त्यांच्या गाडीचा शोध घेण्यात यश आल आहे . तब्बल सात तासांच्या अथक प्रयत्नानंतर पालघर पोलिसांनी अशोक धोडी यांचा मृतदेह गाडीसह बाहेर काढला.
कौटुंबिक वाद आणि इतर वादातून अशोक धोडी यांचा लहान भाऊ अविनाश धोडी यांनीच आपल्या सहकारी आरोपींसह अशोक धोडी यांचं अपहरण करून त्यांची हत्या केल्याच आता उघड झाला आहे . आरोपी अविनाश धोडी याचा दारू तस्करीचा अवैध्य धंदा असून या धंद्यात अशोक धोडी अडचण ठरत असल्याने अविनाश धोडी यांनी अशोक धोडी यांच अपहरण करून हत्या केली . या प्रकरणात चार आरोपींना अटक केली असून मुख्य आरोपी अविनाश धोडी याच्यासह आणखीन तीन आरोपी फरार आहेत . या फरार आरोपींचा पालघर पोलीस सध्या शोध घेत आहेत . त्यांचाही लवकरच शोध घेऊन अटक केलं जाईल असा विश्वास यावेळी पालघरच्या पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी धोडी कुटुंबाला दिला .
बारा दिवसानंतर अशोक धोडी यांचा मृतदेह शोधण्यात पालघर पोलिसांना यश आल्याने अशोक धोडी यांचा मुलगा आकाश धोडी यांनी पोलीस प्रशासनाच्या कामगिरीवर समाधान व्यक्त केलं . मात्र माझ्या वडिलांचा जीव गेला त्याप्रमाणे आरोपींना देखील फाशीची शिक्षा द्यावी असं सांगतानाच त्यांनी आमच्या कुटुंबीयांनाही आरोपीं पासून धोका असल्याची भीती व्यक्त केली . तसंच मुख्य आरोपी अविनाश धोडी याला लवकरात लवकर अटक करून त्याला कठोर शिक्षा करावी अन्यथा आमच्या गावातील नागरिकांना देखील त्याच्यापासून धोका असल्याच देखील यावेळी आकाश धोडी .यांनी सांगितलं आहे. बेपत्ता अशोक धोडी यांचा शोध घेण्यात तब्बल 12 दिवसानंतर पालघर पोलिसांना यश आलं . मात्र अजूनही तीन ते चार आरोपी फरार आहेत . फरार आरोपींवर अनेक गुन्हे दाखल असून त्यांची तलासरी सह डहाणूत मोठी दहशत आहे . त्यामुळे पालघर पोलिसांनी आता या आरोपींच्या कायमच्या मुस्क्या आवळण्याची गरज निर्माण झाली आहे, असं मत अशोक धोडी यांचा मुलगा आकाश धोडी यांनी व्यक्त केलं आहे.