
Palghar-Vikramgad
कुठलेही पत्र मी दिलेले नाही…
या कामाची निविदा प्रक्रिया झाली असून कार्यारंभ आदेश न देता, या कामाला सुरुवात करू नये असे पत्र कार्यकारी अभियंता यांना उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) यांनी या पत्रांचे नमुद केले आहे. यासंदर्भात प्रकाश निकम, माजी अध्यक्ष, जिल्हा परिशद पालघर यांचे पत्र दि. २३ जानेवारी २०२५ प्रमाणे कळविले आहे. याबाबत प्रकाश निकम यांचेशी मोबाईलद्वारे संपर्क केला असता, त्यांनी सांगीतले की, मी काम रदद करण्यासंदर्भात कुठलेही पत्र दिलेले नाही, नविन कामास मान्यता देणे बाबत सांगण्यात आले होते. मी याबाबत चोकशी करतो.
चिचधर-आपटी सरपंच पुनम लहांगे यांनी म्हटले आहे की, हा रस्ता मंजूर झाला कारणास्तव रद्द करण्याची प्रक्रिया होत आहे?, हा रस्ता खूप खराब झाल्याने ग्रामस्थांना अडचणी उदभवत असल्याने रस्ता होणे अत्यंत आवश्यक आहे.
कोणत्या कारणाने प्रक्रिया रद्द ?
परंतु रस्ता हा अत्यंत खराब झालेला असून रस्त्यांचे काम होणे अत्यंत आवश्यक असतानाही उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी काम रद्द चे पत्र काढल्याने हा रस्ता कोणत्या कारणास्तव रद्द करण्याची प्रक्रिया होत आहे? असा सावाल ग्रामस्थांनी पडला आहे. रस्ता नसल्याने पावसाळयांत व इतर वेळेसही मोठ्या अडचणींचा सामाना येथील ग्रामस्थ, शाळकरी विद्यार्थी व आरोग्य सेवेपर्यंत पोहचण्याकरीता अडचणीचे ठरत आहे. यासाठीच ग्रामस्थ रस्त्यांवर उतरून आंदोल करण्याचे पवित्रा हाती घेणार आहेत.
डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.