या अपघाताची खबर धुळदेव गावात अनेक ग्रामस्थांनी समजताच अपघातस्थळी धाव घेत जखमींना बाहेर काढत म्हसवड पोलीसांना याबाबत कळवले, सदर अपघाताची माहिती मिळताच पो. कॉ. अभिजीत भादुले, पो.ना. लुबाळ व पो. हवा. हांगे हे तात्काळ घटनास्थळावर पोहचले, त्यांनी ग्रामस्थांच्या मदतीने १०८ या – रुग्णवाहिकेतून सर्व जखमींना म्हसवड येथील संचित रुग्णालयात आणले त्याठिकाणी जखमींवर प्राथमोपचार करुन त्यांना पुढील उपचारासाठी तातडीने सातारा येथील डॉ क्रांतिसिह रुग्णालयात पाठवले.
रस्त्याचे काम रखडल्याने अपघाताची मालिका
दरम्यान सदर अपघातामुळे धुळदेव ग्रामस्थ अधिकच आक्रामक झाले असून या अपघातास प्रशासनच जबाबदार असल्याचे त्यांचे म्हणणे आहे, सातारा ते सोलापुर हा राष्ट्रीय महामार्ग असून धुळदेव गावच्या हद्दीतच या रस्त्याचे काम गत ८ वर्षापासून रस्ते विकास महामंडळाकडून रखडवण्यात आले आहे, सदरचे काम पुर्ण करावे यासाठी आजवर येथील ग्रामस्थांनी अनेकदा आंदोलने करुन प्रशासनाला याचा जाब विचारला आहे, मात्र प्रशासनाने त्यांची फक्त बोळवणच केल्याने अपघातांची मालिका येथे आज ही सुरु असुन आजवर जवळपास २० जणांना याठिकाणी आपला जीव गमवावा लागला आहे, तर आजवर जवळपास ३०० हुन अधिक छोटे – मोठे अपघात याठिकाणी झाले असुन आणखी कितीजणांचा जीव गेल्यावर प्रशासनाला या रस्तेकामी जाग येणार असा संतप्त सवाल घुळदेव ग्रामस्थानी व्यक्त केला आहे.
आणखी एक अपघात पती – पत्नी गंभीर
सातारा-लातूर या राष्ट्रीयमार्गावरील माण तालुक्यातील पळशी फाटा परिसरात खराब आणि धोकादायक रस्त्यामुळे आणखी एक गंभीर अपघात घडल्याची घटना समोर आली आहे. या अपघातात पती-पत्नी गंभीर जखमी झाले असून परिसरातील नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सविता शेळके (वय ४७) आणि रामचंद्र शेळके (वय ५२, मूळ गाव माळशिरस, सध्या रा. सातारा) है कामानिमित्त साताऱ्यात वास्तव्यास आहेत, ते आपल्या गावी माळशिरस येथे जात असताना माण तालुक्यातील पळशी फाटा येथे रस्त्याची अत्यंत खराब अवस्था असल्याने त्यांच्या वाहनावरील ताबा सुटला. त्यांची गाडी घसरून अपघात झाला, यामध्ये दोघांनाही गंभीर दुखापत झाली आहे. अपघातानंतर जयप्रकाश अवघडे या युवकाने तत्परता दाखवत जखमीना गोंदवले खुर्द येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.






