Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bacchu Kadu: “सैनिक कमी पडत असतील, तर…”; भारत-पाकिस्तान संबंधांवर बच्चू कडूंचे मोठे विधान

निवडणुकीत लाडक्या बहिणीला २१०० रुपये देणार आहे असे सांगितले मात्र अजून हे १,५०० वरच  अडकले आहेत, अशी टीका बच्चू कडू म्हणाले आहेत.

  • By तेजस भागवत
Updated On: May 12, 2025 | 05:53 PM
Bacchu Kadu: “सैनिक कमी पडत असतील, तर…”; भारत-पाकिस्तान संबंधांवर बच्चू कडूंचे मोठे विधान
Follow Us
Close
Follow Us:

सोलापूर: आज माजी राज्यमंत्री आणि प्रहार पक्षाचे नेते  बच्चू कडू सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भारत पाकिस्तान संबंध, महायुती सरकार, लाडकी बहीण योजना, प्रहार पक्षाचे आंदोलन, राष्ट्रवादी कोंग्रेस पक्ष एकत्रित येणाच्या विषयांवर भाष्य केले आहे. बच्चू कडू नेमके काय म्हणाले आहेत, ते जाणून घेऊयात.

प्रहार पक्षाचे नेते आणि माजी राज्यमंत्री बच्चू कडू म्हणाले, ” पाकिस्तान नेहमीचे दुखणे आहे ते बंद केले पाहिजे. एकसारखे पाकिस्तान आपल्या कुरापती काढत असतो. जसे इंदिरा गांधी यांनी बांगलादेश वेगळा केला, तसाच आपण पाकिस्तान भारतात घ्यावा. त्यासाठी जर सैनिक कमी पडत असतील, तर प्रहारचा कार्यकर्ता आणि बच्चू कडू तयार आहेच.”

राष्ट्रवादी कॉँग्रेसचे दोन्ही गट एकत्रित येण्यावरून बोलताना बच्चू कडू म्हणाले, “दोन्ही राष्ट्रवादी कॉँग्रेस एकत्रित आल्या तरी जनतेचे काय भले होणार आहे. राष्ट्रवादी कधी वेगळी होती? पवार साहेब आणि अजित दादा हे वेगळे होते हे शक्य आहे का? दोन्ही राष्ट्रवादी एकत्रच होत्या.”

कसे असणार प्रहारचे आंदोलन? 

येत्या २ जूनपासून आमचे आंदोलन सुरू होईल. ३ जून रोजी बारामतीमध्ये आमची सभा होईल. ७ जून रोजी नागपूरकडे कूच करणार आहोत. त्या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरासमोर आम्ही आंदोलन करणार आहोत. बावनकुळे म्हणतात 5 वर्षात आम्ही कधीही कर्जमाफी करू. सरकार जनतेला फसवण्याचे काम करत आहेत.”

लाडकी बहीण योजना

महायुती सरकारच्या महत्वाच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवर बच्चू कडू बोलले आहेत. निवडणुकीत लाडक्या बहिणीला २१०० रुपये देणार आहे असे सांगितले मात्र अजून हे १,५०० वरच  अडकले आहेत. सरकारला लाडका शब्द हा कडवट होत आहे. लाडक्या बहिणीवर आणि लाडक्या शेतकऱ्यांवर ही राज्य सरकारचे लक्ष नाही. आम्ही शेतकऱ्यांच्या मागणीसाठी बारामतीतून आंदोलन करणार आहोत.”

विजय वडेट्टीवारांची भाजपवर सडकून टीका

कॉँग्रेस नेते विजय वडेट्टीवार अवकाळी पावसावर बोलताना म्हणाले, “अवकाळी पावसामुळे प्रचंड नुकसान आहे. पान नुकसणीचे पंचनामे करून अहवाल देण्याचे निर्देश अजून सरकारने दिलेले नाहीत. इतकं नुकसान होउनही शेतकऱ्यांच्या व्यथा सरकार का? समजून घेत नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र देऊन रब्बी पिकांच्या नुकसणीसाठी शेतकऱ्यांना हेक्टरी पंचवीस हजार रुपये मदत देण्याची मागणी आम्ही करणार आहे.”

Vijay Wadettiwar: विजय वडेट्टीवारांची भाजपवर सडकून टीका; म्हणाले, “राष्ट्रवादीची भूमिका भाजपच्या…”

“भाजपची नीती वापरा आणि फेका अशी आहे. एका पक्षाचा वापर झाला असेल त्यामुळे दुसरा पक्ष सोबत घ्यायचा, याच्यामध्ये राजनीती स्पष्ट आहे. शरद पवारांची भूमिका काय आहे यावर आताच भाष्य करणे योग्य होणार नाही. एकूणच राष्ट्रवादीची भूमिका भाजपच्या डावपेचाचा भाग आहे.राष्ट्रीय पक्ष कमकुवत झाला की प्रादेशिक पक्ष संपवण्याचे काम करतात. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत राहुल गांधी यांच्या उपस्थितीत दिल्लीत बैठक होणार आहे. त्यात महाराष्ट्रातील प्रमुख नेते जाणार आहेत. त्या बैठकीत निवडणूक कशी लढायची यावर चर्चा होईल,असे विजय वडेट्टीवार म्हणाले.

 

Web Title: Prahar leader bacchu kadu reaction about india pakistan war situation marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 12, 2025 | 05:50 PM

Topics:  

  • Bacchu Kadu
  • india pakistan war
  • Solapur News

संबंधित बातम्या

पाकिस्तानी दावे ठरले फोल! ‘Operation Sindoor’दरम्यान पाक नौदलाने केले ‘असे’ होते पलायन
1

पाकिस्तानी दावे ठरले फोल! ‘Operation Sindoor’दरम्यान पाक नौदलाने केले ‘असे’ होते पलायन

विद्यार्थ्यांनी भरलेल्या शाळेचे छतच कोसळले; जिल्हा परिषद शाळेतील प्रकार
2

विद्यार्थ्यांनी भरलेल्या शाळेचे छतच कोसळले; जिल्हा परिषद शाळेतील प्रकार

सोलापूर शहरात एसीचा स्फोट; महिलेचा होरपळून मृत्यू, संपूर्ण घर जळून खाक
3

सोलापूर शहरात एसीचा स्फोट; महिलेचा होरपळून मृत्यू, संपूर्ण घर जळून खाक

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात सक्रिय सहभाग घेऊन गावे आत्मनिर्भर करावीत : पालकमंत्री जयकुमार गोरे
4

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात सक्रिय सहभाग घेऊन गावे आत्मनिर्भर करावीत : पालकमंत्री जयकुमार गोरे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.