
पुणेकरांवर पाणीटंचाईचे संकट! नगरसेवक सुनील पांडेंनी केली चिंता व्यक्त; प्रशासनाकडे उपाययोजना करण्याची मागणी
पुणे : धरणातील पाणीसाठा कमी होत असल्यामुळे पुण्यात ‘एक दिवसाआड पाणीपुरवठा’ होण्याबाबतचा निर्णय होण्याची शक्यता आहे. पुण्याचा संपूर्ण पाणीपुरवठा हा धरणांमधील साठ्यावर अवलंबून आहे. अशातच आता प्रभाग २९ मधील भाजपचे नगरसेवक सुनील पांडे यांनी पाणी प्रश्नांवरुन मोठी चिंता व्यक्त केली आहे. तसेच पाणीपुरवठा विभागाला निवेदन देऊन उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
जर आगामी काळात पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाणीसाठा खालावला, तर आपल्याला पूर्णपणे भूजलावर अवलंबून राहावे लागेल. यासाठी मान्सूनचे आगामी ३ महिने अत्यंत महत्त्वाचे आहेत. पावसाचे पाणी वाहून न जाता ते जास्तीत जास्त जमिनीखाली जिरवून भूजल पातळी वाढवणे आणि पाण्याचा अपव्यय रोखणे गरजेचे आहे. प्रभाग २९ मध्ये प्रभागात मोठ्या प्रमाणावर इमारती/सोसायट्या असून बहुतांश ठिकाणी बोअरिंगची व्यवस्था आधीच उपलब्ध आहे. या गंभीर परिस्थितीचा सामना करण्यासाठी आणि येणाऱ्या काळात नागरिकांना पाण्याचा मोठा दिलासा मिळावा, अशी मागणी सुनील पांडे यांनी केली.
सुनिल पांडे यांनी निवेदनात मांडलेले मुद्दे खालीलप्रमाणे आहेत.
1) सोसायट्यांमधील ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ ऑडिट: प्रभागातील ज्या सोसायट्यांमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प आधीच आहेत, ते नीट कार्यरत आहेत की नाही याची पालिकेच्या ‘आरडब्ल्यूएच सेल’मार्फत तातडीने तपासणी करण्यात यावी
2) सवलतीच्या दरात ‘फिल्टर किट्स’ची उपलब्धताः ज्या सोसायट्या स्वतःच्या खचर्चाने गच्चीवरील पाणी बोअरिंगमध्ये जिरवण्यास किंवा टाक्यांमध्ये साठवण्यास तयार आहेत, त्यांना महानगरपालिकेतर्फे सवलतीच्या दरात अधिकृत ‘फिल्टर किट्स’ उपलब्ध करून देण्यात यावेत.
3) पुनर्विकास व बांधकामांवर कडक निर्बंधः आपल्या प्रभागात सध्या मोठ्या प्रमाणावर रेडेव्हलपमेंट आणि हाय-राईज (High-rise) इमारतींची कामे सुरू आहेत. या बांधकामांसाठी भूजलाचा प्रचंड प्रमाणावर उपसा केला जातो. सध्याची परिस्थिती पाहता, अशा प्रकलूंना भूजल उपशावर कडक निर्बंध घालावेत किंवा बांधकाम कामांसाठी पिण्यायोग्य/भूजलाचा वापर थांबवून फक्त ‘STP’ (प्रक्रिया केलेले) पाणी वापरणे बंधनकारक करावे.
4) युद्धपातळीवर पाणी गळती दुरुस्ती : प्रभागातील मुख्य जलवाहिन्या आणि सोसायट्यांमधील अंतर्गत जोडणीमधील पाणी गळती शोधून ती पालिकेच्या पाणी पुरवठा विभागामार्फत युद्धपातळीवर दुरुस्त करण्यात यावी.
५. सार्वजनिक विहिरी व बोअरिंगचे शासकीय पुनर्भरणः प्रभागातील सार्वजनिक मोकळ्या जागा, बागा आणि रस्त्यांच्या कडेला ‘परझेशन ट्रेंच’ व खड्डे तयार करून पावसाचे पाणी जमिनीखाली वळवावे.
हे सुद्धा वाचा : पुणेकरांनो तयारी ठेवा, महापौरांनी मागविला अहवाल; सेव्ह वॉटर मोहीम राबविणार