
Pune शहरात नेमका ऋतू कोणता? तापमान थेट 37 अंशाच्या पुढे; नागरिक हैराण, मात्र 4 दिवसांमध्ये...
पुणे शहरातील उकाड्यात वाढ
कमाल तापमान ३७ अंशावर
पुणेकर उकाड्याने हैराण
पुणे: गेल्या काही दिवसांपासून कमाल आणि किमान तापमानात वाढ नोंदविण्यात येत आहे. मंगळवारी (ता. २४) यामध्ये अधिक वाढ झाली. परिणामी शहरात उन्हाचा चटका वाढला असून पुणेकर उकाड्याने हैराण झाले. मात्र पुढील तीन ते चार दिवसांत कमाल तापमान घट होणार असून ढगाळ वातावरण राहणार असल्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे.
शहर आणि परिसरात गेल्या काही दिवसांपासून कमाल तापमान ३३ ते ३५ अंश सेल्सिअसच्या दरम्यान तर किमान तापमान १५ ते १७ अंश सेल्सिअसच्या दरम्यान नोंदविण्यात येत होते. मात्र मंगळवारी यामध्ये मोठी वाढ झाली. पुण्याच्या मध्यवर्ती भागात ३७ अंश सेल्सिअस तर उपनगरामध्ये ३८ अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले. किमान तापमान देखील १९ अंश सेल्सिअसपर्यंत गेले आहे. त्यामुळे शहरातील उकाड्यात मोठी वाढ झाली आहे. मात्र यामध्ये पुढील तीन ते चार दिवसांत मोठी घट होण्याची शक्यता असल्याचे हवामानशास्त्र विभागाने सांगितले आहे.
पुणे आणि परिसरात बुधवारी (ता. २५) किमान तापमानात किंचित घट होण्याची शक्यता असून कमाल तापमान स्थिर राहण्याची शक्यता आहे. कमाल तापमान ३७ अंश सेल्सिअस तर किमान तापमान १८ अंश सेल्सिअस नोंदविण्यात येणार आहे. आकाश मुख्यतः निरभ्र राहण्याची शक्यता आहे. तर गुरूवारपासून (ता. २६) कमाल तापमानात आणखी घट होण्याची शक्यता आहे. कमाल तापमान ३६ अंश सेल्सिअस तर किमान तापमान १८ अंश सेल्सिअस पर्यंत नोंदविण्यात येण्याची शक्यता आहे. आकाश मुख्यतः निरभ्र राहून दुपारी आणि सायंकाळी अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे.
कोकण की पश्चिम महाराष्ट्र? कुठे जास्त चटके बसणार? जाणून घ्या Weather Report
मार्चमध्येच पारा 40 अंशावर
यंदाच्या हंगामात उष्णतेने मार्चच्या पहिल्या आठवड्यापासून कहर केला आहे. पाच वर्षात पहिल्यांदाच कमाल तापमान 42 अंशांच्या विक्रमी पातळीवर पोहोचले आहे. तसेच काही दिवस तापमानात घसरण झाली असून मुंबईकरांना तात्पुरता दिलासा मिळाला. आता पुन्हा शहर आणि उपनगरांता तीव्र उन्हाचे चटके बसणार आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) मुंबईसह ठाणे आणि रायगड जिल्ह्यांसाठी उष्णतेच्या लाटेचा ‘येलो अलर्ट’ जारी केला आहे. परिणामी 12 ते 4 घराबाहेर पडताना काळजीपूर्वक बाहेर पडा. कारण गेल्या १० मार्च रोजी मुंबईत ४० अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती, जे गेल्या पाच वर्षांतील मार्च महिन्यातील उच्चांकी तापमान ठरले आहे.