Mumbai-Pune Expressway toll refund
एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, अपघातानंतर टोल वसुली थांबवण्याचे आदेश देण्यात आले होते. तरीदेखील ज्या वाहनचालकांच्या फास्टॅगमधून रक्कम वजा झाली, त्यांचा डेटा संकलित करण्यात आला आहे. येत्या आठवड्यात ही रक्कम थेट संबंधित वाहनचालकांच्या फास्टॅग खात्यात जमा केली जाणार आहे.या घटनेनंतर महामंडळाने आपल्या कन्सेशनायर IRB Infrastructure कडून सविस्तर माहिती मागवली होती. विशेषतः वाहनचालकांना परतावा देण्यास प्राधान्य देण्याबाबत स्पष्ट सूचना करण्यात आल्या आहेत.
FASTag चा वार्षिक पास घेऊ की सतत रिचार्ज करत बसू, काय आहे फायदेशीर?
3 फेब्रुवारी रोजी खोपोलीजवळ गॅस टँकर अपघातग्रस्त झाल्यानंतर वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली होती. हजारो वाहने अनेक किलोमीटर लांब रांगांमध्ये अडकली होती. अनेक प्रवाशांना पाणी, अन्न आणि इतर मूलभूत सुविधांशिवाय तासन्तास थांबावे लागले. या परिस्थितीचा विचार करून प्रशासनाने टोल वसुली तात्पुरती बंद करण्याचा निर्णय घेतला होता.महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने सांगितले आहे की, प्रभावित वाहनचालकांना त्यांचा परतावा देणे ही त्यांची सर्वोच्च प्राथमिकता असून संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने पूर्ण केली जाईल.अधिकाऱ्यांचे मत आहे की, टोल प्लाझाचे बॅरिअर पूर्णपणे उघडले जाण्यापूर्वी काही लेन-देन स्वयंचलित प्रणालीमुळे झाले असावेत, ज्यामुळे काही वाहनचालकांच्या फास्टॅगमधून रक्कम वजा झाली असण्याची शक्यता आहे.
FASTag चा ‘हा’ नवीन नियम जाणून घ्या, टोल नाक्यावर नाही लावावी लागेल रांग






