
जून महिन्यांत पावसाने ओढ दिल्याने शहरात जूनच्या तिसर्या आठवड्यापासून पाणी कपात करण्यात आली होती. शहरातील बहुतांश भागात एकदिवसाआड पाणी पुरवठा करण्यात येत होता. परंतू जुलैच्या पहिल्या आठवड्यात जोरदार पाउस झाल्याने धरणांच्या साठयात भरीव वाढ झाली. परंतू आठ तारखेनंतर पाउस थांबला.
पुणेकरांना दिलासा नाहीच ! 15 जुलैपासून पुन्हा सुरू होणार दिवसाआड पाणीपुरवठा
हवामान खात्यानेही दोन आठवडे पाउस पडणार नसल्याचा अंदाज दिल्याने पुन्हा अनिश्चित परिस्थिती निर्माण झाली. अशातच ६ जुलैला झालेल्या पावसाने इंद्रायणी नदीला आलेल्या पुरामुळे आळंदीतून सुरू होणार्या आषाढी पालखी यात्रा संकटात सापडली. वारकर्यांनी पुण्यातूनच पालखी सोहळ्यात सहभागी होण्याचे आवाहन केले. महापालिकेने पालखी सोहळ्यासाठी ९ आणि १० जुलैची पाणी कपात रद्द केली होती. परंतू मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर ७ ते १२ जुलैपर्यंत पाणी कपात रद्द केली.
पालखी सोहळा मार्गस्थ झाल्यानंतर सोमवारी महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी १५ जुलैपासून पुन्हा पाणी कपात सुरू करण्याचे जाहीर केले. परंतू खडकवासला धरण भरल्यानंतर मुठा कालव्यातून पाणी सोडण्यात येत असल्याने पाणी कपात करू नये. सध्या धरणसाखळीत १६. ८० टीएमसी पाणी आहे. जुलै अखेरीस पावसाचा अंदाज आहे. त्यामुळे तूर्तास आठवडाभर कुठलिही पाणी कपात करू नये असा अधिकार्यांशी चर्चा करून निर्णय घेण्यात आला.
पुण्यात पावसाची प्रतीक्षा कायम; पुढील चार दिवस कोरडे हवामान राहण्याचा अंदाज
२२ जुलैला पुन्हा एकदा हवामान विभाग आणि जलसंपदा विभागाच्या अधिकार्यांसोबत चर्चा करून कपाती बाबत निर्णय घेण्यात येईल. तोपर्यंत शहरात दररोज पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती महापौर मंजुषा नागपुरे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. याप्रसंगी स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले, अतिरिक्त आयुक्त पवनीत कौर या उपस्थित होत्या.