बारामती तालुक्यातील विविध पाणीपुरवठा योजनांचाही सविस्तर आढावा घेण्यात आला. तालुक्यातील एकूण २३ योजनांपैकी प्रशासकीय मान्यता प्राप्त योजनांची कामे निर्धारित कालावधीत पूर्ण करून नागरिकांना शाश्वत, दर्जेदार आणि नियमित पाणीपुरवठा उपलब्ध करून…
गेल्या सोमवारपासून शहरात पाणी कपात सुरु आहे. एक दिवसाआड होणाऱ्या पाणी पुरवठ्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहे. या प्रश्नांचा पाढाच नगरसेवकांनी सर्वसाधारण सभेत वाचला.
ससे गाव परिसरातील नागरिकांना दिलासा देण्यासाठी सम आणि विषम दोन्ही तारखांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. तसेच वारजे माळवाडी, कर्वेनगर पाट, रामनगर, शिवणे, उत्तमनगर आणि लगतच्या परिसरांमध्ये पाणीपुरवठ्याच्या वेळा पूर्ववत…
पाणीपुरवठ्याबाबत तक्रार असल्यास नागरिकांनी पीएमसी केअर हेल्पलाईन 1800-1030-222, व्हॉट्सअॅप क्रमांक 9689900002 किंवा पीएमसी केअर अॅपवर संपर्क साधावा, असे प्रशासनाने म्हटले आहे.
Pune Water Crisis : पुणे जिल्ह्यात यंदा तीव्र उन्हाळ्याच्या झळांमुळे पाणीटंचाईचे संकट अधिक गडद झाले आहे. जिल्ह्यातील तब्बल १ लाख ३८ हजार ७१५ नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे.
Water Shortage in Pune: पुणे जिल्हा परिषद आणि जिल्ह्यातील १३ पंचायत समित्यांच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या असून नवनिर्वाचित जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांनी विविध उपाययोजना सुचविल्या होत्या.
पुणे महापालिकेच्या विविध जलशुद्धीकरण केंद्रे व पंपिंग स्टेशन येथे तातडीच्या दुरुस्ती आणि देखभाल कामांमुळे गुरुवारी (दि. १६) शहरातील बहुतांश भागात पूर्ण दिवस पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.
पुणे शहरात नोकरी निमित्ताने किवा शिक्षण या साठी मोठ्या प्रमाणावर जिल्ह्याबाहेरून, राज्याबाहेरुन लोकसंख्या आलेली आहे. धरणाची साठवणूक क्षमता तेवढीच आहे पाण्याच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे.
महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या तरतुदीनुसार अतिरिक्त २५ टक्के पाणीवापर केल्यास दीडपट तर त्यापेक्षा जास्त वापर केल्यास पाणी वापर दराच्या तीनपट दंड आकारला जातो.
भविष्यात पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरांची पाण्याची गरज मोठ्या प्रमाणात वाढणार असल्याने, टाटा समूहाच्या मुळशी व ठोकळवाडी धरणातील पाणी वीजनिर्मितीऐवजी पिण्यासाठी वापरण्याचा पर्यायही पुढे आला आहे.
कळमोडी आणि नाझरे ही धरणे १०० टक्के भरली असून, चासकमान, वडज, विसापूर, पवना, गुंजवणी, वीर, कासारसाई, वडिवळे, आंद्रा, चिल्हेवाडी, घोड आणि येडगाव या धरणांमध्येही ७२ टक्क्यांहून अधिक पाणी साठले आहे.
नळातून येणारे पाणी चिखलासारखे, पिवळसर आणि अशुद्ध असल्याने नागरिकांना अंघोळ, धुणी आणि स्वयंपाकात वापर करणेही धोकादायक वाटत आहे. या पाण्यामुळे डेंग्यू, कॉलरा, टायफॉईड, गॅस्ट्रो यांसारखे आजार होण्याचा धोका वाढला आहे.
वडगावशेरीसह खराडी भागात अनेक भागात पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. कमी दाबाने तसेच काही ठिकाणी नळाला पाणीच येत नाही. गेल्या चार ते पाच महिन्यांपासून पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे.
पाण्याची गळती शोधण्यासाठी महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाला जलवाहिन्यांत 1.5 बार या प्रमाणात प्रेशरने पाणी सोडावे लागेल, हे पाणी पुण्याच्या दैनंदिन गरजेच्या तिप्पट पाणी महापालिकेला उचलावे लागेल.
मुख्य जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी दक्षिण पुण्यातील काही भागाचा पाणीपुरवठा येत्या बुधवारी (सहा मार्च) बंद ठेवला जाणार आहे. तर या भागात गुरुवारी (सात मार्च) सकाळी उशिरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होईल, अशी…
पर्वती येथील एमएलआर टाकी वरून ते जगताप हाऊस दरम्यान नव्याने टाकलेल्या १४७३ मिमी व्यासाच्या जलवाहिनीचे काम पूर्ण केले जाणार आहे. भवानी पेठ स्वारगेट परिसर शंकर शेठ रस्ता या भागासाठी पाण्याची…