Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai Railway Accident : ‘मोदी सरकारची ११ वर्षे, फक्त प्रचार, पण…; मुंब्रा रेल्वे दुर्घटनेवरून राहुल गांधींचा हल्लाबोल

कसाऱ्याहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला (CSMT) जाणाऱ्या लोकल ट्रेनमधून ठाण्यानजीक दिवा-मुंब्रा स्थानकांदरम्यान पडून पाच जणांचा मृत्यू झाला आहे. त्यात एका पोलिस कर्मचाऱ्याचाही समावेश आहे.

  • By संदीप गावडे
Updated On: Jun 09, 2025 | 04:03 PM
'मोदी सरकारची ११ वर्षे, फक्त प्रचार, पण...; मुंब्रा रेल्वे दुर्घटनेवरून राहुल गांधींचा हल्लाबोल

'मोदी सरकारची ११ वर्षे, फक्त प्रचार, पण...; मुंब्रा रेल्वे दुर्घटनेवरून राहुल गांधींचा हल्लाबोल

Follow Us
Close
Follow Us:

कसाऱ्याहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला (CSMT) जाणाऱ्या लोकल ट्रेनमधून ठाण्यानजीक दिवा-मुंब्रा स्थानकांदरम्यान पडून पाच जणांचा मृत्यू झाला आहे. त्यात एका पोलिस कर्मचाऱ्याचाही समावेश आहे. सकाळी ९.२० च्या दरम्यान ही दुर्घटना घडली. तीन प्रवासी गंभीर जखमी असून त्यांच्यावर कळव्यातील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान या अपघातानंतर राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे.

Mumbra Train Accident: “ठाकरे बंधू एकत्र येण्यापेक्षा…”; रेल्वे अपघातावर राज ठाकरेंचे भाष्य

मोदी सरकारला ११ वर्षे पूर्ण होत असताना, मुंबईहून आलेल्या दुःखद बातमीमुळे देशाचं खरं वास्तव समोर आलं आहे. ट्रेनमधून पडून काही प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. भारतीय रेल्वे लाखो लोकांच्या जीवनाचा कणा आहे, परंतु आज ती असुरक्षितता, गर्दी आणि अराजकतेचे प्रतीक बनली आहे.मोदी सरकारची ११ वर्षे, कोणतीही जबाबदारी नाही, कोणताही बदल नाही, फक्त प्रचार, असा घणाघात राहुल गांधी यांनी केला आहे.

जब मोदी सरकार 11 साल की “सेवा” का जश्न मना रही है, तब देश की हक़ीक़त मुंबई से आ रही दर्दनाक ख़बर में दिखती है – ट्रेन से गिरकर कई लोगों की मौत। भारतीय रेल करोड़ों की ज़िंदगी की रीढ़ है, लेकिन आज असुरक्षा, भीड़ और अव्यवस्था की प्रतीक बन चुकी है। मोदी सरकार के 11 साल = न… — Rahul Gandhi (@RahulGandhi) June 9, 2025

सरकारने २०२५ बद्दल बोलणं थांबलं असून आता २०४७ ची स्वप्न दाखवत आहेत. आज देश कोणत्या परिस्थितीला तोंड देत आहे ते कोण पाहणार? मी मृतांच्या कुटुंबियांबद्दल मनापासून संवेदना व्यक्त करतो आणि जखमी यातून लवकर बरे होतील अशी आशा करतो, असंही त्यांनी म्हटलं आहे.

Mumbra Train Accident : दिवा- मुंब्रा लोकल दुर्घटनेत पोलिस कर्मचाऱ्याचाही मृत्यू, सहा जणांचा मृत्यू; जखमींवर उपचार सुरु

दुर्घटनेनंतर रेल्वे प्रशासनाला जाग

दरम्यान या अपघातानंतर रेल्वे प्रशासनाने काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. ज्या नवीन लोकल मध्य रेल्वेच्या ताफ्यात दाखल होत आहेत त्यामध्ये ऑटोमॅटिक डोअर क्लोज सिस्टिम असेल. २३८ नव्या एसी लोकल मिळणार आहेत. या लोकल डोअर क्लोज फिटमेंटसह रेल्वेच्या ताफ्यात दाखल होणार आहेत. तसेच ज्या लोकल सध्या मध्य रेल्वेवर धावत आहेत, त्या लोकल्समध्ये रेट्रो फिटमेंटच्या माध्यमातून दरवाजे आपोआप बंद होतील अशी सिस्टिम बसवण्याचा प्रयत्न रेल्वे प्रशासन करत असल्याची माहिती रेल्वेकडून देण्यात आली आहे.

Web Title: Rahul gandhi attack on modi government 11 year after mumbai local accident latest marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 09, 2025 | 03:39 PM

Topics:  

  • Mumbai Local
  • Mumbai Railway
  • Rahul Gandhi
  • Train Accident

संबंधित बातम्या

Mumbai Local: मध्य रेल्वेवरील गर्दी कमी होणार! आता ठाणे-डोंबिवली मार्गावरून धावणार 15 डब्यांची लोकल
1

Mumbai Local: मध्य रेल्वेवरील गर्दी कमी होणार! आता ठाणे-डोंबिवली मार्गावरून धावणार 15 डब्यांची लोकल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.