
"नेरळमध्ये मोरे -चंचे म्हणजे विकास असेच समीकरण...", कर्जत परिवर्तन आघाडीचे प्रचारफेरीत कार्यकर्त्यांचे मत
कर्जत: कर्जत तालुक्यात ग्रामीण भागात सर्वाधिक विकासकामे नेरळ ग्रामपंचायत आणि परिसरात झाली आहेत. त्यामुळेच नेरळ मध्ये मोरे – चंचे म्हणजे विकासाचे समीकरण असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेरळ शहर अध्यक्ष गणेश खराटे आणि शिवसेना ठाकरे गटाचे नेरळ शहर प्रमुख बंडू क्षीरसागर यांनी केला.
नेरळ जिल्हा परिषद गटाचे कर्जत परिवर्तन विकास आघाडीचे उमेदवार सुनीता मोरे आणि नेरळ पंचायत समिती गणाचे उमेदवार भगवान चंचे यांचा प्रचार नेरळ गावात आयोजित केला होता.नेरळ गावातील सुगवेकर आळी,टेप आळी, बाजारपेठ या भागात प्रचार फेरी आयोजित करण्यात आली होती.त्यावेळी उमेदवार यांच्यासह आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.त्यावेळी मतदारांना आवाहन करताना शिवसेना ठाकरे पक्षाचे शहर प्रमूख बंडू क्षीरसागर यांनी नेरळ गावात विकासाची कामे रोहिदास मोरे,प्रथमेश मोरे हे 35 वर्षे करीत आहेत. तर जिल्हा परिषद उमेदवार सुनीता मोरे या सामाजिक क्षेत्रात आघाडीवर असून त्यांच्याकडे मोठे महिला ताकद आहे.
तर आमचे पंचायत समिती गणाचे उमेदवार भगवान चंचे यांनी नेरळ ग्रामपंचायत मध्ये सरपंच मधून केलेल्या कामामुळे तब्बल 15 वर्षांनी देखील कार्यसम्राट म्हणूनच ओळखले जात आहे. त्यामुळे या सर्व प्रचारात आमच्या आघाडीच्या उमेदवार यांना मोठा पाठिंबा मिळत आहे असे क्षीरसागर यांनी माहिती दिली.नेरळ राष्ट्रवादी शहर अध्यक्ष गणेश खराटे यांनी सुनीता मोरे यांचे कुटुंब ही समाजकारणात आघाडीवर आहेत,तर भगवान चंचे यांनी विकासकामे करून दाखवली आहेत.अशावेळी मतदार आम्हाला भरभरून प्रतिसाद प्रचार फेरीमध्ये देताना दिसत आहेत.त्यामुळे मोरे – चंचे हे विकासाचे समीकरण म्हणूनच ओळखले जात असून आमचा विजय मतांची गोळाबेरीज करताना हजारामध्ये होईल असा दावा केला.
ॲड प्रणाली मोरे यांनी यावेळी मतदारांना आवाहन करताना दोन भक्कम उमेदवार कर्जत परिवर्तन आघाडीने निवडणुकीत दिले आहेत.या दोन्ही उमेदवार यांचा दांडगा संपर्क,तसेच विकासकामांचा झपाटा लक्षात घेता आमचा विजय हा नक्की आहे.वनश्री चंचे यांनी ग्रामपंचायत मध्ये कामकाज करण्याचा आमच्या आघाडीच्या दोन्ही उमेदवार यांना मोठा अनुभव आहे.त्यामुळे जनता आणि मतदार आम्हाला प्रचारात चांगला प्रतिसाद देत आहेत.त्याचवेळी जागोजागी स्वागत करण्यासाठी मतदार पुढे येत असून आम्ही मतदारांच्या प्रेमामुळे भारावून गेलो आहोत. राष्ट्रवादी शहर उपाध्यक्ष प्रीतम गोरी यांनी नेरळ गावात आमच्या पाठीशी सर्व उतरले असल्याने आम्हाला जनतेचा सर्वधिक पाठिंबा दिसून येत आहे.