अलिबागच्या समुद्रात मच्छिमार बोटीला भीषण आग
अलिबागच्या समुद्रात एका मच्छिमार बोटीला भीषण आग लागल्याची घटना घडली. या बोटीवर १८ ते २० खलाशी असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान बोटीवरील सर्व खलाशी सुखरूप आहेत. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. साखर गावातील राकेश मारूती गण यांच्या मालकीची ही बोट आहे.
अलिबाग आक्षी येथील राकेश गण यांच्या मच्छीमारी बोटीला समुद्रामध्ये सहा ते सात नोटिकल मैल अंतरावर पहाटे तीन ते चार वाजेचे दरम्यान आग लागली होती. कोस्ट गार्ड व नेवी च्या मदतीने बोटी मधील सर्व १८ खलाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले असल्याची माहिती पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिली. या आगीत बोट 80 टक्के जळून खाक झाली असून बोटीवरील जाळी देखील जळाली आहे. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट असून शॉर्ट सर्किटने आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. स्थानिकांच्या मदतीने बोट किनाऱ्यावर आणली आग विझविण्याचे काम सुरू आहे.
बातमी अपडेट होत आहे…