
'आमची घरं, आमचं जंगल आम्ही सोडणार नाही'; टोरंट प्रकल्पाविरोधात आदिवासींची ठाम भूमिका
Karjat News : टोरंट कंपनीचा प्रताप! जलविद्युत प्रकल्पासाठी नियम
टोरंट पॉवर एनर्जी स्टोरेज सोल्युशन लिमिटेड ही कंपनी पाली ग्रामपंचायत मधील साई डोंगर परिसरात धरण बांधणार आहे.त्या ठिकाणी दळी जमिनीवर राहत असलेल्या आदिवासी लोकांच्या मनात घरे आणि गाव सोडून जावे लागेल अशी भीती घातली गेली आहे. साई डोंगर मधील जंगलात तीन चार पिढ्या राहणाऱ्या मल्टी वाडी मधील पाच कुटुंब आता आपला निवारा वाचवण्यासाठी सरसावले आहेत. तेथील जंगलात रानमेवा गोळा करून आपले कुटुंब चालवणाऱ्या तेथील सर्व कुटुंबांच्या मनात गाव सोडून जावे लागेल अशी टोरंट कडून येणारे एजंट कडून सांगण्यात येत आहे. याबाबत 70 वर्षीय शिवाजी शंकर पवार यांचे कुटुंब या जागेमध्ये गेली 40 वर्षांपासुन राहात आहोत.
पुर्वी या जागेमध्ये आमचे एकच कुटूंब वस्तव्य करत होते. आता या ठिकाणी पाच कुटूंब राहात आहेत.या जंगला मध्ये असणारा राण मेवा,मासे, खेकडे तसेच या जंगलामध्ये असणारे अनेक वन्य प्राणी यांच्याशी आमचा संबंध येत असल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बिबट्या वाघ अशाप्रकारे प्राणी आपल्याला पाहायला मिळत असतात हे सर्व प्राणी आमच्या घराच्या आजूबाजूला फिरत असतात मात्र हे सर्व प्राणी आता या टोरेंट प्रोजेक्टमुळे नाहीसे होणार असल्याने व त्या ठिकाणी आम्ही वस्ती करून राहत आहोत या जागेचा तोपर्यंत आम्हाला मोबदला मिळत नाही तोपर्यंत आम्ही या जागेवरून वाटणार नाही अशी प्रतिक्रिया येथील आदिवासी लोक करत आहेत.
येथील स्थानिक धनगर लोक आणि आम्हाला येथेच राहायचे असून आमची आता बाहेर जाऊन राहण्याची आर्थिक स्थिती नाही.आमच्या आजुबाजूला आम्हाला अनेक प्राणी दिसतात आणि येथून निघाल्यावर त्या प्राण्यांचा सहवास नाहीसा होणार आहे.आमच्या दारातून बिबट्या अनेकदा गेलेला आहे,तरी आम्हाला त्याची भीती वाटत नाही.कारण त्या बिबट्या तसेच अन्य प्राण्यांना आम्ही आपले शेजारी वाटतो.आमच्या कडून त्या प्राण्यांना काही धोका नसल्याने मल्टी वाडी मधील ग्रामस्थ येथे आपले राहिलेले जीवन व्यतित करण्याचा निर्णयांवर ठाम आहेत.पवार यांनी आपल्या वाडी बद्दल बोलताना आम्ही तुमच्या जागेमध्ये राहत होते याला मल्टी वाडी असे म्हणतात.मात्र या जागेचा नाव मल्टी असे पडले ही देखील एक कथा आहे. बाजूने वाहणारे पेज नदी वाहते मात्र याच ठिकाणी मल्टी असे नाव या जागेला पडले असून ही पेज नदी आमची माता आहे.
ज्यावेळी पावसाळा सुरू होतो त्यावेळी याच पेज नदीला मोठ्या प्रमाणात पाणी येतो व हे पाणी आमच्या घराच्या दारापर्यंत येतो.तरी देखील आम्हाला भीती वाटत नाही याचे कारण आम्ही पाण्याचे शत्रू नाहीत.कधीकधी येथील ग्रंथांना आठ ते नऊ दिवस घरामध्ये बसून राहावे लागते हे सर्व संकटाला सामोरे जाऊन आम्ही या ठिकाणी राहत आहोत.पण त्यामुळे आम्हाला ही वाडी सोडून टोरेंट कंपनी साठी गाव सोडायचे नाही.आमचे या निसर्गाची नळ जोडल्याने आम्ही या निसर्गात राहत आहे.या निसर्गामध्ये नाव कुठले भांडणांना कुठले दंडा आम्ही हे जीवन आनंदाने जगत आहोत मात्र आम्हाला या ठिकाणी उठवले नाही तर आम्ही या ठिकाणी आनंदाने आयुष्यभर राहू पण येथून कुठेही राहायला जाणार नाही असा ठाम निर्धार मल्टी वाडी मधील ग्रामस्थ यांनी केला आहे.
‘गुजरातच्या कंपनीसाठी सरकार काम करतेय?’ टोरंट प्रकल्पावर बाबू घारे यांचा …