
ऑक्टोबर-2025 ची नुकसान भरपाई मदत रखडली; शिरूर तालुक्यात शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा
नवी दिल्ली : यंदाच्या वर्षी देशात सामान्यपेक्षा कमी पाऊस पडेल. सरासरीच्या ९२ टक्के पर्जन्य राहण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे. हवामान विभागाकडून सोमवारी नैऋत्य मान्सूनचा पहिला अधिकृत अंदाज जाहीर करण्यात आला. पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव डॉ. एम. रविचंद्रन आणि हवामान विभागाचे महासंचालक डॉ. एम. मोहापात्रा यांच्या उपस्थित पत्रपरिषद पार पडली. यावेळी रविचंद्रन यांनी हा अंदाज जाहीर केला.
डॉ. एम. मोहापात्रा यांच्या माहितीनुसार, जून जुलै ऑगस्ट पर्यंत पावसाची स्थिती सामान्य राहणार आहे. जेव्हा पावसाचे प्रमाण 90 टक्के ते 95 टक्के असते त्यावेळी सामान्यपेक्षा कमी पावसाचा अंदाज वर्तवण्यात येतो. यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस राहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढणार आहे. भारतीय अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने हा अंदाज अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात अल निनो परिस्थिती असेल. तर, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये भारतीय समुद्र सकारात्मक परिस्थिती राहिल. त्यामुळे अल निनोच्या नकारात्मक परिणामाला भारतीय समुद्रातील सकारात्मक परिस्थिती अनुकूल करेल. तसेच त्याचा परिणाम जाणवणार नाही.
अंदाजपत्रकात सध्या दुष्काळ जाहीर होणाऱ्या क्षेत्रांची यादी दिलेली नाही, परंतु ज्या क्षेत्रांमध्ये सामान्यपेक्षा कमी पाऊस/दुष्काळासारखी परिस्थिती निर्माण होण्याची सर्वाधिक शक्यता आहे, त्यामध्ये उत्तर भारतातील अनेक भागांचा, विशेषतः गंगा खोऱ्यातील मैदानी प्रदेश आणि आसपासच्या पठारांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त, मध्य भारताचा मोठा भाग दुष्काळाने प्रभावित होण्याची शक्यता आहे.
सामान्यपेक्षा कमी पावसाची शक्यता
पश्चिम भारतातील काही भाग आणि अंतर्गत प्रदेशांमध्येही सामान्यपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. देशाच्या बहुतांश भागात पाऊस सामान्यपेक्षा कमी राहण्याची शक्यता असली तरी, ईशान्य, वायव्येकडील काही भाग आणि दक्षिण द्वीपकल्पीय भारतासारख्या काही भागांमध्ये चांगला पाऊस पडू शकतो.
Weather Update : खराब हवामानामुळे यंदाच्या पावसात व्यत्यय; कमी पावसाच्या अंदाजामुळे दुष्काळाचे सावट