Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

महायुतीतील ‘या’ घटक पक्षाने केली 20 जागांची मागणी; वरिष्ठ नेत्यांचे टेन्शन वाढले

महायुतीतील मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी रिपाइं पक्षाकडे लक्ष द्यावे आणि २० जागा विधानसभेला द्यावेत अशी मागणी रामदास आठवले यांनी केली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Oct 04, 2024 | 04:40 PM
महायुतीतील 'या' घटक पक्षाने केली 20 जागांची मागणी; वरिष्ठ नेत्यांचे टेन्शन वाढले

महायुतीतील 'या' घटक पक्षाने केली 20 जागांची मागणी; वरिष्ठ नेत्यांचे टेन्शन वाढले

Follow Us
Close
Follow Us:

सातारा : सातारा ही भिमाई भूमी असून याठिकाणी लवकरच भव्यदिव्य भीमाई स्मारक होणार आहे. सुमारे ३००-४०० कोटी रुपये खर्च करून हे स्मारक उभे केले जाणार आहे. माझे मिशन डॉ. बाबासाहेबांचे विचार घराघरापर्यंत पोचवायचे आहेत. देशाच्या कानाकोपऱ्यात रिपाइं पक्ष घेऊन जायचा आहे असा निर्धार केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केला. दरम्यान, महायुतीतील मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी रिपाइं पक्षाकडे लक्ष द्यावे आणि २० जागा विधानसभेला द्यावेत अशी मागणी यावेळी त्यांनी केली.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या ६७ व्या वर्धापन दिनानिमित्त तालीम संघ येथे आयोजित सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी राष्ट्रीय नेत्या सीमा आठवले, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष महेश शिंदे, राज्याध्यक्ष राजाभाऊ सरवदे, माजी राज्यमंत्री व राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सुर्यकांत वाघमारे, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष व जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड, जीत आठवले उपस्थित होते.

आठवले म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे साताऱ्यातील छत्रपती प्रतापसिंह हायस्कूल येथे शिकले आहेत. भीमाई स्मारक लवकरच भव्यदिव्य होणार आहे. सुमारे ३००-४०० कोटी रुपये खर्च करून हे स्मारक उभे केले जाणार आहे या परिसराच्या आजूबाजूची ३ ते ४ एकर जागा घेण्यात यावी. माझ्या भीमाने कधी पैशाची केली नाही कमाई, पण आमचे प्रेरणास्थान आहे. भिमाई. डॉ. बाबासाहेंबानी दलित समाजाला न्याय मिळाला म्हणून १८ तास अभ्यास अन घटना निर्मितीचे शिल्पकार झाले. डॉ. बाबासाहेब यांचा घात माईनी केला असा प्रचार करत काहींनी बदनाम करण्याचा प्रयत्न केला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आज आपल्यात असते तर देशाच्या राजकारणाला वेगळी कलाटणी मिळाली असती अन् रिपाइं पक्षाचा वटवृक्ष झाला असता. दि. ३ आक्टोबर १९५७ ला रिपाइं पक्ष स्थापना झाला. जशी भीमाईची भूमी आहे तशीच छत्रपतीची सातारा ही पहिली राजधानी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा कोथळा काढला ती वाघनख साताऱ्यात आली आहेत. डॉ. बाबासाहेबांच्या संविधानाला कोणी हात लावेल, त्याचा अपमान करेल त्याचा कोथळा मी बाहेर काढेन. असा इशारा आठवले यांनी दिला.

Web Title: Ramdas athawale has demanded to get 20 seats in the assembly elections nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 04, 2024 | 04:40 PM

Topics:  

  • BJP
  • devendra fadanvis
  • maharashtra
  • Ramdas Athawale

संबंधित बातम्या

संजय पाटील यांच्या संवाद मेळाव्याकडे लक्ष, कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला; सोशल मीडियावर प्रचार माेहिम सुरू
1

संजय पाटील यांच्या संवाद मेळाव्याकडे लक्ष, कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला; सोशल मीडियावर प्रचार माेहिम सुरू

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी: वाहतूक कोंडीतून होणार सुटका, सायन-पनवेल महामार्ग पुलाबाबत मोठा निर्णय
2

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी: वाहतूक कोंडीतून होणार सुटका, सायन-पनवेल महामार्ग पुलाबाबत मोठा निर्णय

Bihar Election : २०२० च्या बिहार निवडणुकीत कमी-अधिक फरकाने जिंकणारे मंत्री कोण होते? हे मंत्री फक्त ४८४ मतांनी जिंकले
3

Bihar Election : २०२० च्या बिहार निवडणुकीत कमी-अधिक फरकाने जिंकणारे मंत्री कोण होते? हे मंत्री फक्त ४८४ मतांनी जिंकले

Bombay High Court : मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्राचे दोन न्यायाधीशांना केलं बडतर्फ, नेमकं प्रकरण काय?
4

Bombay High Court : मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्राचे दोन न्यायाधीशांना केलं बडतर्फ, नेमकं प्रकरण काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.