
ताफ्यात दाखल होणार नवीन १६७ बस
सार्वजनिक वाहतूक व्यवस्था होणार सक्षम
प्रत्येक डेपोसाठी मिळणार १० नवीन बसेस
गुहागर: सार्वजनिक वाहतुकीचा कणा असलेल्या एसटी महामंडळाच्या ताफ्यात लवकरच १६७नवीन बसचा समावेश होणार आहे. भंगारात निघणाऱ्या बससेच्या बदल्यात मिळणाऱ्या गाड्या आणि नवीन ‘टू बाय टू’च्या बसेस यामध्ये असणार आहेत. यामुळे रत्नागिरी जिल्ह्याचा सार्वजनिक वाहतूक प्रवास अधिक सक्षम होणार आहे. याबाबत एसटी विभाग नियंत्रक प्रज्ञेश बोरसे यांनी अधिकृत माहिती दिली. गेल्या काही काळापासून जिल्ह्यातील अनेक मार्गावर जुन्या आणि खिळखिळ्या झालेल्या गाड्यांमुळे प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत होता. वारंवार होणारे बिघाड आणि गाड्यांची दुरवस्था यामुळे प्रवाशांकडून वारंवार तक्रारी येत होत्या.
प्रत्येक डेपोसाठी मिळणार १० नवीन बसेस
हीच समस्या मुळापासून सोडवण्यासाठी प्रशासनाने आता कालबाह्य झालेल्या गाड्या ताफ्यातून कायमच्या काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यातील एकूण ६७ गाड्या आता स्क्रॅप म्हणजेच भंगारात काढल्या जाणार आहेत. या गाड्यांनी आपला विहित कार्यकाळ पूर्ण केला असून, त्या प्रवाशांच्या सुरक्षेसाठी योग्य नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
Kokan Holi Festival: कोकणासाठी एसटीचा धमाका; रत्नागिरी विभागातून तब्बल…
राज्य सरकारने संपूर्ण महाराष्ट्रासाठी आठ हजार नवीन गाड्यांच्या खरेदीचा मोठा लॉट मंजूर केला आहे. या मोठ्या खरेदीतून रत्नागिरी जिल्ह्याला मोठा वाटा मिळण्याची अपेक्षा आहे. विभाग नियंत्रक पद्धेश बौररो यांनी व्यक्त केलेल्या शक्यतेनुसार, या नवीन लॉटमधून जिल्ह्यातील प्रत्येक एसटी डेपोसाठी किमान १० नवीन बसेस मिळण्याची चिन्हे आहेत. जिल्ह्यात रत्नागिरी, चिपळूण, दापोली, खेड, गुहागर, देवरुख, लांजा आणि राजापूर असे महत्त्वाचे डेपो कार्यरत आहेत, प्रत्येक डेपोमध्ये नवीन गाड्या दाखल झाल्यामुळे ग्रामीण भागातील फैन्ऱ्या नियमित होण्यास आणि प्रवाशांची गर्दी विभागण्यास मोठी मदत होणार आहे.
रत्नागिरी एसटी कॉलनी येथे लवकरच चार्जिंग स्टेशन उभारले जाणार आहे. यामुळे रत्नागिरी आगाराला मिळणाऱ्या इलेट्रिक चरामुळे एसटीचा इंधन खरेदीवरील मोठा खर्च कमी होणार आहे. लवकर ही सेवा सुरू करण्याच्यादृष्टीने आमचे प्रयत्न आहेत, असे बोरसे यांना सांगितले.
St Bus: पालघर जिल्हावासियांसाठी आनंदाची बातमी; 2 वर्षात 200 एसटी बसेस मिळणार
नवीन गाड्या दाखल झाल्यामुळे केवळ प्रवाशांचा प्रवास आरामदायी होणार नाही, तर एसटीच्या उत्पन्नातही वाढ होईल. आधुनिक इंजिन आणि सुधारित आसनव्यवस्था असलेल्या या गाड्यांमुळे प्रवाशांचा कल पुन्हा एकदा ‘लालपरी कडे वळेल, अशी आशा प्रशासनाला आहे, कोकणातील कठीण रस्ते आणि पावसाळी हवामान लक्षात घेता, या नवीन गाडवा प्रवासासाठी अधिक सुरक्षित आणि वैगवान ठरतील, लवकरच या प्रस्तावाची अंमलबजावणी सुरू होऊन नवीन गाड्या जिल्ह्याच्या रस्त्यावर धावताना दिसतील.