
हवामानाचा काजूला फटका
बागायतदारांचा यंदा उत्पादन खर्च निघणे मुश्किल
आंब्यापाठोपाठ काजूलाही मोठा फटका
म्हापण: ढगाळ वातावरणात दाट धुके, दव आणि अचानक वाढणाऱ्या उष्यामुळे आंब्यापाठोपाठ काजूलाही मोठा फटका बसला आहे.
मोहोर करपला असून शेतकरी, बागायतदारांचा यंदा उत्पादन खर्च निघणे मुश्किल झाले आहे. वेंगुर्ले प्रादेशिक फळ संशोधन केंद्र, कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी नुकतीच देवगड तालुक्यातील कुवळे, सांडवे, रेषवली, साळशी, शिरगाव भागात प्रत्यक्ष पाहणी करून शासनाला सादर करण्यासाठी नुकसानीचा (Kokan Topic) अहवाल तयार केला आहे.
वेंगुर्ले फळ संशोधन केंद्र सहयोगी संचालक शास्त्रज्ञ वैभव शिंदे, कणकवली उपविभागीय कृषी अधिकारी उमाकांत पाटील, देवगड कृषी अधिकारी आरती पाटील, शिरगाव मंडळ कृषी अधिकारी डॉ. बापूसाहेच लांबाडे, आचरा मंडळ कृषी अधिकारी बरडेकर, सहाय्यक कृषी अधिकारी गुरुनाथ बोडेकर, साळशी सरपंच वैशाली सुतार, बागायतदार निलेश नाईक, विक्रांत नाईक, सामाजिक कार्यकर्ते प्रभाकर साळसकर, योगेश मिराशी, संतोष देवणे, निलेश लाड, उमेश नाईक, विजय सुतार, चेतन तोरसकर उपस्थित होते.
Kokan News: कोकणच्या ‘राजा’वर वक्रदृष्टी! खर्च वाढला अन् उत्पादन घटण्याची भीती
वातावरण बदलामुळे मोहरावर परिणाम झालाच शिवाय उत्पादित झालेल्या काजूला किडींच्या प्रादुर्भावाचा सामना करावा लागला. यामुळे काळवंडलेली बी घेण्यास व्यापारी नकार दर्शवत असून अत्यंत कमी दरात काजू विकावा लागत असल्यामुळे यंदा शेतकऱ्यांना घाटा सहन करावा लागणार आहे. काजू बी किडेमुळे मध्यभागी पोखरली जात असल्यामुळे ती पूर्णपणे वाया जात आहे.
आंबा बागायतदारांना नुकसान भरपाई मिळणार? “…प्रयत्न करू”; उदय सामंत
शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी; माजी आमदार नाईक यांची मागणी
नुकसानग्रस्त आंबा व काजू शेतकऱ्यांना राज्य सरकारच्या वतीने तत्काळ व भरघोस नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी माजी आमदार वैभव नाईक यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली. माजी आमदार वैभव नाईक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबई मंत्रालय येथे भेट घेतली. यावेळी त्यांनी मागणीचे निवेदन दिले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत मदत व पुनर्वसन विभागाला कार्यवाही करण्याच्या सुचना दिल्या.
रत्नागिरी हापूसचे महत्व कमी होऊ देणार नाही
अधिक्षक अभियंता महेश सुर्वे कार्यकारी अभियंता गणेश सलगर, विवेक सोनार आदींनी माहिती दिली. आध्यावर प्रादुर्भाव होणार नाही त्यासाठी कोकण कृषी विद्यापीठाने संशोधन करावे, काजू, कोकम, फणस यावर देखील संशोधन झाले पाहिले. फवारणी आधी एक महिना विद्यापीठाने वेळापत्रक दिले पाहिजे, रत्नागिरी हामूराचे महत्व अलियात कामी होऊ देणार नाही. त्यासाठी केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री वियुष गोयल यांची भेट घेतली जाईल. त्यांच्याशी चर्चा करून रत्नागिरी हघूस बाबत समस्या सोडवू.