मंत्री उदय सामंत (फोटो- सोशल मीडिया)
आंबा उत्पादकांना भरपाईसाठी बैठक
तालुकानिहाय अहवाल पाठविण्याच्या सूचना
प्रत्येक ग्रामपंचायतींत स्वयंचलित हवामान केंद्र
रत्नागिरी: गेल्यावर्षी पेक्षा यावर्षी ८० टक्के कमी आंबा उत्त्पादन होत असल्याने याबाबतीतील कारणांसह तालुकानिहाय वस्तुस्थितीचा विस्तृत अहवाल शासनाकडे पाठवा. आंबा बागायतदारांसाठी जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी मंत्रालयात बैठक घेऊन प्रयत्न करु, असे पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी सांगितले.
रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा बागायतदारांच्या अडीअडचणी संदर्भात पालकमंत्री डॉ. सामंत यांनी बैठक घेतली. यावेळी आमदार किरण सामंत, जिल्हाधिकारी मनुज जिंदल, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले, जिल्हा उपनिबंधक डॉ. सोपान शिंदे, अग्रणी जिल्हा व्यवस्थापक दर्शन कानसे, माजी नगराध्यक्ष राहुल पंडित, बंड्या साळवी यांच्यासह आंबा बागायतदार उपस्थित होते. कृषी विभाग आणि कोकण कृषी विद्यापीठाने दिलेल्या संयुक्त अहवालात प्रदीर्घ दव व थंडीमुळे मोहोर काळा पडला, नर मोहोरांचे प्रमाण वाढले, तुडतुडा, फुलकिडीमुळे गतवर्षी पेक्षा चालू वर्षी ८० टक्के आंबा उत्पादन कमी झाल्याचे सदाफुले यांनी सांगितले.
Sindhudurg News: आंबा बागायतदारांना लवकरच दिलासा मिळणार; नितेश राणे काय म्हणाले?
पालकमंत्री डॉ. सामंत म्हणाले, अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ, पणनमंत्री जयकुमार रावल, कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यासोबत बैठक लावू. या बैठकीत जिल्ह्यातील आंबा काजू बागायतदारांचे प्रश्न मार्गी लावू, त्यांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला जाईल. स्वयंचलित हवामान केंद्र प्रत्येक ग्रामपंचायतींमध्ये बसविले जातील. असे केंद्र बसवणारा राज्यातील रत्नागिरी पहिला जिल्हा असेल, जिल्ह्यातील जलसंपदा, मृदा व जलसंधारण विभाग, भू संपादन, मंजूर व नियोजित कामांच्या सद्यस्थितीबाचतही आढावा घेण्यात आला.
Kokan News: कोकणच्या ‘राजा’वर वक्रदृष्टी! खर्च वाढला अन् उत्पादन घटण्याची भीती
रत्नागिरी हापूसचे महत्व कमी होऊ देणार नाही
अधिक्षक अभियंता महेश सुर्वे कार्यकारी अभियंता गणेश सलगर, विवेक सोनार आदींनी माहिती दिली. आध्यावर प्रादुर्भाव होणार नाही त्यासाठी कोकण कृषी विद्यापीठाने संशोधन करावे, काजू, कोकम, फणस यावर देखील संशोधन झाले पाहिले. फवारणी आधी एक महिना विद्यापीठाने वेळापत्रक दिले पाहिजे, रत्नागिरी हामूराचे महत्व अलियात कामी होऊ देणार नाही. त्यासाठी केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री वियुष गोयल यांची भेट घेतली जाईल. त्यांच्याशी चर्चा करून रत्नागिरी हघूस बाबत समस्या सोडवू.






