
Kokan News: कोकणच्या 'राजा'वर वक्रदृष्टी! खर्च वाढला अन् उत्पादन घटण्याची भीती
कोकणच्या ‘राजा’वर वक्रदष्टी
हाूपसला ग्लोबल वॉर्मिंगचा फटका
सहाव्यांदा फवारणी करण्याची आली वेळ
रत्नागिरी: कोकणचा राजा मानला जाणाऱ्या हापूस आंब्यावर यंदा निसर्गाची वक्रदृष्टी पडली असून, रत्नागिरीसह संपूर्ण किनारपट्टीवर बागायतदार हवालदिल झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून कोकणातील हवामानात होणारे अनपेक्षित बदल कधी दाट धुके, कधी कडक ऊन तर कधी अवकाळी पाऊस यामुळे आंब्याच्या मोहोरावर बुरशीजन्य रोगाचा मोठा प्रादुर्भाव झाला आहे. आंबा उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग या तिन्ही जिल्ह्यांत हीच भीषण परिस्थिती पाहायला मिळत आहे. विशेषतः रत्नागिरीतील नाचणे सारख्या भागात बागांमधील मोहोर अक्षरशः काळा पडला आहे. यंदाच्या हंगामाच्या सुरुवातीला पहिल्या टप्प्यात मोहोर अपेक्षेप्रमाणे आलाच नव्हता.
त्यानंतर मोठ्या आशेने दुसऱ्या टप्प्यातील मोहोराची प्रतीक्षा शेतकऱ्यांना होती; मात्र आता हा मोहोरही बुरशीमुळे करपून गेल्याने बागायतदारांच्या चिंतेत भर पडली आहे. सातत्याने बदलणाऱ्या हवामानामुळे रोगाचा प्रादुर्भाव इतका वाढला आहे की, अनेक ठिकाणी मोहोर पूर्णपणे गळून पडत आहे. हे संकट निवारण्यासाठी शेतकरी सध्या बागांमध्ये दिवसरात्र राबताना दिसत आहेत.
रोगावर नियंत्रण मिळवण्यासाठी कीटकनाशकांची आणि बुरशीनाशकांची फवारणी युद्धपातळीवर सुरू आहे. अनेक शेतकऱ्यांनी आतापर्यंत पाच-पाच वेळा फवारण्या पूर्ण केल्या आहेत. तरीही रोगावर नियंत्रण मिळवणे कठीण जात आहे. आता सहाव्यांदा फवारणी करण्याची वेळ शेतकऱ्याऱ्यांवर आली आहे.
कोकणच्या ‘राजा’वर निसर्ग कोपला; बागायतदार चिंतेत; उत्पादनात घट होण्याची शक्यता
बाजारात मिळणारी ही औषधे अत्यंत महागडी असून, वारंवार कराव्या लागणाऱ्या फवारण्यांमुळे उत्पादनाचा खर्च आवाक्याबाहेर गेला आहे, एकीकडे फवारणीचा खर्च वाढत आहे आणि दुसरीकडे प्रत्यक्ष उत्पादन मात्र घटण्याची शक्यता असल्याने शेतकरी दुहेरी कात्रीत अडकला आहे.
बागायतदार चिंतेत
यंदाच्या लांबलेल्या पावसाळ्यानंतर वाढलेला थंडीचा हंगाम, या बदलेल्या हवामानाचा आंब्याच्या मोहरावर विपरीत परिणाम झाला. परिणामी, मोठ्या अपेक्षेने बहरलेला मोहर काळवंडून गळून पडल्याचे अनेक ठिकाणी आढळून आल्याने आंब्याला फळ धारणा होण्याची शक्यता फारच कमी झाली आहे. त्यामुळे (Ratnagiri) मंडणगड तालुक्यातील आंबा बागायतदार चिंतातूर अवस्थेत आहेत.
थंडीमुळे मोहर करपल्याने काजू पिकाला फटका; कोकणातील शेतकऱ्यांना मदत करण्याची मागणी
हे दृष्य केवळ कमी अधिक प्रमाणात कोकणातील रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक ठिकाणी दिसते. खरं तर यंदाच्या मोसमात सुरवातीस आंब्याला अतिशय चांगला मोहर बहरल्याचे दिसले. त्यामानाणे आंब्याचे चांगले पिक येण्याची अधिक अपेक्षा असताना आंब्याचा मोहरच खराब झाल्याने बागायतदारांच्या पदरी निराशा पडली आहे.