
श्रृंगारतळीत कमर्शियल सिलिंडर गॅसचा तुटवडा
टंचाईवर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी
व्यावसायिकावर हॉटेल बंद करण्याचा येणार वेळ
गुहागर: गुहागर तालुक्याची आर्थिक राजधानी श्रृंगारतळी बाजारपेठेतील सर्व हॉटेल दोन दिवसांतच बंद होण्याच्या मार्गावर आहेत. कमर्शियल सिलिंडरचा तुटवडा व ते देणे बंद केल्याने जेमतेम १ दिवस पुरेल एवढेच सिलिंडर गॅस उपलब्ध असल्याने ही आपत्ती व्यवसायिकांवर ओढवली आहे. बहुसंख्य हॉटेल व्यवसायिकांनी (Ratnagiri) हॉटेलमध्ये सूचना फलक लावून तळलेले पदार्थ बंद केल्याचे सूचित केले आहे. त्यामुळे श्रृंगारतळी बाजारपेठेत येणाऱ्या नागरिकांना नाष्टा, जेवण मिळणे जिकरीचे होणार असून हॉटेल व्यवसायिकांच्या धंद्यावर याचा मोठा आर्थिक परिणाम होणार आहे.
महाराष्ट्रात गॅसचा मोठी टंचाई निर्माण झाली आहे. भारतात गॅस पुरवठा कमी होत असल्याने याचा कमर्शियल गॅस पुरवठ्यावर मोठा परिणाम झाल्याचे सांगितले जात आहे. ज्यामुळे अनेक ठिकाणी हॉटेल्स बंद पडण्याची किंवा चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ आली आहे. गॅसचा व्यावसायिकांवर हॉटेल बंद तुटवडा निर्माण झाल्यामुळे रेस्टॉरंट्सना तळलेले पदार्थ बंद करावे लागत आहेत आणि व्यवसाय सुरळीत करण्यासाठी तातडीने उपाययोजनांची मागणी होत आहे.
RATNAGIRI: रत्नागिरीत ९५ टक्के व्यावसायिक गॅस सिलेंडरचे वितरण बंद?
श्रृंगारतळी ही गुहागर तालुक्याची मध्यवर्ती व सर्वांत मोठी बाजारपेठ आहे. येथे नौकरी-व्यवसायासाठी अनेक नागरिक ग्रामीण भागातून येतात, सर्व प्रकारची शासकीय कार्यालये येथे आहेत. त्यामुळे येथे दिवस-रात्र खवय्यांचा राबता असतो. शृंगारतळीत सुमारे १२ हॉटेल आहेत, वडापावचे २५ स्टॉल तर चायनीजचे १५ स्टॉल येथे थाटलेले दिसून येतात. एकूणच या व्यवसायिकांवर मोठी आर्थिक टांगती तलवार आहे.
कमर्शियल सिलिंडर देणे बंद केल्याने हॉटेलमध्ये माजेकेच पदार्थ सध्या तयार केले जात आहेत. विशेष करून तळलेले पदार्थ बंद करण्यात आले आहेत. आता एक दिवसात हॉटेल बंद करण्याची नामुष्की व्यवसायिकांवर येणार असल्याची माहिती हॉटेल व्यवसायिकांनी दिली आहे. तसे फलक हॉटेलमध्ये ग्राहकांच्या माहितीसाठी लावण्यात आले आहेत.
स्वयंपाकघर सध्या अडचणींच्या भोवऱ्यात? LPG चा तुटवडा अन् उद्योगधंद्यावरही परिणाम
स्वयंपाकघर सध्या अडचणींच्या भोवऱ्यात?
अखेर, गॅस संकटामुळे, केंद्र सरकारला आवश्यक वस्तू देखभाल कायदा (ESMA) लागू करावा लागला. भारतात इंधनाच्या प्रश्नावर चिंता पसरली आहे. इराणने होर्मुझच्या सामुद्रधुनीतून होणारी वाहतूक रोखली आहे, जी जगातील २० टक्के इंधनाची वाहतूक करते. सौदी अरेबिया, इराण, इराक, कुवेत, कतार आणि युएई येथून भारत, चीन, जपान आणि दक्षिण कोरियाला होणारा कच्च्या तेलाचा आणि नैसर्गिक वायूचा पुरवठा या सामुद्रधुनीतून थांबवण्यात आला आहे. येथून ८४ टक्के तेल आशियाई बाजारपेठेत पोहोचते.