
महामार्गावरील अनेक वळणे अजूनही धोकादायक आहेत. रस्ता चौपदरी झाला, पण नियोजनातील त्रुटी कायम राहिल्या. काही ठिकाणी सेवा रस्त्यांची अवस्था दयनीय आहे. पावसाळ्यात पाणी साचते, खड्डे पडतात आणि अपघातांचा धोका वाढतो. महामार्गाच्या अनेक भागांमध्ये काम अपूर्ण असल्याच्या आणि दोष निर्माण झाल्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत आहेत.
हा तर टाळूवरचं लोणी खाण्याचा प्रकार? ‘… मगच टोल घ्या’; Mumbai -Goa चे काम कधी होणार पूर्ण?
कोकणातील जनतेला अनेक वर्षे ‘यावर्षी महामार्ग पूर्ण होईल’, ‘प्रवास ६ तासांत होईल’, अशी आश्वासने देण्यात आली. प्रत्यक्षात मात्र नागरिकांना खड्डे, वाहतूक कोंडी, अपूर्ण कामे आणि निकृष्ट दर्जाचा रस्ता यांचा सामना करावा लागत आहे. महामार्गाचे काम ९७ टक्के पूर्ण झाल्याचा दावा करण्यात आला असला तरी प्रत्यक्ष अनुभव वेगळीच कहाणी सांगतो. या महामार्गाच्या कामाची उत्त्वस्तरीय चौकशी करून दोषी कंत्राटदारांवर कारवाई झाली पाहिजे. कोकणवासीयांना आश्वासने नकोत, तर सुरक्षित, दर्जेदार आणि टिकाऊ महामार्ग हवा आहे अशी मागणी आता जोर धरू लागली असून आता या बेजबाबदार कामाच्या विरोधात जनतेतूनच उद्रेक होण्याची शक्यता देखील व्यक्त केली जात आहे.
थेट टोल प्लाझा जप्तीचाच न्यायालयाने दिला आदेश; ऐतिहासिक निर्णयाचीच आता सगळीकडे चर्चा…
Mumbai -Goa चे काम कधी होणार पूर्ण?
तब्बल १७ते १८ वर्षांपासून रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण नेमके कधी पूर्ण होणार, हा यक्षप्रश्न आता संपूणर्ण कोकणवासीयांसह लाखो प्रवाशांना पडला आहे. सुरुवातीपासूनच विविध कारणांमुळे लांबणीवर पडलेल्या या महामार्गाच्या कामाची पोलखोल यंदाच्या मुसळधार पावसाने पुन्हा एकदा उघड्यावर आणली आहे. महामार्गावर ठिकठिकाणी खड्यांचे आणि चिखलाचे साम्राज्य पसरले असून, कॉंक्रिटीकरण केलेल्या रस्त्यालाही अनेक ठिकाणी तडे पडल्याचे दिसून येत आहे.