मुंबई-गोवा महामार्गाचे काम कधी होणा? (फोटो- ai gemini)
रस्त्यावरील या भेगा लपवण्यासाठी त्यात डांबर भरले जात असल्याचेही दिसून येत आहे. नागरिकांना दररोज नाहक हालअपेष्ट आणि जीवाचा धोका पत्करून प्रवास करावा लागत आहे. काही टप्प्यांमध्ये काम अत्यंत संथ गतीने सुरू आहे. प्रशासकीय दिरंगाई आणि कंत्राटदारांच्या मनमानी कारभारामुळे प्रवाशांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात असून, महामार्गाची ही दुरवस्था कधी संपणार असा सवाल विचारला जात आहे.
थेट टोल प्लाझा जप्तीचाच न्यायालयाने दिला आदेश; ऐतिहासिक निर्णयाचीच आता सगळीकडे चर्चा…
चाकरमान्यांच्या पदरी यंदाही पडणार निराशाच?
काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवामुळे कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची चिंता आता अधिकच वाढली आहे. गणेशोत्सवासाठी मुंबई, ठाणे, पुण्यासह राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो गणेशभक्त आपल्या मूळ गावी कोकणात दाखल होत असतात. मात्र अपूर्ण महामार्ग, तासनतास होणारी वाहतूक कोंडी आणि चिखलाच्या साम्राज्यामुळे यंदाही त्यांचा प्रवास कमालीचा त्रासदायक ठरणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून गणेशोत्सवात सुरळीत प्रवासाचे स्वप्न पाहणाऱ्या चाकरमान्यांच्या पदरी यंदाही निराशाच पडण्याची चिन्हे दिसत आहेत. तरीही यावर कोणतीही ठोस उपाययोजना न झाल्याने आगामी सणासुदीच्या काळात महामार्गावर प्रचंड दळणवळणाचा खोळंबा होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
आधी रस्ता पूर्ण करा, आणि मगच टोल घ्या…
एकीकडे महामार्गाचे काम वर्षानुवर्षे अपूर्ण असताना आणि रस्ता खड्कुचात गेलेला असतानाच दुसरीकडे मात्र टोल वसुलीची तयारी सुरू झाली आहे. महामार्गावर काम अपूर्ण असलेल्या अनेक ठिकाणी टोल प्लाझाची आधुनिक यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, येत्या ऑगस्ट महिन्यापासून या अपूर्ण महामार्गावर टोल वसुली सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मुंबई-गोवा हायवेवर ३ टोलनाके! प्रवाशांच्या खिशावर आता तिहेरी भार; वाहनचालकांमध्ये तीव्र नाराजी
रस्ता चालण्यायोग्य नसताना आणि सुरक्षा व्यवस्था वाऱ्यावर असताना टोल आकारण्याच्या या निर्णयामुळे कोकणवासीयांमध्ये असंतोषाचा वणवा पेटला आहे. ‘आधी रस्ता पूर्ण करा, मगच टोल घ्या’ अशी आक्रमक भूमिका स्थानिक नागरिकांनी घेतली आहे. काम अपूर्ण असताना टोलवसुलीचा घाट घातल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा संतप्त प्रवाशांनी व स्थानिक संघटनांनी दिला आहे.






