
Rahul Gandhi : ‘माजी लष्करप्रमुख खोटे बोलत नाहीत’, नरवणे यांच्या पुस्तकावरून राहुल गांधींचा सरकारवर
“बारामतीतील विमान अपघातात झालेल्या अजितदादांच्या दुर्दैवी निधनाबाबत महाराष्ट्रासह माझ्याही मनात अनेक शंका आहेत. यासंदर्भात आज (मंगळवार, दि. १० फेब्रुवारी) सायंकाळी ४ वाजता यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई या ठिकाणी पत्रकार परिषद घेऊन महत्त्वाचे आणि डोळे उघडणारे मुद्दे तपशीलवार मांडणार आहे.” अशा शब्दांत रोहित पवारांनी शंका उपस्थित केली आहे. त्याचवेळी आज सायंकाळी ४ वाजता होणाऱ्या पत्रकार परिषदेत ते काय बोलणार याबाबत अनेकाच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे.
बारामतीतील विमान अपघातात झालेल्या अजितदादांच्या दुर्दैवी निधनाबाबत महाराष्ट्रासह माझ्याही मनात अनेक शंका आहेत. यासंदर्भात आज (मंगळवार, दि. १० फेब्रुवारी) सायंकाळी ४ वाजता यशवंतराव चव्हाण सेंटर, मुंबई या ठिकाणी पत्रकार परिषद घेऊन महत्त्वाचे आणि डोळे उघडणारे मुद्दे तपशीलवार मांडणार… — Rohit Pawar (@RRPSpeaks) February 10, 2026
मिळालेल्या माहितीनुसार, आजच्या पत्रकार परिषदेत रोहित पवार अजित पवार यांच्या विमान अपघाताचा घटनाक्रम, हवामान, आणि उड्डाणापूर्वीच्या काही संशयास्पद घटनांवर भाष्य करू शकतात. रोहित पवारांच्या यांच्या आजच्या पत्रकार परिषदेमुळे राज्यात पुन्हा मोठा भूकंप होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अजित पवार यांच्या अपघातामागे काही षडयंत्र होते की काही तांत्रिक चूक, यावरूनही आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जाण्याची शक्यता आहे.
अजित पवार यांच्या निधनानंतर राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट (शरद पवार गट आणि अजित पवार गट) पुन्हा एकत्र येणार का? या प्रश्नाने राजकीय वर्तुळात जोर धरला आहे. या पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार यांनी केलेल्या विधानाने सर्वांचे लक्ष वेधले आहे.
Revati Sule wedding : सुप्रिया सुळेंच्या घरी वाजणार सनई-चौघडे; रेवती सुळे होणार नागपूरच्या सुनबाई
अजित पवार यांचे २८ जानेवारी रोजी एका भीषण विमान अपघातात निधन झाले. जिल्हा परिषदांच्या निवडणुकांच्या प्रचारासाठी अजित पवार २८ जानेवारीला बारामतीला येत होते. पण बारामती विमानतळावर सकाळी साधारण ८:४५ च्या सुमारास अजित पवार यांचे खाजगी विमान बारामती विमानतळावर लँडिंग करत होते. पण लँडिंगच्या वेळी विमान अचानाक जमिनीवर कोसळले. जमिनीवर कोसळताच विमानाचा स्फोट झाला आणि या आगीची तीव्रता इतकी मोठी होती की, अजित पवार यांच्यासह विमानातील त्यांच्या इतर सहकाऱ्यांचा जागीच मृत्यू झाला.
प्रत्यक्षदर्शी आणि प्राथमिक माहितीनुसार, अपघाताच्या वेळी हवामान पूर्णपणे स्वच्छ होते. दृश्यमानता (Visibility) चांगली असतानाही विमान कोसळल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. हवामान चांगले असताना विमान नेमके कसे कोसळले, याबाबत आता तांत्रिक तज्ज्ञांकडून शंका उपस्थित केल्या जात आहेत. खासदार बजरंग सोनवणे यांनी व्यक्त केलेला ‘बॉम्ब’ किंवा ‘स्फोटाचा’ संशय याच पार्श्वभूमीवर आता चर्चेचा विषय ठरत आहे. या भीषण दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले असून, विमानाचा ‘ब्लॅक बॉक्स’ आणि इतर तांत्रिक बाबींच्या आधारे सत्य शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे.