Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘आरपीएफ’चे असेही प्रसंगावधान! तब्बल ४४ रेल्वे प्रवाशांना जीवनदान

अनेक वेळा रेल्वे गाडी पकडण्याच्या घाईत प्रवासी जीव धोक्यात घालतात. गाडी आणि फलाटाच्या मोकळ्या जागेत प्रवासी पडण्याच्या घटनाही घडतात. याचबरोबर काही जण लोहमार्गावर जाऊन आत्महत्या करण्याच्या प्रयत्न करतात. अशा वेळी प्रसंगावधान दाखवून रेल्वे सुरक्षा दलाचे जवान या प्रवाशांचा जीव वाचवितात. मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा दलाने यंदा एप्रिल ते नोव्हेंबर या कालावधीत अशा ४४ जणांचे प्राण वाचविले आहेत.

  • By Aparna
Updated On: Jan 01, 2024 | 03:48 PM
‘आरपीएफ’चे असेही प्रसंगावधान! तब्बल ४४ रेल्वे प्रवाशांना जीवनदान
Follow Us
Close
Follow Us:

पुणे : अनेक वेळा रेल्वे गाडी पकडण्याच्या घाईत प्रवासी जीव धोक्यात घालतात. गाडी आणि फलाटाच्या मोकळ्या जागेत प्रवासी पडण्याच्या घटनाही घडतात. याचबरोबर काही जण लोहमार्गावर जाऊन आत्महत्या करण्याच्या प्रयत्न करतात. अशा वेळी प्रसंगावधान दाखवून रेल्वे सुरक्षा दलाचे जवान या प्रवाशांचा जीव वाचवितात. मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा दलाने यंदा एप्रिल ते नोव्हेंबर या कालावधीत अशा ४४ जणांचे प्राण वाचविले आहेत.

रेल्वे सुरक्षा दलाच्या (आरपीएफ) जवानांवर रेल्वेच्या मालमत्तेचे रक्षण करण्याची जबाबदारी असते. त्याचबरोबर रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेचीही काळजी त्यांना घ्यावी लागते. रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांनी जीवनरक्षक या मोहिमेचा एक भाग म्हणून मध्य रेल्वेवर एप्रिल ते नोव्हेंबर २०२३ या कालावधीत स्वतःचा जीव धोक्यात घालून आतापर्यंत ४४ जणांचा प्राण वाचविला आहे. त्यात एकट्या मुंबई विभागात २१ घटनांची नोंद झाली आहे. भुसावळ विभागात १५ घटना, पुणे विभागात ४, तर नागपूर विभागात २ आणि सोलापूर विभागात २ जीव वाचवण्याच्या घटनांची नोंद झालेली आहे.

रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांना प्रवासी आणि रेल्वे मालमत्तेवरील गुन्हे, दहशतवादी कारवाया , रेल्वेच्या वाहतुकीत होणारा अडथळा, हरवलेल्या मुलांची सुटका, तसेच रेल्वेस्थानक आणि रेल्वे परिसरात अमली पदार्थ जप्त करणे, प्रवाशांचे सामान परत मिळवणे आदी कर्तव्ये पार पाडावी लागतात. त्याचप्रमाणे प्रवाशांच्या सुरक्षिततेकडेही त्यांना लक्ष द्यावे लागते.

-प्रवाशांनी धोका पत्करू नये
काही वेळा प्रवासी निष्काळजीपणा करतात आणि धावत्या गाडीमध्ये चढताना किंवा उतरताना धोका पत्करतात. अशा प्रवाशांचा जीव वाचविण्याचे काम रेल्वे सुरक्षा दलाला करावे लागते. त्यामुळे प्रवाशांनी गाडी सुटण्याच्या वेळेआधी स्थानकावर पोहोचणे गरजेचे आहे. याचबरोबर प्रवाशांनी धावत्या गाडीमधून चढू अथवा उतरू नये आणि जीव धोक्यात घालू नये, असे आवाहन मध्य रेल्वेने केले आहे.

Web Title: Rpf s also a case in point as many as 44 railway passengers lost their lives nrab

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 01, 2024 | 03:48 PM

Topics:  

  • maharashra news
  • maharashtra
  • Pune
  • pune news

संबंधित बातम्या

Sarasbagh padwa pahat: पुण्यातील सारसबागेतील पाडवा पहाट होणार रद्द? कार्यक्रमाला हिंदू संघटनांचाच विरोध
1

Sarasbagh padwa pahat: पुण्यातील सारसबागेतील पाडवा पहाट होणार रद्द? कार्यक्रमाला हिंदू संघटनांचाच विरोध

राज्य सरकारचा शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय! आता ३ हेक्टरपर्यंत मिळणार नुकसान भरपाई
2

राज्य सरकारचा शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय! आता ३ हेक्टरपर्यंत मिळणार नुकसान भरपाई

Ladki Bahin Yojana की लाडका भाऊ योजना? 12431 पुरुषांची योजनेत घुसखोरी, सरकारी नोकरी असलेल्या पुरूषांचा समावेश
3

Ladki Bahin Yojana की लाडका भाऊ योजना? 12431 पुरुषांची योजनेत घुसखोरी, सरकारी नोकरी असलेल्या पुरूषांचा समावेश

माघार नाहीच ! महायुतीतील दोन बड्या नेत्यात अखेर लढाई ठरली; अजित पवार अन् मुरलीधर मोहोळ भिडणार
4

माघार नाहीच ! महायुतीतील दोन बड्या नेत्यात अखेर लढाई ठरली; अजित पवार अन् मुरलीधर मोहोळ भिडणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.