Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सरपंच -उपसरपंचांनी मिळालेल्या पदाचा उपयोग गावच्या सर्वांगीण विकासासाठी करावा; दत्तात्रय भरणे यांचे आवाहन

मिळालेल्या पदाचा उपयोग सर्वसामान्यांच्या हितासाठी केल्यास, समाज निश्चित दखल घेतो, त्यामुळे सरपंच व उपसरपंच यांनी गावचा विकास आराखडा तयार करून गावचा सर्वांगीण विकास करावा, असे आवाहन माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Aug 11, 2022 | 05:56 PM
सरपंच -उपसरपंचांनी मिळालेल्या पदाचा उपयोग गावच्या सर्वांगीण विकासासाठी करावा; दत्तात्रय भरणे यांचे आवाहन
Follow Us
Close
Follow Us:

बारामती : मिळालेल्या पदाचा उपयोग सर्वसामान्यांच्या हितासाठी केल्यास, समाज निश्चित दखल घेतो, त्यामुळे सरपंच व उपसरपंच यांनी गावचा विकास आराखडा तयार करून गावचा सर्वांगीण विकास करावा, असे आवाहन माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले. दैनिक नवभारत वृत्तपत्र समूहाचे मराठी दैनिक नवराष्ट्रच्या वतीने बारामती येथील हॉटेल रॉयल इन या ठिकाणी बारामती सह, इंदापूर, दौंड, पुरंदर व भोर या तालुक्यातील आदर्शवत कार्य करणाऱ्या सरपंच व उपसरपंच यांना विविध पुरस्काराने दत्तात्रय भरणे व एग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे चेअरमन राजेंद्र पवार यांच्या हस्ते गौरवण्यात आले. यावेळी भरणे बोलत होते.

यावेळी भरणे म्हणाले, गावामध्ये सरपंच हा महत्त्वाचा घटक असतो. सर्वसामान्य माणूस हा केंद्रबिंदू मानून गावातील सर्वच घटकासाठी जीव ओतून काम करण्याची आवश्यकता असते. मिळाले पद दिखाऊपणासाठी नसून सर्वसामान्यांच्या हितासाठी असते, ही बाब प्रत्येकाने लक्षात घेतली पाहिजे. त्यामुळे पाणी, आरोग्य, वीज, रस्ते, गटार व्यवस्था या मूलभूत सुविधा प्रत्येक घटकांना देण्यासाठी गावचा विकास आराखडा तयार करण्याची आवश्यकता असते. सरपंच व उपसरपंच यांना काम करण्याची मोठी संधी असते. पदाचा गर्व न बाळगता काम करण्याची आवश्यकता आहे. दै नवराष्ट्र ने आयोजित केलेला हा सन्मान कौतुकास्पद असून चांगले काम करणाऱ्या सरपंच व उपसरपंच यांना पुरस्कार मिळाल्याने त्यांच्यामध्ये आणखी काम करण्याची ऊर्जा निर्माण होईल असा विश्वास भरणे यांनी यावेळी व्यक्त केला.

राजेंद्र पवार यांनी आपल्या भाषणात नवराष्ट्र ने आयोजित केलेल्या या उपक्रमाचे कौतुक करून ते म्हणाले, गावच्या प्रमुखांनी नेहमी सावध राहणे गरजेचे असून त्यांच्यामध्ये धडपड व बारीक-सारीक गोष्टींची जाणीव हवी. निधीचा योग्य विनियोग हवा यासाठी काळजी घेण्याची आवश्यकता आहे. सरपंच मंडळींनी गाव समृद्ध करण्यासाठी विविध योजना राबविण्याची गरज आहे. गावातील महिला पुरुष शेतकरी यांचे उत्पन्न मोठ्या प्रमाणावर वाढण्यासाठी सरपंचांनी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. गावातील महिला व पुरुषांचे उत्पन्न वाढल्यास ग्रामपंचायतींना कर गोळा करणे सोपे होईल. त्यामुळे उत्पन्न वाढीसाठी गावच्या प्रमुखांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन राजेंद्र पवार यांनी यावेळी केले. दरम्यान कार्यक्रमाच्या प्रारंभी मधुबन फार्म प्रा लि चे प्रविण कस्पटे, नेटसर्फ चे अमित शिंदे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

[read_also content=”महापालिकेच्या क्षेत्रीय अधिकाऱ्यांचे कर आकारणीचे अधिकार काढले https://www.navarashtra.com/maharashtra/the-taxing-powers-of-municipal-zonal-officers-were-removed-nrdm-314884/”]

माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी मला सरपंच अथवा उपसरपंच पदाचा अनुभव नव्हता. मी सहकारी संस्थेमध्ये कार्यरत होतो. मात्र अचानक जिल्हा परिषद अध्यक्ष पदाची संधी शरद पवार, अजित पवार व सुप्रिया सुळे यांच्यामुळे मिळाली. मात्र मिळालेल्या संधीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर विकास निधी आणून सर्वसामान्यांचे प्रश्न मार्गी लावले. आपण केलेल्या कामाची समाज दखल घेतोच. त्यामुळे या कामाची पोचपावती म्हणून जनतेने आपणास निवडून दिले. यानंतर मंत्री पदाची संधी मिळाली. मात्र सर्वसामान्य हाच केंद्रबिंदू मानून आपण पदाचा कधीही गर्व केला नाही. त्यामुळे सत्ताही रुबाबासाठी नसून जनतेच्या हितासाठी असते हे प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी लक्षात घेतले पाहिजे, असे दत्तात्रय भरणे यांनी यावेळी सांगितले.

Web Title: Sarpanch upasarpanch should use the position obtained for the overall development of the village dattatraya bharnes appeal nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 11, 2022 | 04:18 PM

Topics:  

  • baramati
  • Dattatray Bharne
  • NAVARASHTRA
  • Navarashtra Live
  • Navarashtra live Upadates
  • navarashtra news
  • Navarashtra Update

संबंधित बातम्या

Sindhudurg : निवडणुकीत आरोप फक्त हरलेल्या पक्षाचे असतात – केसरकर
1

Sindhudurg : निवडणुकीत आरोप फक्त हरलेल्या पक्षाचे असतात – केसरकर

महाराष्ट्र बदलत आहे…१७ ऑगस्ट शेवटची संधी, लवकरच सहभागी व्हा @ MH 1st Conclave 2025
2

महाराष्ट्र बदलत आहे…१७ ऑगस्ट शेवटची संधी, लवकरच सहभागी व्हा @ MH 1st Conclave 2025

Top Marathi News Today Updates : गोंदियात छगन भुजबळांचा ध्वजारोहणास नकार; प्रकृतीचे दिले कारण
3

Top Marathi News Today Updates : गोंदियात छगन भुजबळांचा ध्वजारोहणास नकार; प्रकृतीचे दिले कारण

तुमचा एक प्रश्न महाराष्ट्राची दिशा बदलू शकतो! @ MH 1st Conclave 2025 मध्ये सहभागी होण्यासाठी फॉलो करा ‘या’ स्टेप्स
4

तुमचा एक प्रश्न महाराष्ट्राची दिशा बदलू शकतो! @ MH 1st Conclave 2025 मध्ये सहभागी होण्यासाठी फॉलो करा ‘या’ स्टेप्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.