Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरुन शरद पवारांची राष्ट्रवादी आक्रमक; तीव्र आंदोलनाचा दिला इशारा

सरकारने तत्काळ ओला दुष्काळ जाहीर करून सर्व निकष व नियम बाजूला ठेवत संपूर्ण शेतकऱ्यांना कर्जमाफी करावी, अशी ठाम मागणी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष, माजी मंत्री शशिकांत शिंदे यांनी केली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Sep 21, 2025 | 06:14 PM
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरुन शरद पवारांची राष्ट्रवादी आक्रमक; तीव्र आंदोलनाचा दिला इशारा

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरुन शरद पवारांची राष्ट्रवादी आक्रमक; तीव्र आंदोलनाचा दिला इशारा

Follow Us
Close
Follow Us:

कराड : राज्यात गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांची पिके पूर्णपणे उद्ध्वस्त झाली असून, त्यातून गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर सरकारने तत्काळ ओला दुष्काळ जाहीर करून सर्व निकष व नियम बाजूला ठेवत संपूर्ण शेतकऱ्यांना कर्जमाफी करावी, अशी ठाम मागणी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष, माजी मंत्री शशिकांत शिंदे यांनी केली आहे. कराड येथील शासकीय विश्रामगृहात मराठा बांधवांच्या वतीने झालेल्या नागरी सत्कारानंतर माध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादनही केले.

शिंदे म्हणाले, कर्जमाफीशिवाय शेतकऱ्यांचा प्रश्न सुटणार नाही. मे महिन्यापासून खरीप व रब्बी पिके वाया गेली आहेत. १३०० हून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. सरकारने जर कर्जमाफी केली नाही, तर आम्हाला रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करावे लागेल.

मराठा आंदोलनादरम्यान केलेल्या मदतीबाबत बोलताना शिंदे म्हणाले, आंदोलकांना निवास व सोयी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी कर्तव्य म्हणून पार पाडली. सरकारने आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न केला, तरीही व्यापक सहभागामुळे आंदोलन यशस्वी ठरले. भाजप काही लोकांकडून समाजात दरी निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. मराठा आणि ओबीसी यांच्याबाबत सरकारने दिलेली स्क्रिप्ट वाचून दोन समाजात दरी पसरवण्याचा प्रयत्न होत आहे. सरकारची नेमकी भूमिका काय आहे, हे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट करावी, अशी मागणी त्यांनी केली. दरम्यान, सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने शशिकांत शिंदे यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला. याप्रसंगी आंदोलकांना मराठा बांधव म्हणून केलेली मदत, हे आपले कर्तव्य असल्याचे शिंदे यांनी सांगितले. याप्रसंगी अनेकांनी मनोगत व्यक्त केले.

काही लोकांकडून थोर व्यक्तिमत्वांचा अपमान

शिंदे म्हणाले, महाराष्ट्राची ओळख सुसंस्कृत राजकारणाची आहे. मात्र अलीकडे थोर व्यक्तिमत्त्वांचा अपमान करण्याचे धाडस सरकारमधील काही लोक सातत्याने करत आहेत. हे खपवून घेतले जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत बोलताना शिंदे म्हणाले, महाविकास आघाडीच्या नेत्यांशी चर्चा सुरू असून, जागावाटपावर स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. लोकांमध्ये प्रचंड असंतोष आहे. जर त्याला क्रांतीचे रूप दिले, तर निश्चितपणे बदल घडेल, असेही त्यांनी सांगितले.

Web Title: Sharad pawars ncp has become aggressive over farmers loan waiver

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 21, 2025 | 06:14 PM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • Farmers
  • Shashikant Shinde

संबंधित बातम्या

“महाराष्ट्रात मराठीच सक्तीची…”; साहित्यरसिकांनी CM फडणवीसांकडे केली महत्वाची मागणी
1

“महाराष्ट्रात मराठीच सक्तीची…”; साहित्यरसिकांनी CM फडणवीसांकडे केली महत्वाची मागणी

९९ व्या Akhil Bhartiya Sammelan चे उद्घाटन, सातारामध्ये भरला साहित्यिकांचा मेळा
2

९९ व्या Akhil Bhartiya Sammelan चे उद्घाटन, सातारामध्ये भरला साहित्यिकांचा मेळा

“नैसर्गिक शेती हे पवित्र…”; राज्यपाल आचार्य देवव्रत यांची कृषी विद्यापीठांना सूचना
3

“नैसर्गिक शेती हे पवित्र…”; राज्यपाल आचार्य देवव्रत यांची कृषी विद्यापीठांना सूचना

कोरेगाव भीमा शौर्यदिनासाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त; तब्बल ‘इतके’ कर्मचारी असणार तैनात
4

कोरेगाव भीमा शौर्यदिनासाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त; तब्बल ‘इतके’ कर्मचारी असणार तैनात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.