Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Shrikant Shinde : “बाळासाहेबांचा मतदानाचा हक्क रद्द करणाऱ्यांचा उबाठाला विसर”, श्रीकांत शिंदे यांची सडकून टीका

लोकसभेत निवडणुक सुधारणांवरील चर्चेत उबाठा आणि काँग्रेसला घेरलं. लोकसभा-विधानसभेसाठी उमेदवारांचे किमान वय २५ ऐवजी १८ किंवा २१ करण्याची मागणी करण्यात आली.

  • By श्वेता झगडे
Updated On: Dec 09, 2025 | 07:04 PM
"बाळासाहेबांचा मतदानाचा हक्क रद्द करणाऱ्यांचा उबाठाला विसर", श्रीकांत शिंदे यांची सडकून टीका

"बाळासाहेबांचा मतदानाचा हक्क रद्द करणाऱ्यांचा उबाठाला विसर", श्रीकांत शिंदे यांची सडकून टीका

Follow Us
Close
Follow Us:
  • भारताच्या ७५ वर्षांच्या इतिहासात निवडणुकीत गैरप्रकार
  • देशाला आणीबाणीचा कलंक लावण्याचे काम काँग्रेसने केले
  • काँग्रेसने पंतप्रधानांच्या नियुक्तीला कोर्टात आव्हान देऊ शकत नाही
नवी दिल्ली : हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचा मतदानाचा हक्क रद्द करणाऱ्या काँग्रेससोबत आज उबाठा बसलेत. बाळासाहेबांना विसरले म्हणून आज ते काँग्रेसला साथ देत आहेत, अशी खरमरीत टीका शिवसेना संसदीय पक्षाचे नेते खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी उबाठावर केली. लोकसभेत ‘निवडणूक सुधारणा’ या विषयावरील चर्चेत खासदार डॉ. शिंदे यांनी उबाठा आणि काँग्रेसच्या लोकशाहीविरोधी धोरणांवर सडकून टीका केली.

खासदार डॉ. शिंदे म्हणाले की, आज विरोधक लोकशाही वाचवा, असा गळा काढत आहेत, मात्र भारताच्या ७५ वर्षांच्या इतिहासात निवडणुकीत गैरप्रकार केल्याबद्दल देशाच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिराजींना अलाहाबाद हायकोर्टाने दोषी ठरवलं आणि त्यांची निवडणूक रद्द केली होती. मात्र हायकोर्टाच्या निर्णयाचा सन्मान करण्याऐवजी देशाला आणीबाणीचा कलंक लावण्याचे काम काँग्रेसने केले. काँग्रेसने पंतप्रधानांच्या नियुक्तीला कोर्टात आव्हान देऊ शकत नाही, असा कायदाच बदलून घेतला होता. सत्तेसाठी संविधानाचा गळा घोटणारे आज संविधानाची प्रत हातात घेऊन नैतिकतेचे ढोंग करत आहेत, अशी जळजळीत टीका खासदार डॉ. शिंदे यांनी केली. ते पुढे म्हणाले की, १९८८ मधील सार्वत्रिक निवडणुकीत पंतप्रधानांच्या अमेठी मतदार संघात अनेक मतदान केंद्र काँग्रेस कार्यकर्त्यांनी ताब्यात घेतली. अनेक ठिकाणी लाठी चार्ज झाला अखेर निवडणूक आयोगाच्या आदेशानं ९७ ठिकाणी फेर मतदान झाले. टी.एन शेषन सारख्या कर्तव्यदक्ष निवडणूक आयुक्तांचे पंख छाटण्याचे काम काँग्रेस नेत्यांनी केले. बांग्लादेशी रोहिंगे काँग्रेसची व्होटबँक असल्याने ते एसआयआरला विरोध करत आहेत, असे खासदार डॉ. शिंदे म्हणाले. मुंबईतही रोहिंग्यांची संख्या लाखांमध्ये असल्याचे ते म्हणाले.

Devendra Fadnavis : आता अपघात होणारच नाहीत…! देवेंद्र फडणवीसांच्या झेब्रु शुभंकराचा अनावरण सोहळा

ते पुढे म्हणाले की, काँग्रेसने बाळासाहेबांचा मतदानाचा अधिकार रद्द केला होता. हा निर्णय घेणारे निवडणूक आयुक्त एम.एस गिल यांना पुढे काँग्रेसने केंद्रात मंत्रिपदाचं बक्षीस दिलं. मात्र उबाठाला बाळासाहेबांचा विसर पडला आहे, त्यामुळे आज उबाठा काँग्रेससोबत आहेत, अशी टीका खासदार डॉ. शिंदे यांनी केली. निवडणूक काळात उबाठाचे नेते घरात बसून राहिले आणि कार्यकर्ते वाऱ्यावर होते. त्यामुळे अनेक ठिकाणी निवडणूक बिनविरोध झाली, असे खासदार डॉ. शिंदे म्हणाले. निवडणूक काळात बाहेर जायचं आणि पराभव झाल्यावर ईव्हीएम आणि निवडणूक आयागोवर खापर फोडायचं ही दुटप्पी भूमिका असल्याची टीका खासदार डॉ. शिंदे यांनी केली.

खासदार डॉ. शिंदे म्हणाले की, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांचे किमान वय २५ ऐवजी १८ किंवा २१ करणे आवश्यक आहे. तसेच सर्वच निवडणुकांसाठी एकच मतदार याद्या असाव्यात, ‘वन नेशन वन इलेक्शन’ धोरण लवकर आणावे, प्रवासी मजुरांना रिमोट व्होटिंगची व्यवस्था करणे, अशा अपेक्षा खासदार डॉ. शिंदे यांनी यावेळी व्यक्त केली. आज जगभरात भारताला लोकशाहीची जननी म्हणून ओळखलं जाते, याचे कारण येथील निवडणुका आहेत, असे खासदार डॉ. म्हणाले. निवडणुका म्हणजे दर पाच वर्षांनी येथील मतदाराला देशाचे नेतृत्व निवडण्याची संधी मिळते. अमेरिकेला महिलांना मतदानाचा अधिकार देण्यासाठी १४४ वर्ष लागली तर भारताने सुरुवातीपासूनच स्त्री आणि पुरुषांना मतदानाचा अधिकार बहाल केला होता. ही समानता भारताच्या लोकशाहीची मोठी ताकद आहे. भारतात निवडणुकात बॅलटवरुन ईव्हीएममध्ये परावर्तीत झाल्या. निवडणुकांमध्ये होणाऱ्या हिंसाचाराला देखील आता मागे टाकले असून काश्मिरपासून गडचिरोलीच्या दुर्गम भागांत विक्रमी मतदान होते, असे ते म्हणाले.

मतचोरी करुन काँग्रेसनेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पराभव केला

देशातील पहिल्याच निवडणुकीत पंडित नेहरुंनी जनतेच्या विश्वासाला तडा देण्याचे काम केले, अशी टीका खासदार डॉ. शिंदे यांनी केली. संविधानाचे निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना संसदेपासून दूर ठेवण्याचे काम काँग्रेसने केले. १९५२ च्या सार्वत्रिक निवडणुकीत पंडित नेहरुंनी बाबासाहेबांविरोधात उमेदवार दिला होता, बाबासाहेबांचा विजय होतोय हे लक्षात येता काँग्रेसने ७४ हजार ३३३ मतं अवैध घोषीत करण्यात आली. या निवडणुकीत बाबासाहेबांचा १४ हजार मतांनी पराभव झाला. काँग्रेसच्या माध्यमातून तेव्हापासून मतचोरी सुरु होती, अशी टीका खासदार डॉ. शिंदे यांनी केली.

Separate Vidarbha Demand: महाराष्ट्रातून विदर्भ वेगळा होणार…? बावनकुळेंच्या विधानाने राजकारण तापणार

Web Title: Shrikant shinde strongly criticizes those who annul balasaheb voting rights

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 09, 2025 | 07:04 PM

Topics:  

  • maharashtra
  • Shrikant Shinde
  • thane

संबंधित बातम्या

Amravati News : बालविवाहमुक्तीसाठी ३८ हजार नागरिकांची शपथ, अमरावतीत विशेष मोहीम
1

Amravati News : बालविवाहमुक्तीसाठी ३८ हजार नागरिकांची शपथ, अमरावतीत विशेष मोहीम

मुंबई, ठाण्याचा होणार कायापालट! MMRDA चा 48,072 कोटीचा अर्थसंकल्प मंजूर
2

मुंबई, ठाण्याचा होणार कायापालट! MMRDA चा 48,072 कोटीचा अर्थसंकल्प मंजूर

वडिलांकडे मुलीचा ताबा देण्यास उच्च न्यायालयाचा नकार; वडिलांची याचिका फेटाळली
3

वडिलांकडे मुलीचा ताबा देण्यास उच्च न्यायालयाचा नकार; वडिलांची याचिका फेटाळली

महाराष्ट्रात २०२८ मध्ये रंगणार ‘राष्ट्रीय कौशल्य स्पर्धा’; Mangal Prabhat Lodha यांच्या प्रस्तावाला केंद्राचे सकारात्मक संकेत
4

महाराष्ट्रात २०२८ मध्ये रंगणार ‘राष्ट्रीय कौशल्य स्पर्धा’; Mangal Prabhat Lodha यांच्या प्रस्तावाला केंद्राचे सकारात्मक संकेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.