
अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार ही बैठक नियोजन समितीच्या बैठकीनंतर घेण्यात यावी, असे निश्चित झाल्याने सामंत यांनी आपल्या पूर्वनियोजित कार्यक्रमात बदल करून बैठकीची वेळ पुढे ढकलली होती. मात्र जिल्हा नियोजन समितीची बैठक संपल्यानंतरही जवळपास अर्धा तास जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक बैठकीसाठी उपस्थित न झाल्याने उद्योगमंत्री संतप्त झाल्याची चर्चा आहे. वरिष्ठ मंत्र्यांना प्रतीक्षा करावी लागणे हा प्रोटोकॉलचा भंग असल्याची नाराजी त्यांनी व्यक्त केल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचे प्रयत्न करण्यात आले.
‘आणखी दहा मिनिटांत बैठकीला उपस्थित राहा, अन्यथा मीच शिवसैनिकांसह तुमच्या कार्यालयात येतो,’ अशा शब्दांत उद्योगमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केल्याची चर्चा आहे. यानंतर जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षक तातडीने शासकीय विश्रामगृहात दाखल झाले. त्यानंतर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दोन्ही अधिकाऱ्यांसोबत सुमारे अर्धा तास बंद खोलीत चर्चा केली. या बैठकीत नेमकी कोणती चर्चा झाली, याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र प्रोटोकॉलचे पालन, बैठकीला झालेला विलंब आणि मंत्र्यांना प्रतीक्षा करावी लागल्याच्या मुद्द्यावरून दोन्ही अधिकाऱ्यांना सामंत यांनी जाब विचारल्याची चर्चा प्रशासकीय वर्तुळात सुरू आहे.
Ambegaon Landslide: आंबेगावातील दरडग्रस्त ५ गावांचे पुनर्वसन करणार; दिलीप वळसे पाटलांची मोठी ग्वाही