Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 24 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

राज्यात उष्णतेचे मोडत आहेत रेकॉर्ड्स; 11 जिल्ह्यांत पाणी टंचाईचे सावट कायम

उष्णतेच्या वाढत्या झळा, आटत चाललेले जलस्रोत आणि कोसळणारी भूगर्भ जलपातळी यामुळे राज्य दुष्काळसदृश परिस्थितीकडे वाटचाल करत असल्याचा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात भूगर्भजलपातळी सातत्याने खालावत आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Apr 21, 2026 | 08:37 AM
उत्तरेत उष्णतेची लाट श्रीगंगानगर @ ४८.२

उत्तरेत उष्णतेची लाट श्रीगंगानगर @ ४८.२

Follow Us
Follow Us:

मुंबई / राम खांदारे : सध्या उष्णतेचे विक्रम मोडले जात असताना महाराष्ट्राच्या घशाला अक्षरशः कोरड पडण्यास सुरु झाली आहे. अनेक भागांत कोरडीठाक परिस्थिती निर्माण होत असून, भू-गर्भजल पातळी झपाट्याने खालावत असल्याचे गंभीर चित्र समोर आले आहे. आराखड्यातील आकडेवारीनुसार, महाराष्ट्रातील ३५ जिल्ह्यांपैकी तब्बल ११ जिल्हे पाणी टंचाईच्या उंबरठ्यावर पोहोचले आहेत, तर १८ जिल्हे तीव्र पाणीटंचाईच्या गर्तेत सापडले आहेत.

दरडोई वार्षिक पाण्याची उपलब्धता १७०० घनमीटरपेक्षा कमी असलेले जिल्हे, तसेच १८ जिल्ह्यांमध्ये दरडोई वार्षिक पाण्याची उपलब्धता १००० घनमीटरपेक्षाही कमी झाली आहे. उष्णतेच्या वाढत्या झळा, आटत चाललेले जलस्रोत आणि कोसळणारी भूगर्भ जलपातळी यामुळे राज्य दुष्काळसदृश परिस्थितीकडे वाटचाल करत असल्याचा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात भूगर्भजलपातळी सातत्याने खालावत आहे. तर अहमदनगर, नंदुरबार, परभणी, सोलापूर जिल्हे उच्च जलधोका क्षेत्रात आल्याचे सध्या दिसून येत आहे. तसेच उष्णतेच्या लाटांमुळे पाणीसाठ्यांवर अतिरिक्त ताण येत असून, सांडपाण्याचा पुनर्वापर आणि वापरात नसलेले जलस्रोत वापरण्याचा प्रस्ताव आहे.

विदर्भ, मराठवाड्यात पाण्याची कमतरता

विदर्भ, मराठवाडा या भागांमध्ये दरवर्षी भूपृष्ठाखालील पाण्याची कमतरता प्रकर्षाने जाणवत असून, सुमारे ४२.५ टक्के भूभाग ‘तुटवडा असलेला’ किंवा ‘तीव्र तुटवडा असलेला’ उपखोऱ्यांमध्ये मोडतो. अहिल्याबाई नगर, नंदुरबार, परभणी, सोलापूर हे जिल्हे ‘गंभीर जलसंकटाचा धोका असलेला भाग’ यादीत असल्याने भविष्यातील जलसंकटाची तीव्रता अधिक अधोरेखित होते.

उपाययोजनांसाठी २.०७ लाख कोटी

वापरात नसलेल्या नदीखोऱ्यांतील पाणी वापरणे, सांडपाण्याचे पुनर्वापर वाढवणे, तसेच सूक्ष्म सिंचन पद्धतींचा विस्तार करणे यावर भर देण्यात आला आहे. कालव्यांमधील पाण्याचे ‘वापराच्या प्रमाणावर आधारित पाणी दर’ लागू करण्याचा प्रस्तावही मांडण्यात आला आहे, ज्यामुळे पाण्याचा वापर नियंत्रित होऊ शकतो. याशिवाय, हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर जलस्रोत आणि पायाभूत सुविधांना ‘हवामानसुसंगत सुरक्षित’ करण्यावर विशेष भर देण्यात येत आहे. विशेषतः विदर्भात लहान धरणे आणि चेक डॅम उभारून पाणी साठवण क्षमता वाढवण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या सर्व उपाययोजनांसाठी तब्बल २.०७ लाख कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याचे राज्य कृती आराखड्यात म्हटलं आहे. जलसुरक्षेसाठी ही गुंतवणूक अत्यावश्यक मानली जात आहे.

Rain Alert ! मुंबईसह ठाणे, रायगडमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता; हवामान विभागाकडून अलर्ट जारी

Web Title: Specter of water scarcity persists in 11 districts in maharashtra

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 21, 2026 | 08:37 AM

Topics:  

  • Climate Change
  • Maharashtra Weather
  • Rain News
  • Weather Update

संबंधित बातम्या

Maharashtra Rain Alert: दारं, खिडक्या बंद करा! पुढील 6 दिवस धोक्याचे; कोकण अन् गोव्यात…
1

Maharashtra Rain Alert: दारं, खिडक्या बंद करा! पुढील 6 दिवस धोक्याचे; कोकण अन् गोव्यात…

राज्यात मोठं जलसंकट; बीडला सर्वाधिक फटका, 173 लहान-मोठ्या जलाशयांपैकी 81 पूर्णपणे कोरडेच
2

राज्यात मोठं जलसंकट; बीडला सर्वाधिक फटका, 173 लहान-मोठ्या जलाशयांपैकी 81 पूर्णपणे कोरडेच

Maharashtra Rain Alert: सावधान! 48 तास धोक्याचे? कोकणात पाऊस आक्रमक होणार, तर…
3

Maharashtra Rain Alert: सावधान! 48 तास धोक्याचे? कोकणात पाऊस आक्रमक होणार, तर…

Car Stuck in Water: पाण्यात कार बंद पडलीये? घाबरू नका! ‘या’ ५ गोष्टी लक्षात ठेवा
4

Car Stuck in Water: पाण्यात कार बंद पडलीये? घाबरू नका! ‘या’ ५ गोष्टी लक्षात ठेवा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.