वाशीम : कारंजा तालुक्यातील (Karanja taluka) मसला येथील प्राथमिक शिक्षक बनारसे (Banarase, a primary school teacher in Masala) यांनी मुलांकडून धोंडी मागून घेवून वरुणराजाला साकडे घातले. हे कृत्य करीत असताना मुलांच्या अंगातील कपडे काढून, त्याच्या अंगाला निबांचा पाला पाचोळा बाधून त्याला गावभर फिरविणे आणि अस्तित्वात नसलेल्या भ्रामक कपोल कल्पित गोष्टीचा प्रसार करीत पाण्यासाठी धोंडी मागण्याचे आणि असे गावात फिरल्याने पाणी येते, अशी अविवेकी अंधश्रद्धा आणि तस्संम बाबीला खतपाणी घालणारी नुकतीच घटना कारंजा तालुक्यातील मसला येथे घडली असून सदर घटनेबाबत विविधस्तरावर त्याच्या आक्रमक प्रतिक्रिया उमटल्या, सबंधितांवर कायदेशीर कारवाई करुन निलंबित करा, अशी मागणीही करण्यात आली असल्याने जिल्हा शिक्षण अधिकारी यांनी गांभीरतेने या प्रश्नावर लक्ष देत संबधित बनारसे नामक शिक्षकास आपणास निलंबित का करू नये, या बाबतची कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
धोंडी मागून अंधश्रध्देला खतपाणी घालण्याचा ऊपक्रम ( An initiative to fertilize superstition) विद्यार्थ्यांना सोबत घेवून बनारसे नावाच्या जि.प.शिक्षकाने केला. सदर ऊपक्रमाची प्रसिध्दीही देण्यात आली आहे. सदर ऊपक्रमातून अंधश्रध्देला खतपाणी मिळत असल्याने शिक्षकाच्या सेवाशर्ती नियमांचे भंग आहे. विद्यार्थ्यांना विज्ञानवाद शिकवायचे सोडून अंधश्रध्दा जोपासणार्या असे कृत्य करवून घेतल्यामुळे सर्व स्तरातून रोष व्यक्त करण्यात येत असून सदर शिक्षकाने कर्तव्यात नेमून दिलेल्या कर्तव्याचा भंग केल्यामुळे त्वरीत निलंबित करावे, अशा विविध सामाजिक संघटना, अंनिस, आणि इतर शिक्षकामधूनही प्रतिक्रिया सोशल मीडियावर ऊमटल्या आहेत. सदर उपक्रमातून मुलांना बालपणापासूनच अंधश्रध्देच्या खाईत लोटण्याचा प्रयत्न असून सबंधितावर अंधश्रध्दा निमूर्लन कायद्याअंतर्गत गुन्हे नोंदवावेत अशीही मागणी जोर धरत आहे.
धोंडी प्रकरणाची वरिष्ठ प्रशासकिय स्तरातून त्वरीत दखल घेवून शिक्षणाधिकारी यांच्या आदेशावरुन कारंजाचे गटशिक्षणाधिकारी यांनी सबंधित शिक्षकाला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. याप्रकरणी पुढे शिक्षण विभाग काय कारवाई करते ? याकडे लक्ष लागले आहे. सबंधित शाळेवरील जे शिक्षक या धोंडी प्रकरणात सहभागी किंवा ऊपस्थीत नव्हते त्यांनाही कारणे दाखवा नोटीस शिक्षण विभागाकडुन पाठवली असल्याने ज्यांनी धोंडी ऊपक्रमात सहभाग नोंदवला अशा जबाबदार शिक्षक आणि त्यांना पाठिशी घालणार्या यंत्रणेवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.