
कर्जत परिवर्तन आघाडीचा महायुतीला धोबीपछाड, जिल्हा परिषदेचे सर्व सहा जागांवर विजयी..
कर्जत तालुक्यात रायगड जिल्हा परिषदेचे सहा गट असून त्यातील कळंब जिल्हा परिषद गेटमधून राष्ट्रवादाची काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे नारायण डामसे यांनी शिवसेना शिंदे गटाचे हरिचंद्र निरगुडा यांचा अवघ्या २०६ मतांनी पराभव करून विजय मिळवला आहे.कशेळे जिल्हा परिषद गटामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वर्षा सुरेश दोरे यांनी शिवसेना शिंदे गटाच्या प्रमिला भरत शीद यांचा ३७१९ मतांनी पराभव करीत मोठा विजय मिळविला.माणगाव तर्फे वरेडी मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सुवर्णा प्रदीप ठाकरे यांनी शिवसेना शिंदे गटाच्या रेशमा योगेश मिसाळ यांचा अवाघ्य्या १९ मतांनी पराभूत करीत विजय संपादन करीत विजय मिळविला,तर स्वबळावर निवडणूक लढवणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या राधिका किशोर ठाकरे यांनी तब्बल ५०९८ मते मिळवून जोरदार लढत दिली..नेरळ जिल्हा परिषद गटामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष गटाच्या सुनीता रोहिदास मोरे यांनी शिवसेना शिंदे गटाच्या सुनीता सुरेश टोकरे यांचा ८८३ मतांनी पराभूत करीत विजय मिळविला.कडाव जिल्हा परिषद गटामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष गटाचे मारुती तथा बाबू घारे यांनी शिवसेना शिंदे गटाचे योगेश कांबेरे यांचा पराभव १९५५ मतांनी पराभव करून विजय मिळविला मोठे वेणगाव गटामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या उषा शंकर ठोंबरे यांनी शिवसेना शिंदे गटाच्या संगीता वसंत वाघमारे यांचा तब्बल ५५४७ मतांनी पराभव करीत मोठा विजय संपादन केला.
कर्जत पंचायत समितीच्या १२ जगण्यासाठी झालेलया निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना ठाकरे गट यांच्या कर्जत परिवर्तन आघाडी आणि शिवसेना भाजप शेतकरी कामगार पक्ष यांच्या महायुती सोबत लढत झाली.कर्जत पंचायती समिती मधील पोशीर ग्णामध्ये महायुती कडून लढणाऱ्या शेकापच्या रेशमा अनिल जोशी यांनी राहस्त्रवाडी अजित पवार गटाच्या हर्षला वेहले यांचा १०२४ मतांनी पराभव केला.तर कळंब गणामध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या कमलाबाई शिंगवा यांनी महायुती शेकापच्या नीलम वसंत ढोले यांचा १७४७ मतांनी पराभव करून विजय संपादन केला.पाथरज गणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कविता भरत पादीर यांनी शिवसेना शेकाप महायुतीच्या अश्विनी कांता पादीर यांचा १९७१ मतांनी पराभव करून विजय संपादन केला. कशेळे गणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अक्षय राम तिटकारे यांनी शिवसेना शिंदे गटाचे सचिन बालकृष्णन भोईर यांचा १४१९ मतांनी पराभव करून विजय मिळविला.माणगाव तर्फे वरेडी गण मध्ये शिवसेना शिंदे गटाचे महेश सुरेश विरले यांनी शिवसेना ठाकरे गटाचे संदेश रमेश हजारे यांचा १७८ मतांनी पराभव करीत विजय मिळविला.उकरूल गणामध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या नमिता लहू श्रीखंडे यांनी मनसेच्या प्रियंका जितेंद्र पाटील यांचा २७४९ एवढ्या प्रचंड मतांनी विजय संपादन केला तर महायुती मधील भाजप उमेदवार सुप्रिया राजेश भगत यांना तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.
नेरळ गणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे भगवान बाळकृष्ण चंचे यांनी भाजपच्या नम्रता नितीन कांदळगावकर यांचा तब्बल ३३६८ मतांनी पराभव करीत मोठा विजय संपादन केला. दामत गणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे महेश लक्ष्मण खारीक यांनी माजी सदस्य भाजपचे नरेश सुरेश मसने यांचा ११९० मतांनी विजय मिळविला.वाकस गणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नितीन जयराम धुळे यांनी शिवसेना शिंदे गटाचे १११४ मतांनी पराभूत करीत विजय संपादन केला.कडाव गणामध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या सुषमा चेतन पवाळी यांनी शिवसेना शिंदे गटाच्या संध्या सुदाम पवाळी यांचा ६९९ मतांनी पराभव करीत विजय मिळविला.तर मोठे वेणगाव येथे आमदारांच्या सुनबाई श्वेता प्रसाद थोरवे यांचा दारुण पराभव झाला.थोरवे यांना शिवसेना ठाकरे गटाच्या चित्रा ठाकरे यांनी पराभूत करीत जायंट किलर ठरल्या असून त्यांनी ६०७ मतांनी विजय मिळविला.तर बीड बुद्रुक गण मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नमिता सुधाकर घारे यांनी शिवसेना शिंदे गटाच्या सोयराबाई प्रमोद सुर्वे यांचा 4492 मतांनी पराभव करून विजय मिळविला.