डायघर डंपिंगला लागलेल्या आगीवरुन माजी आमदार राजू पाटील आक्रमक (फोटो- ट्विटर)
कल्याण: डायघर डंपिंग ग्राऊंडला लागलेल्या आगीवर मनसे माजी आमदार राजू पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर आगपाखड करणारी टिका केली आहे. माजी आमदार पाटील यांनी टीकेचे ट्वीट केले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, ठाण्यात साहेबांच्या कुटुंबाला थोडी अडचण झाली तर त्या दुकानदाराचे अतिक्रमण लगेच तोडले. मग आत्ता डायघरला परिसरातील नागरीकांचे दु:ख ह्यांना दिसत नाही का ?
ठाण्याच्या कचऱ्यापासून डायघमध्ये वीज निर्मिती करण्याचा प्रकल्प सुुरु केला होता. हा प्रकल्प सुरु होण्याआधीच अधिकाऱ्यांना सांगितलं होते की, तुमचा हा प्रकल्प यशस्वी होणार नाही. प्रकल्प सुरु करण्यासाठी आवश्यक ते नियम पाळले जात नव्हते. शेवटी कचऱ्यापासून वीज निर्मिती नव्हे तर ह्यांनी दुर्गंधीची निर्मीती केली. आता तर भयंकर वायूप्रदूषण पण होत आहे. या संदर्भात सातत्याने ग्रामस्थांसोबत संघर्ष केला आहे.
ठाण्यात साहेबांच्या कुटुंबाला थोडी अडचण आली तर त्या दुकानदारांचे अतिक्रमण लगेच तोडले ….मग आता डायघर परिसरातील नागरिकांचे दु:ख ह्यांना दिसत नाही का ?
ठाण्याच्या कचऱ्यापासून डायघर मध्ये वीज निर्मिती करण्याचा प्रकल्प सुरु केला होता. हा प्रकल्प सुरु होण्याआधीच अधिकाऱ्यांना सांगितलं… pic.twitter.com/vtXMVPeCDi— Raju Patil ( प्रमोद (राजू) रतन पाटील ) (@rajupatilmanase) February 13, 2025
काय म्हणाले माजी आमदार राजू पाटील?
ठाण्यात साहेबांच्या कुटुंबाला थोडी अडचण आली तर त्या दुकानदारांचे अतिक्रमण लगेच तोडले ….मग आता डायघर परिसरातील नागरिकांचे दु:ख ह्यांना दिसत नाही का ? ठाण्याच्या कचऱ्यापासून डायघर मध्ये वीज निर्मिती करण्याचा प्रकल्प सुरु केला होता. हा प्रकल्प सुरु होण्याआधीच अधिकाऱ्यांना सांगितलं होतं कि तुमचा हा प्रकल्प यशस्वी होणार नाही. या प्रकल्पाला सुरु करण्यासाठी आवश्यक ते नियम इथे पाळले जात नव्हते. शेवटी कचऱ्यापासून वीज निर्मिती नव्हे तर ह्यांनी दुर्गंधीची निर्मिती केली व आता तर भयंकर वायुप्रदुषण पण होत आहे.या संदर्भात सातत्याने ग्रामस्थांसोबत संघर्ष केला आणि ठाण्याचा कचरा डायघरमध्ये बंद केला. पण आता आपलीच मक्तेदारी समजून यांनी नागरिकांना गृहीत धरायला घेतलं आहे. काल लागलेली आग अजूनही धुमसते नागरिकांच्या घरांमध्ये धूर गेलाय. मुख्यमंत्री पद भूषविल्यानंतरही हा ठाण्याच्या कचऱ्याचा प्रश्न हे बापबेटे सोडवू शकले नाहीत ही अत्यंत लाजीरवाणी गोष्ट आहे…अर्थात कचऱ्यात पण भ्रष्टाचार करून पैसा खाणाऱ्यांना थोडीतरी लाज-शरम उरली असेल तर ! महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण बोर्डाने ठाणे महानगरपालिकेवर गुन्हा दाखल करावा अन्यथा नागरिकांच्या रोषास सामोरे जावे लागेल.
ठाण्याचा कचरा डायघरमध्ये बंद केला. पण आत्ता आपलीच मक्तेदारी समजून यांनी नागरीकांना गृहीत धरायला घेतले आहे. काल लागलेली आग अजूनही धुमसते आहे. नागरीकांच्या घरांमध्ये धूर गेला आहे. मुख्यमंत्री पद भूषविल्यानंतरही हा ठाण्याच्या कचऱ्याचा प्रश्न हे बापबेटे सोडवू शकले नाहीत. ही अत्यंत लाजीरवाणी गोष्ट आहे. अर्थात कचऱ्यात पण भ्रष्टाचार करुन पैसा खाणाऱ्यांना थोडी तरी लाच शरम उरली असेल तर महाराषट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने ठाणे महापालिकेवर गुन्हा दाखल करावा अन्यथा नागरीकांच्या रोषाला जामाेरे जावे लागेल.