
अंबाजोगाईत राजमा बियाण्याच्या नावाखाली १२.८० लाखांची फसवणूक; साताऱ्यातील कंपनीच्या संचालकांवर गुन्हा
Latur Zilla Parishad: सत्तेतून पैसा, पैशातून सत्ता; भाजप-राष्ट्रवादीवर आमदार अमित देशमुखांचा घणाघात
अंबाजोगाई येथील सुयश प्रेमचंद मुथा गुरुवार पेठेतले रहिवासी हे बियाणे व्यवसाय करतात. जुलै २०२५ मध्ये साताऱ्यातील ‘येस फ्रेश फार्मर प्रोड्युसर कंपनी’ चे संचालक संजय बाबासाहेब भगत व ओंकार संजय भगत यांनी मुथा यांची भेट घेऊन उच्च दर्जाच्या राजमा बियाण्याचे नमुने दाखवले होते. त्यानुसार मुथा यांनी २१ जुलै २०२५ रोजी एकूण ८५ टन राजमा खरेदीचा करार करून आरटीजीएसद्वारे वेळोवेळी रक्कम जमा केली. करारानुसार माल तपासण्यासाठी मुथा साताऱ्याला गेले असता, दाखविलेल्या दर्जाचा माल उपलब्ध नसल्याचे निदर्शनास आले, त्यानंतर तडजोड म्हणून त्यांनी २५ टनाची नवीन ऑर्डर देत एकूण २६ लाख ३१ हजार रुपये भरले. मात्र, ३० ऑगस्ट २०२५ रोजी आरोपींकडून केवळ १२ टन माल पाठवण्यात आला.
हा माल निकृष्ट दर्जाचा असून त्यामध्ये भेसळ, माती तसेच पेरणीस अयोग्य साहित्य मोठ्या प्रमाणात आढळले. उर्वरित माल किंवा पैसे परत मिळण्यासाठी मुथा यांनी वारंवार संपर्क साधला असता आरोपींनी पैसे देण्यास नकार देत असभ्य भाषेत उत्तर दिल्याचे तक्रारीत नमूद आहे. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर मुथा यांनी अंबाजोगाई शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार संजय बाबासाहेब भगत, ओंकार संजय भगत, अरविंद सोपान विधाते, सारीका सोमनाथ शिंदे, बालुताई सोमनाथ जगताप व बालकृष्ण पंढरीनाथ चव्हाण यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलिस निरीक्षक शरद जोगदंड पुढील तपास करत आहेत.
डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.